शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

माणसाने शिकायचे कशासाठी? फक्त पोट भरता यावे म्हणून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 09:23 IST

बदलत्या जगात कौशल्य आधारित शिक्षणाची गरज वाढती आहे हे मान्य; पण म्हणून शिक्षणाची बाकी सारी उद्दिष्टे एकदम मातीमोल ठरवून टाकायची?

प्रा. प्रणव खोचे, लासलगाव महाविद्यालय -

“यापुढे फक्त कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांना परवानगी नाही”- ही बातमी नुकतीच वाचली.  कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम असतील तरच महाविद्यालयांना परवानगी मिळेल, असे या शासन निर्णयात सूचित करण्यात आले आहे. त्यातच मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर म्हणाले, रोजगार देणे आणि उद्योजक तयार करणे; हेच उच्च शिक्षणाचे उद्दिष्ट असले पाहिजे. हे सारे वाचून, ऐकून अस्वस्थता येते आणि काही महापुरुषांचे शिक्षणविषयक विचार आठवतात.डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, “व्यक्तीला तिच्या अस्तित्त्वाची, क्षमतांची आणि सामर्थ्याची जाणीव करून देते ते शिक्षण होय!”  तर स्वामी विवेकानंद म्हणाले होते, “माणसात असलेल्या परिपूर्णतेचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण! तो माणूस घडवायला शिक्षकाने फक्त सहाय्य करायचं आहे. न पचविलेल्या माहितीची मेंदूतील सरमिसळ म्हणजे शिक्षण नव्हे. तर शिक्षण म्हणजे अशी प्रक्रिया, की ज्यामुळे चारित्र्य घडते, मन:शक्ती वाढते, बुद्धिमत्ता धारदार होते आणि ज्यामुळे माणूस स्वत:च्या पायावर उभा राहू शकतो!”शिक्षणाने रोजीरोटी कमावण्याची क्षमता विकसित केली पाहिजेच, पण माणसाने फक्त आपले पोट भरण्याचे साधन मिळावे म्हणूनच शिकायचे असते का? बदलत्या जगात कौशल्य आधारित शिक्षणाची गरज वाढती आहे हे मान्य; पण म्हणून  शिक्षणाची बाकी सारी उद्दिष्टे एकदम मातीमोल ठरवून टाकायची हा कुठला तर्क झाला? भाषा, साहित्य, मानव्यविज्ञान, सामाजिक शास्त्रे यांचा समावेश असणारी कला शाखा, आर्थिक बाबी, बँकांचे व्यवहार, कर रचना आदिंच्या अभ्यासाची वाणिज्य आणि  मूलभूत विज्ञान शाखा या सर्वांना एकदम तुच्छ दर्जा देण्याचा विचार सध्या मोठ्या प्रमाणात केला जात आहे आणि त्यामुळेच ही बातमी एकूण शिक्षण विचाराविषयी नकारात्मक वाटते. भाषा विषयांतून मिळणारी कौशल्ये मानवी जीवनाच्या सार्थकतेसाठी किती महत्त्वाची आहेत, हे वेगळे सांगायची गरज आहे का? साहित्यातून मिळणारी सहवेदना, माणुसकी, सद्सद्विवेक बुद्धी, वैश्विक बंधुत्व ही मूल्ये आजच्या काळात सर्वाधिक गरजेची आहेत. मानसशास्त्रातून मिळणारे माणसाला ओळखण्याचे ज्ञान निरूपयोगी म्हणता येईल का? असेच प्रश्न अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल आदी विषयांबाबत विचारता येतील. वाणिज्य शाखा ही निरूपयोगी कशी काय होऊ शकेल? मूलभूत विज्ञानाच्या सहाय्याने निसर्ग आणि विश्वाचे रहस्य उलगडणे महत्त्वाचे नाही का आता?जर जगभरातील प्रगत देशांचा विचार केला तर या शाखांना तिथे आत्यंतिक आदर बहाल केलेला असतो. नोबेल पुरस्कार हे साहित्य, मूलभूत विज्ञान याच क्षेत्रात दिले जातात. अभियांत्रिकीस हीन लेखण्याचा हेतू अजिबात नाही. मात्र, पारंपरिक विद्याशाखांना आपल्याकडे दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीविषयी विशाद जरूर आहे. या विषयांना असेच मागे टाकले गेले तर आपले युवक हे कौशल्य असलेले परंतु भावनाहीन, मूल्यहीन यंत्रमानव बनण्याची शक्यता दूर नाही.पारंपरिक विद्याशाखांचा उपयोग विद्यार्थी त्याच्या पायावर उभा राहण्यासाठी होत नसेल तर दोष त्यांचा नाही तर हे शिक्षण फक्त पुस्तकी व कौशल्यरहित ठेवणाऱ्या अभ्यास पद्धतीचा आहे. आज कितीतरी खासगी आस्थापनांमध्ये या शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांना चांगला पगारसुद्धा मिळतो आहे. क्रिएटिव्ह हेड, प्रसिद्धीतज्ज्ञ, वैज्ञानिक, भाषांतरकार किंवा दुभाषी असे काही व्यवसाय वानगीदाखल सांगता येतील. कौशल्ये आणि मूलभूत ज्ञान याचा संगमच शिक्षणाचा मूळ उद्देश पूर्ण करू शकेल. केवळ कौशल्ये यंत्रमानव घडवतील, नागरिक नव्हे!pranav.khoche@rediffmail.com

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीTeacherशिक्षक