शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
4
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
5
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
6
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
8
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
9
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
10
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
11
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
12
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
13
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
14
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
15
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
16
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
17
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
18
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
19
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले

माणसाने शिकायचे कशासाठी? फक्त पोट भरता यावे म्हणून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 09:23 IST

बदलत्या जगात कौशल्य आधारित शिक्षणाची गरज वाढती आहे हे मान्य; पण म्हणून शिक्षणाची बाकी सारी उद्दिष्टे एकदम मातीमोल ठरवून टाकायची?

प्रा. प्रणव खोचे, लासलगाव महाविद्यालय -

“यापुढे फक्त कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांना परवानगी नाही”- ही बातमी नुकतीच वाचली.  कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम असतील तरच महाविद्यालयांना परवानगी मिळेल, असे या शासन निर्णयात सूचित करण्यात आले आहे. त्यातच मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर म्हणाले, रोजगार देणे आणि उद्योजक तयार करणे; हेच उच्च शिक्षणाचे उद्दिष्ट असले पाहिजे. हे सारे वाचून, ऐकून अस्वस्थता येते आणि काही महापुरुषांचे शिक्षणविषयक विचार आठवतात.डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, “व्यक्तीला तिच्या अस्तित्त्वाची, क्षमतांची आणि सामर्थ्याची जाणीव करून देते ते शिक्षण होय!”  तर स्वामी विवेकानंद म्हणाले होते, “माणसात असलेल्या परिपूर्णतेचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण! तो माणूस घडवायला शिक्षकाने फक्त सहाय्य करायचं आहे. न पचविलेल्या माहितीची मेंदूतील सरमिसळ म्हणजे शिक्षण नव्हे. तर शिक्षण म्हणजे अशी प्रक्रिया, की ज्यामुळे चारित्र्य घडते, मन:शक्ती वाढते, बुद्धिमत्ता धारदार होते आणि ज्यामुळे माणूस स्वत:च्या पायावर उभा राहू शकतो!”शिक्षणाने रोजीरोटी कमावण्याची क्षमता विकसित केली पाहिजेच, पण माणसाने फक्त आपले पोट भरण्याचे साधन मिळावे म्हणूनच शिकायचे असते का? बदलत्या जगात कौशल्य आधारित शिक्षणाची गरज वाढती आहे हे मान्य; पण म्हणून  शिक्षणाची बाकी सारी उद्दिष्टे एकदम मातीमोल ठरवून टाकायची हा कुठला तर्क झाला? भाषा, साहित्य, मानव्यविज्ञान, सामाजिक शास्त्रे यांचा समावेश असणारी कला शाखा, आर्थिक बाबी, बँकांचे व्यवहार, कर रचना आदिंच्या अभ्यासाची वाणिज्य आणि  मूलभूत विज्ञान शाखा या सर्वांना एकदम तुच्छ दर्जा देण्याचा विचार सध्या मोठ्या प्रमाणात केला जात आहे आणि त्यामुळेच ही बातमी एकूण शिक्षण विचाराविषयी नकारात्मक वाटते. भाषा विषयांतून मिळणारी कौशल्ये मानवी जीवनाच्या सार्थकतेसाठी किती महत्त्वाची आहेत, हे वेगळे सांगायची गरज आहे का? साहित्यातून मिळणारी सहवेदना, माणुसकी, सद्सद्विवेक बुद्धी, वैश्विक बंधुत्व ही मूल्ये आजच्या काळात सर्वाधिक गरजेची आहेत. मानसशास्त्रातून मिळणारे माणसाला ओळखण्याचे ज्ञान निरूपयोगी म्हणता येईल का? असेच प्रश्न अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल आदी विषयांबाबत विचारता येतील. वाणिज्य शाखा ही निरूपयोगी कशी काय होऊ शकेल? मूलभूत विज्ञानाच्या सहाय्याने निसर्ग आणि विश्वाचे रहस्य उलगडणे महत्त्वाचे नाही का आता?जर जगभरातील प्रगत देशांचा विचार केला तर या शाखांना तिथे आत्यंतिक आदर बहाल केलेला असतो. नोबेल पुरस्कार हे साहित्य, मूलभूत विज्ञान याच क्षेत्रात दिले जातात. अभियांत्रिकीस हीन लेखण्याचा हेतू अजिबात नाही. मात्र, पारंपरिक विद्याशाखांना आपल्याकडे दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीविषयी विशाद जरूर आहे. या विषयांना असेच मागे टाकले गेले तर आपले युवक हे कौशल्य असलेले परंतु भावनाहीन, मूल्यहीन यंत्रमानव बनण्याची शक्यता दूर नाही.पारंपरिक विद्याशाखांचा उपयोग विद्यार्थी त्याच्या पायावर उभा राहण्यासाठी होत नसेल तर दोष त्यांचा नाही तर हे शिक्षण फक्त पुस्तकी व कौशल्यरहित ठेवणाऱ्या अभ्यास पद्धतीचा आहे. आज कितीतरी खासगी आस्थापनांमध्ये या शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांना चांगला पगारसुद्धा मिळतो आहे. क्रिएटिव्ह हेड, प्रसिद्धीतज्ज्ञ, वैज्ञानिक, भाषांतरकार किंवा दुभाषी असे काही व्यवसाय वानगीदाखल सांगता येतील. कौशल्ये आणि मूलभूत ज्ञान याचा संगमच शिक्षणाचा मूळ उद्देश पूर्ण करू शकेल. केवळ कौशल्ये यंत्रमानव घडवतील, नागरिक नव्हे!pranav.khoche@rediffmail.com

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीTeacherशिक्षक