शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

धोकादायक कीटकनाशकांवर बंदी का नाही?

By रवी ताले | Updated: October 17, 2017 00:21 IST

आरोग्य व पर्यावरणाच्या रक्षणासाठी धोकादायक कीटकनाशकांवर बंदीच हवी! मोठ्या प्रमाणातील शेतकरी-शेतमजूर मृत्यूंच्या बातम्यांसाठी विदर्भ पुन्हा एकदा राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहे. फरक एवढाच, की यापूर्वी शेतकरी आत्महत्या हा मुद्दा होता, तर यावेळी कीटकनाशक फवारणीमुळे होत असलेले मृत्यू हा मुद्दा आहे.

मोठ्या प्रमाणातील शेतकरी-शेतमजूर मृत्यूंच्या बातम्यांसाठी विदर्भ पुन्हा एकदा राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहे. फरक एवढाच, की यापूर्वी शेतकरी आत्महत्या हा मुद्दा होता, तर यावेळी कीटकनाशक फवारणीमुळे होत असलेले मृत्यू हा मुद्दा आहे. कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्यांची संख्या आता अर्धशतक पार करण्याच्या बेतात आहे.सर्वप्रथम यवतमाळ जिल्ह्यातून आणि पुढे अकोला, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांमधूनही फवारणीच्या बळींच्या बातम्या येण्यास प्रारंभ झाला, तेव्हा एकच खळबळ उडाली. कीटकनाशकांची फवारणी तर वर्षानुवर्षांपासून होत आहे, मग यावर्षीच मृत्यू का होत आहे, अशी चर्चा सुरू झाली. त्याची कारणेही यथावकाश समोर आली. वस्तुस्थिती ही आहे, की कीटकनाशक फवारणीने विदर्भात जरी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात बळी घेतले असले तरी हे आक्रित जगात प्रथमच घडले असे नाही. जगात इतरत्र यापूर्वी अनेकदा कीटकनाशक फवारणीने मोठ्या प्रमाणात बळी घेतले आहेत. भारतात केरळमधील कासारगोड जिल्ह्यात तर १९७६ ते २००० या कालावधीत शेकडो जणांचे मृत्यू झाले होते. आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्येही असे प्रकार घडले आहेत. अगदी अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशातही कीटकनाशक फवारणीने बळी घेतले आहेत.महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेहमीच्या शासकीय शिरस्त्यानुसार विशेष तपासणी पथकाचे (एसआयटी) गठन केले आहे. अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांनीही चौकशी करून अहवाल सादर केला आहे. अर्थात, अशा अहवालांचे पुढे काय होते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.विक्रेत्यांनी शेतकºयांना दिलेले एकापेक्षा जास्त कीटकनाशकांचे मिश्रण फवारण्याचे सल्ले, कीटकनाशकांची अनधिकृत विक्री, उच्च क्षमतेच्या फवारणी पंपांचा वापर, संरक्षणात्मक उपाययोजनांचा अभाव, अप्रमाणित कीटकनाशकांचा वापर या कारणांमुळेच विदर्भात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. त्यातही अप्रमाणित कीटकनाशकांचा वापरच खºया अर्थाने घातक ठरल्याचे सुस्पष्ट आहे. अशा घातक कीटकनाशकांचे उत्पादन होते कसे, ती बाजारात विक्रीसाठी पोहोचतात कशी, हा खरा कळीचा प्रश्न आहे. गतवर्षीच्या अखेरीस भारत सरकारने १८ कीटकनाशकांवर बंदी घातली खरी; पण आरोग्य आणि पर्यावरणविषयक चिंतांमुळे जगभर बंदी घालण्यात आलेली ४८ कीटकनाशके अद्यापही भारतात सर्रास वापरल्या जातात. त्यापैकी काही कीटकनाशकांवर तर आपल्याच देशातील काही राज्यांमध्ये बंदी आहे; पण भारत सरकारने बंदी न लादल्याने उर्वरित राज्यांमध्ये ती बेधडक वापरल्या जातात.आपल्या देशातील शेतकरी प्रामुख्याने अशिक्षित वा अल्प शिक्षित आहे. परिणामी कीटकनाशक वापरातील आरोग्य वा पर्यावरणविषयक धोक्यांविषयी तो जागृत नाही. किरकोळ विक्रेता जे सांगेल त्यावर तो विश्वास ठेवतो. सर्वच नसले, तरी अनेक विक्रेते, उत्पादकांकडून दाखविल्या जाणाºया आमिषांना बळी पडून शेतकºयांना चुकीचे मार्गदर्शन करतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे केंद्र सरकारने धोकादायक कीटकनाशकांवर संपूर्ण देशात सरसकट बंदी लादणे, हाच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठीचा एकमेव पर्याय आहे.  

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार