शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
5
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
8
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
9
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
10
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
11
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
12
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
13
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
14
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
15
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

निर्बंधांचा हट्ट कशाला?; लस टोचा, मास्क घाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 9:41 AM

देशात ४७ % जनतेचेच पूर्ण लसीकरण झाले आहे. २०२१ अखेरपर्यंत सर्व देशाचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसतानाच आता त्यात बूस्टर डोस व १५ ते १८ वयोगटाच्या लसीकरणाचे नवे उद्दिष्ट समोर आले आहे.

- डॉ. अमोल अन्नदाते

कोरोनाचा भारतात शिरकाव होऊन दोन वर्षे उलटून गेल्यावर, तिसरी लाट सुरू असताना  अजूनही  सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने याचा कसा उपयोग करावा याचे नेमके सूत्र अजून गवसलेले नाही. त्यामुळेच ओमायक्रॉनच्या रूपाने आलेल्या तिसऱ्या लाटेत कडक निर्बंध, नाईट कर्फ्यू, जमाव बंदी, पार्शल लॉकडाऊन हे शब्द परत सर्वत्र घुमू लागले आहेत. परिणामकारक लसीचा पुरेसा साठा, उपचारांची दिशा, मृत्यूची जोखीम वाढवणारे नेमके घटक व दोन लाटांच्या चुकांमधून शिकलेली शिदोरी हाती असताना निर्बंध की प्रतिबंध व प्रभावी उपचार या पेचातून आता तरी बाहेर पडायला हवे.

देशात ४७ % जनतेचेच पूर्ण लसीकरण झाले आहे. २०२१ अखेरपर्यंत सर्व देशाचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसतानाच आता त्यात बूस्टर डोस व १५ ते १८ वयोगटाच्या लसीकरणाचे नवे उद्दिष्ट समोर आले आहे. ‘हर घर दस्तक’ हे ऐकायला छान वाटत असले तरी  दुसऱ्या डोसची तारीख उलटूनही तो न घेणाऱ्यांना शोधून त्यांना लस दिली तरी तिसऱ्या लाटेत मृत्युदर बराच कमी होईल. महाराष्ट्रात ही संख्या १ कोटीपर्यंत पोहोचली आहे. निर्बंध, रात्रीची संचारबंदी यात ऊर्जा घालविण्यापेक्षा बूस्टर डोस, १५ ते १८ वयोगटाला व दुसरा डोस चुकविलेल्यांना तो देणे असे लसीकरणाचे उद्दिष्ट रोज पूर्ण करणारे तीन उच्च स्तरीय प्रशासकीय गट निर्माण केले तर ते जास्त फायदेशीर ठरेल.

डेल्टापेक्षा ओमायक्रॉन  हा सत्तरपट जास्त  झपाट्याने पसरतो. म्हणजेच दैनंदिन काम बंद करा किंवा करू नका, त्याच्या प्रसारात फारसा फरक पडणार नाही. डेल्टापेक्षा ओमायक्रॉनमध्ये आजाराची तीव्रता कमी आहे. रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. ज्यांनी लस घेतलेली नाही तेच गंभीर होऊन रुग्णालयात दाखल होत आहेत. असे असताना निर्बंध फारसे उपयोगी ठरणार नाहीत. लाट सुरू असेपर्यंत दोन मास्क वापरल्यास ते प्रभावी लसीकरणच ठरणार आहे.

केसेसचा चढता आलेख पाहता मास्क न घालता घराबाहेर पडणे म्हणजे आत्मघात व कुटुंबाच्या जीवाशी खेळणे आहे हे सर्वसामान्यांच्या मनावर बिंबविण्यात आपण अपयशी ठरत आहोत. ऑनलाईन शाळांमुळे हवालदिल झालेले पालक व विद्यार्थ्यांना नुकत्याच शाळा सुरू झाल्याने थोडा दिलासा मिळाला होता. पण, शाळा पुन्हा बंद झाल्याने मुलांचे मोठे शैक्षणिक, मानसिक नुकसान होणार आहे. लहान मुलांमध्ये संसर्ग हा लक्षणविरहित किंवा सौम्य आहे. तसेच घरातील मोठ्यांसाठीही संसर्गाचा मुख्य स्रोत हा मुलांच्या शाळा नाहीत हे संशोधनात  सिद्ध झाले आहे.  

घरातील मोठ्यांचे लसीकरण झालेले असेल तर त्या घरातील मुलांनी तरी शाळेत जायला काहीच हरकत नाही. निर्बंधांच्या नावावर मुले शाळेत नाहीत; पण मर्यादित वेळेत बाजारहाट सुरू असताना मॉलमध्ये किंवा सिनेमागृहात मात्र पालकांसोबत मुले असतात. अशा अर्धवट निर्बंधांमुळे शाळा बंद ठेवण्यासाठी कुठल्याही युक्तिवादाचे समर्थन करता येणार नाही. हेच काहीशा प्रमाणात महाविद्यालयांच्या बाबतीतही खरे आहे.  धोरणशून्यतेचा कळस म्हणजे वैद्यकीय अभ्यासक्रमाशी निगडित एमबीबीएस, आयुष, नर्सिंग, फिजियोथेरपी ही महाविद्यालये बंद ठेवून त्यांनाही ऑनलाईन शिक्षण देणे. याउलट या विद्यार्थ्यांना साथीचा रोग पसरलेला असताना काम करण्याचे प्रशिक्षण देण्याची हीच वेळ आहे. त्याचा योग्य उपयोग करुन घ्यायला हवा.

सुरुवातीच्या काळात अंदाज नसल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण येऊ नये व गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढून खाटा अपुऱ्या पडू नये म्हणून केलेली तात्पुरती सोय म्हणजे निर्बंध / लॉकडाऊन.  बंद जागेत गर्दी होते व खुल्या जागेत दाटीवाटी होते तेव्हा संसर्ग वाढतो. सध्याच्या अर्धवट निर्बंधात प्रत्येक व्यक्ती संसर्गाची शक्यता असलेल्या कुठल्या ना कुठल्या ठिकाणी जातेच. सध्या संसर्गापेक्षा मृत्यू टाळणे हीच सगळ्यांची प्राथमिकता असायला हवी.ज्या प्रमाणात अर्धवट निर्बंध जनतेला सांगण्याचा व ते राबविण्याचा आटापिटा केला जातो त्या प्रमाणात निश्चित प्रतिबंध व उपचारांच्या बाबतीत उत्साह नसतो. कोरोना संदर्भातल्या धोरणांची दूरगामी दिशा निर्बंध सोडून प्रतिबंधाकडे वळणे आवश्यक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या