शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

कपड्यांना इस्त्री कशाला करता? सुरकुत्या छान असतात की!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 10:05 IST

आपल्या सर्व , विद्यार्थ्यांनी दर सोमवारी इस्त्री न केलेले कपडे वापरायचे, असा उपक्रम ‘सीएसआयआर’ या संस्थेने नुकताच सुरू केला आहे, त्यानिमित्ताने!

प्राची पाठक, पर्यावरण आणि शाश्वत विकासाच्या अभ्यासक -

वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद (सीएसआयआर) या संस्थेने एक  नवीन उपक्रम सुरू केला आहे. ‘रिंकल अच्छे है’, असं या उपक्रमाचं नाव. म्हणजे कपड्यांच्या सुरकुत्या छान आहेत की! या संस्थेच्या भारतभर सदतीस प्रयोगशाळा आहेत. तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी दर सोमवारी इस्त्री न केलेले कपडे वापरायचे, असा हा उपक्रम.हे करण्यामागे नेमका हेतू काय? याचा पर्यावरण संवर्धनाशी काय संबंध?  भारतातील जवळपास सत्तर टक्क्यांहून अधिक ऊर्जा ही कोळशापासून निर्माण होते.  आपण कपड्यांची एक जोडी इस्त्री करतो, तेव्हा दोनशे ग्रॅम कार्बन डायऑक्साइड वायू निर्माण होतो. एक इस्त्री ८०० ते १००० वॉट ऊर्जेवर चालते. ही ऊर्जा एका साध्या दिव्यापेक्षा जवळपास वीस ते तीस टक्के अधिक असते. कुटुंबातील ४ ते ५ सदस्यांसाठी समजा तासभर इस्त्री वापरली, तर एक किलोहून अधिक कार्बन डायऑक्साइड वायू उत्सर्जित होतो, अशी आकडेवारी संस्थेने दिली आहे. आठवड्यातून एक दिवस बिनाइस्त्रीचे कपडे घालायची आणि एकूणच कपड्यांना इस्त्री करायची सवय/गरज कमी केल्यास या छोट्याशा कृतीतून देखील पर्यावरण संवर्धनात हातभार लागू शकेल, असं संस्थेचं म्हणणं आहे. यातून वीज बचत देखील होईलच. १९४२ मध्ये दिल्ली येथे स्थापन झालेल्या या संस्थेने भारताच्या वैज्ञानिक विकासात भरपूर योगदान दिलेलं आहे. निवडणुकीत आपल्या बोटावर जी शाई लावतात, तीदेखील याच संस्थेत विविध प्रयोगांती तयार झाली आहे. यावर्षी जून ते ऑगस्ट या काळात संस्थेच्या सर्व प्रयोगशाळांमध्ये किमान दहा टक्के वीज बचत करण्याचं ध्येय आहे. आठवड्यातून एक दिवस इस्त्री न केलेले कपडे घालणं, या वरवर छोट्याशा दिसणाऱ्या एका कृतीतून आणि सवय बदलातून शाश्वत विकासाची एकेक पायरी चढता येईल, असं संस्थेचं म्हणणं आहे. जगभरात जीवनशैलीतील लहान-मोठ्या बदलांतून शाश्वत विकास कसा साधला जाईल, याबद्दल वेळोवेळी नावीन्यपूर्ण विचार मांडले जात असतात. पर्यावरण संवर्धनात जंगलतोड, प्रदूषण, ढासळती जैवविविधता, पाणीटंचाई असे अनेक मुद्दे असले, तरी पृथ्वीवर असलेली मानवी लोकसंख्या आणि तिला जगण्यासाठी लागणारे विविध घटक, सुविधा यांचाही ताण पर्यावरणावर पडत असतोच. आपल्या कृतीतून एक छोटी, सहज करण्याजोगी गोष्ट एरवी लहानशी वाटली, तरी ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे कामास येऊ शकते. आपल्याच वापरत्या कपड्यांचं ऑडिट घरातच करून पाहा. सतत कपड्यांची खरेदी सुरू असते, तरीही ऐनवेळी घालायला बरे कपडे नाहीतच, अशीच भावना अनेकांच्या मनात असते. कपड्यांचा पसारा आटोक्यात ठेवायला एक मंत्र खूप उपयोगी ठरू शकतो. आपल्याकडच्या कपड्यांमधले ऐंशी टक्के कपडे आपण फारसे वापरतच नाही. नेहमी वापरतो, ते वीस टक्के कपडे नेमके कोणते आहेत, ते आपल्याला का आवडतात, काय सोय, स्टाइल त्या कपड्यांमुळे मिळते, त्याचा विचार करून तसेच कपडे घ्यावे. म्हणजे नुसतेच पडून राहणारे, क्वचित वापरले जाणारे कपडे हळूहळू कमी होऊ लागतात. आहे ते नीट वापरले जाऊ लागतात. कपडे घरात पडू द्यायचे नाहीत, हे एकदा ठरवलं की आपली गरज किती कपड्यांची आहे, ते शोधून काढावं. जो आकडा येईल, त्यापेक्षा कमीच; पण चांगल्या दर्जाचे कपडे आपल्या कपाटात ठेवावेत. एकदाच आपली गरज नीट ठरवावी आणि पडून असलेले सगळे कपडे नीट करून कुणाला द्यावे, विकावे, इतर गोष्टींसाठी वापरावेत. मोकळा झालेला वॉर्डरोब तसाच मोकळा ठेवायचा आहे, हे आधी स्वतःवर बिंबवावं.  जितकं आपलं कपड्यांचं कपाट सुटसुटीत असेल, तितकं मोकळंढाकळं जगता येतं. गरज नेमकी ठरवून आणि हौस न मारता देखील हे साध्य होऊ शकते. आजकाल रिंकल फ्री कपडे देखील मिळतात, परंतु त्याचे धागे प्लास्टिकपासून तयार झालेले आहेत की कसं, ते तपासून घ्यावं. कपडे धुतानाच ते नीट वाळत घातले, तर सुती कपडे देखील नीट घडी करून ठेवता येतात आणि इस्त्री टाळता येते. डोक्यावरच्या टोपीपासून ते पायातल्या मोज्यांपर्यंत जे काय ‘कापड’ म्हणून आपण वापरतो, ते सगळंच एकदा आवरा.  त्याबाबत जागरूक होऊन सवयी बदलून घ्या. पर्यावरण संवर्धनात आपलाही खारीचा वाटा!     prachi333@hotmail.com

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाelectricityवीज