शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

धोकादायक कीटकनाशकांवर बंदी का नाही?

By रवी ताले | Updated: October 17, 2017 00:21 IST

आरोग्य व पर्यावरणाच्या रक्षणासाठी धोकादायक कीटकनाशकांवर बंदीच हवी! मोठ्या प्रमाणातील शेतकरी-शेतमजूर मृत्यूंच्या बातम्यांसाठी विदर्भ पुन्हा एकदा राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहे. फरक एवढाच, की यापूर्वी शेतकरी आत्महत्या हा मुद्दा होता, तर यावेळी कीटकनाशक फवारणीमुळे होत असलेले मृत्यू हा मुद्दा आहे.

मोठ्या प्रमाणातील शेतकरी-शेतमजूर मृत्यूंच्या बातम्यांसाठी विदर्भ पुन्हा एकदा राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहे. फरक एवढाच, की यापूर्वी शेतकरी आत्महत्या हा मुद्दा होता, तर यावेळी कीटकनाशक फवारणीमुळे होत असलेले मृत्यू हा मुद्दा आहे. कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्यांची संख्या आता अर्धशतक पार करण्याच्या बेतात आहे.सर्वप्रथम यवतमाळ जिल्ह्यातून आणि पुढे अकोला, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांमधूनही फवारणीच्या बळींच्या बातम्या येण्यास प्रारंभ झाला, तेव्हा एकच खळबळ उडाली. कीटकनाशकांची फवारणी तर वर्षानुवर्षांपासून होत आहे, मग यावर्षीच मृत्यू का होत आहे, अशी चर्चा सुरू झाली. त्याची कारणेही यथावकाश समोर आली. वस्तुस्थिती ही आहे, की कीटकनाशक फवारणीने विदर्भात जरी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात बळी घेतले असले तरी हे आक्रित जगात प्रथमच घडले असे नाही. जगात इतरत्र यापूर्वी अनेकदा कीटकनाशक फवारणीने मोठ्या प्रमाणात बळी घेतले आहेत. भारतात केरळमधील कासारगोड जिल्ह्यात तर १९७६ ते २००० या कालावधीत शेकडो जणांचे मृत्यू झाले होते. आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्येही असे प्रकार घडले आहेत. अगदी अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशातही कीटकनाशक फवारणीने बळी घेतले आहेत.महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेहमीच्या शासकीय शिरस्त्यानुसार विशेष तपासणी पथकाचे (एसआयटी) गठन केले आहे. अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांनीही चौकशी करून अहवाल सादर केला आहे. अर्थात, अशा अहवालांचे पुढे काय होते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.विक्रेत्यांनी शेतकºयांना दिलेले एकापेक्षा जास्त कीटकनाशकांचे मिश्रण फवारण्याचे सल्ले, कीटकनाशकांची अनधिकृत विक्री, उच्च क्षमतेच्या फवारणी पंपांचा वापर, संरक्षणात्मक उपाययोजनांचा अभाव, अप्रमाणित कीटकनाशकांचा वापर या कारणांमुळेच विदर्भात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. त्यातही अप्रमाणित कीटकनाशकांचा वापरच खºया अर्थाने घातक ठरल्याचे सुस्पष्ट आहे. अशा घातक कीटकनाशकांचे उत्पादन होते कसे, ती बाजारात विक्रीसाठी पोहोचतात कशी, हा खरा कळीचा प्रश्न आहे. गतवर्षीच्या अखेरीस भारत सरकारने १८ कीटकनाशकांवर बंदी घातली खरी; पण आरोग्य आणि पर्यावरणविषयक चिंतांमुळे जगभर बंदी घालण्यात आलेली ४८ कीटकनाशके अद्यापही भारतात सर्रास वापरल्या जातात. त्यापैकी काही कीटकनाशकांवर तर आपल्याच देशातील काही राज्यांमध्ये बंदी आहे; पण भारत सरकारने बंदी न लादल्याने उर्वरित राज्यांमध्ये ती बेधडक वापरल्या जातात.आपल्या देशातील शेतकरी प्रामुख्याने अशिक्षित वा अल्प शिक्षित आहे. परिणामी कीटकनाशक वापरातील आरोग्य वा पर्यावरणविषयक धोक्यांविषयी तो जागृत नाही. किरकोळ विक्रेता जे सांगेल त्यावर तो विश्वास ठेवतो. सर्वच नसले, तरी अनेक विक्रेते, उत्पादकांकडून दाखविल्या जाणाºया आमिषांना बळी पडून शेतकºयांना चुकीचे मार्गदर्शन करतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे केंद्र सरकारने धोकादायक कीटकनाशकांवर संपूर्ण देशात सरसकट बंदी लादणे, हाच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठीचा एकमेव पर्याय आहे.  

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार