शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
3
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
4
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
5
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
6
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
7
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
8
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
9
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
10
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
11
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
12
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
13
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
14
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
15
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
16
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
17
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
18
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
19
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
20
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक कीटकनाशकांवर बंदी का नाही?

By रवी ताले | Updated: October 17, 2017 00:21 IST

आरोग्य व पर्यावरणाच्या रक्षणासाठी धोकादायक कीटकनाशकांवर बंदीच हवी! मोठ्या प्रमाणातील शेतकरी-शेतमजूर मृत्यूंच्या बातम्यांसाठी विदर्भ पुन्हा एकदा राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहे. फरक एवढाच, की यापूर्वी शेतकरी आत्महत्या हा मुद्दा होता, तर यावेळी कीटकनाशक फवारणीमुळे होत असलेले मृत्यू हा मुद्दा आहे.

मोठ्या प्रमाणातील शेतकरी-शेतमजूर मृत्यूंच्या बातम्यांसाठी विदर्भ पुन्हा एकदा राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहे. फरक एवढाच, की यापूर्वी शेतकरी आत्महत्या हा मुद्दा होता, तर यावेळी कीटकनाशक फवारणीमुळे होत असलेले मृत्यू हा मुद्दा आहे. कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्यांची संख्या आता अर्धशतक पार करण्याच्या बेतात आहे.सर्वप्रथम यवतमाळ जिल्ह्यातून आणि पुढे अकोला, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांमधूनही फवारणीच्या बळींच्या बातम्या येण्यास प्रारंभ झाला, तेव्हा एकच खळबळ उडाली. कीटकनाशकांची फवारणी तर वर्षानुवर्षांपासून होत आहे, मग यावर्षीच मृत्यू का होत आहे, अशी चर्चा सुरू झाली. त्याची कारणेही यथावकाश समोर आली. वस्तुस्थिती ही आहे, की कीटकनाशक फवारणीने विदर्भात जरी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात बळी घेतले असले तरी हे आक्रित जगात प्रथमच घडले असे नाही. जगात इतरत्र यापूर्वी अनेकदा कीटकनाशक फवारणीने मोठ्या प्रमाणात बळी घेतले आहेत. भारतात केरळमधील कासारगोड जिल्ह्यात तर १९७६ ते २००० या कालावधीत शेकडो जणांचे मृत्यू झाले होते. आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्येही असे प्रकार घडले आहेत. अगदी अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशातही कीटकनाशक फवारणीने बळी घेतले आहेत.महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेहमीच्या शासकीय शिरस्त्यानुसार विशेष तपासणी पथकाचे (एसआयटी) गठन केले आहे. अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांनीही चौकशी करून अहवाल सादर केला आहे. अर्थात, अशा अहवालांचे पुढे काय होते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.विक्रेत्यांनी शेतकºयांना दिलेले एकापेक्षा जास्त कीटकनाशकांचे मिश्रण फवारण्याचे सल्ले, कीटकनाशकांची अनधिकृत विक्री, उच्च क्षमतेच्या फवारणी पंपांचा वापर, संरक्षणात्मक उपाययोजनांचा अभाव, अप्रमाणित कीटकनाशकांचा वापर या कारणांमुळेच विदर्भात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. त्यातही अप्रमाणित कीटकनाशकांचा वापरच खºया अर्थाने घातक ठरल्याचे सुस्पष्ट आहे. अशा घातक कीटकनाशकांचे उत्पादन होते कसे, ती बाजारात विक्रीसाठी पोहोचतात कशी, हा खरा कळीचा प्रश्न आहे. गतवर्षीच्या अखेरीस भारत सरकारने १८ कीटकनाशकांवर बंदी घातली खरी; पण आरोग्य आणि पर्यावरणविषयक चिंतांमुळे जगभर बंदी घालण्यात आलेली ४८ कीटकनाशके अद्यापही भारतात सर्रास वापरल्या जातात. त्यापैकी काही कीटकनाशकांवर तर आपल्याच देशातील काही राज्यांमध्ये बंदी आहे; पण भारत सरकारने बंदी न लादल्याने उर्वरित राज्यांमध्ये ती बेधडक वापरल्या जातात.आपल्या देशातील शेतकरी प्रामुख्याने अशिक्षित वा अल्प शिक्षित आहे. परिणामी कीटकनाशक वापरातील आरोग्य वा पर्यावरणविषयक धोक्यांविषयी तो जागृत नाही. किरकोळ विक्रेता जे सांगेल त्यावर तो विश्वास ठेवतो. सर्वच नसले, तरी अनेक विक्रेते, उत्पादकांकडून दाखविल्या जाणाºया आमिषांना बळी पडून शेतकºयांना चुकीचे मार्गदर्शन करतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे केंद्र सरकारने धोकादायक कीटकनाशकांवर संपूर्ण देशात सरसकट बंदी लादणे, हाच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठीचा एकमेव पर्याय आहे.  

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार