शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

जुनीच फळी अन् घराणेशाहीतील मंडळी; औरंगाबादेत शिवसेना पुन्हा भाजणार का पोळी?

By सुधीर महाजन | Updated: February 3, 2021 08:20 IST

सेनेने विकासकामांच्या उद्‌घाटनाचा धडाका लावला; पण वातावरणनिर्मिती होत नाही, हे लक्षात येताच चलबिचल सुरू झाली. 

शिवसेनेचा प्राण जसा मुंबई महापालिकेच्या सत्तेत आहे, तसा उर्वरित महाराष्ट्रात सेनेचा श्वास औरंगाबाद महानगरपालिकेत. आता ही निवडणूक तोंडावर असल्याने कदाचित सेनेच्या दृष्टीने ती काहीअंशी मुंबईसाठी ‘लिटमस टेस्ट’ही होऊ शकते, तर या औरंगाबादच्या निवडणुकीसाठी हवा तापवायला सेनेने सुरुवात केली. पंचवीस वर्षे सत्तेवर राहून साध्या मूलभूत सुविधा देऊ न शकणाऱ्या सेनेला आता जनमतातील खळबळ अस्वस्थ करू लागली आणि या नाकर्तेपणाला हवा देण्याचे काम सेनेची एकेकाळची अर्धांगिनी ‘कमळाबाईच’ करीत असल्याने सेनेचे नेते अस्वस्थ आहेत. ‘संभाजीनगर’चा नेहमीचा ‘बाॅम्ब’ही यावेळी सर्दाळला तो आवाज करीत नाही. हा मुद्दा हायजॅक करण्यासाठी ‘मनसे’ पुढे सरकली. सेनेने विकासकामांच्या उद्‌घाटनाचा धडाका लावला; पण वातावरणनिर्मिती होत नाही, हे लक्षात येताच चलबिचल सुरू झाली. 

गेले पावशतक महापालिकेत शिवसेना-भाजपची आघाडी होती; पण महाराष्ट्रातील सत्तांतराचे सावट पडले आणि भाजपने कंबर कसली. त्याचबरोबर सेनेच्या नाकर्तेपणावर नेमके बोट ठेवण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. सेनेची दुसरी अडचण म्हणजे नेहमीचे तेच ते चेहरे. नवी फळी नाही आणि नवी मंडळीही घराणेशाहीतील. प्रत्येक जण आपल्या मुलाला पुढे दामटवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. परवा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी चेहरा बदलण्याचे संकेत दिले, याचा अर्थ या निवडणुकीपूर्वी शिवसेनेचा ‘भाकरी फिरवण्याचा’ इरादा दिसतो. सेनेने खरोखरच भाकरी फिरवली तर नव्या सेनेचा चेहरा काय असेल? माजी खा. चंद्रकांत खैरे यांच्याकडे तर हा अंगुलीनिर्देश नसावा? औरंगाबादेत शिवसेना वाढवण्यात त्यांचा वाटा मोठा आहेच; पण गेली पंचवीस वर्षे ते सत्तेत होते हेही लक्षात घेतले पाहिजे. सुभाष देसाईंनीच या निवडणुकीत लक्ष घातल्याने सेनेअंतर्गत गटातटांची अडचण झाली आहे. 

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा सेनेने दोन वेळा सर्वेक्षण केले आहे. शिवसेनेने सर्व्हे केला आणि आ. अंबादास दानवे यांनीही एक सर्वेक्षण केले. शिवसेनेने शहरात पाय रोवल्यापासून काही मंडळी महानगरच्या राजकारणात सक्रिय झाली. त्यांनी आजपर्यंत नव्या मंडळींना पुढे येऊ दिलेले नाही, हा या सर्वेक्षणांचा निष्कर्ष आहे. ज्यांच्यात पुढे येण्याची धमक आहे त्यांच्या विकासकामांत खोडा घालण्याची कृती या जुन्या ‘खोडांनी’ केली. त्यामुळे सेनेत तेच ते चेहरे कायम दिसत राहिले.

या पार्श्वभूमीवर यावेळी एका घरात एकच पद किंवा उमेदवारी हा ‘मुंबई फाॅर्म्युला’ राबविण्याच्या विचारात शिवसेना आहे. समजा हे घडले तरी सेनेतील घराणेशाहीचे काय होणार? काही नेत्यांनी या निवडणुकीत मुलांचे लाँचिंग करण्याची तयारी सुरू केली आहे. युवा सेनेची कोअर टीम सक्रिय असल्याने काहींनी ही वाट निवडली. अंतर्गत गटबाजी जोरात असली तरी नेत्यांनी ती वर येऊ दिलेली नाही. सेनेसमोर तीन आव्हाने आहेत. त्यापैकी पहिले भाजपची शिस्तबद्ध फळी, दुसरे अंतर्गत गटबाजी आणि तिसरे भाकरी फिरवलीच तर होणारा दगाफटका. हे सगळे अडथळे पार करीत पुन्हा जनतेचा विश्वास मिळवावा लागणार आहे; पण सवाल आहे भाकरी फिरवणार का?

- सुधीर महाजन

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपा