शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कपड्यांना इस्त्री कशाला करता? सुरकुत्या छान असतात की!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 10:05 IST

आपल्या सर्व , विद्यार्थ्यांनी दर सोमवारी इस्त्री न केलेले कपडे वापरायचे, असा उपक्रम ‘सीएसआयआर’ या संस्थेने नुकताच सुरू केला आहे, त्यानिमित्ताने!

प्राची पाठक, पर्यावरण आणि शाश्वत विकासाच्या अभ्यासक -

वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद (सीएसआयआर) या संस्थेने एक  नवीन उपक्रम सुरू केला आहे. ‘रिंकल अच्छे है’, असं या उपक्रमाचं नाव. म्हणजे कपड्यांच्या सुरकुत्या छान आहेत की! या संस्थेच्या भारतभर सदतीस प्रयोगशाळा आहेत. तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी दर सोमवारी इस्त्री न केलेले कपडे वापरायचे, असा हा उपक्रम.हे करण्यामागे नेमका हेतू काय? याचा पर्यावरण संवर्धनाशी काय संबंध?  भारतातील जवळपास सत्तर टक्क्यांहून अधिक ऊर्जा ही कोळशापासून निर्माण होते.  आपण कपड्यांची एक जोडी इस्त्री करतो, तेव्हा दोनशे ग्रॅम कार्बन डायऑक्साइड वायू निर्माण होतो. एक इस्त्री ८०० ते १००० वॉट ऊर्जेवर चालते. ही ऊर्जा एका साध्या दिव्यापेक्षा जवळपास वीस ते तीस टक्के अधिक असते. कुटुंबातील ४ ते ५ सदस्यांसाठी समजा तासभर इस्त्री वापरली, तर एक किलोहून अधिक कार्बन डायऑक्साइड वायू उत्सर्जित होतो, अशी आकडेवारी संस्थेने दिली आहे. आठवड्यातून एक दिवस बिनाइस्त्रीचे कपडे घालायची आणि एकूणच कपड्यांना इस्त्री करायची सवय/गरज कमी केल्यास या छोट्याशा कृतीतून देखील पर्यावरण संवर्धनात हातभार लागू शकेल, असं संस्थेचं म्हणणं आहे. यातून वीज बचत देखील होईलच. १९४२ मध्ये दिल्ली येथे स्थापन झालेल्या या संस्थेने भारताच्या वैज्ञानिक विकासात भरपूर योगदान दिलेलं आहे. निवडणुकीत आपल्या बोटावर जी शाई लावतात, तीदेखील याच संस्थेत विविध प्रयोगांती तयार झाली आहे. यावर्षी जून ते ऑगस्ट या काळात संस्थेच्या सर्व प्रयोगशाळांमध्ये किमान दहा टक्के वीज बचत करण्याचं ध्येय आहे. आठवड्यातून एक दिवस इस्त्री न केलेले कपडे घालणं, या वरवर छोट्याशा दिसणाऱ्या एका कृतीतून आणि सवय बदलातून शाश्वत विकासाची एकेक पायरी चढता येईल, असं संस्थेचं म्हणणं आहे. जगभरात जीवनशैलीतील लहान-मोठ्या बदलांतून शाश्वत विकास कसा साधला जाईल, याबद्दल वेळोवेळी नावीन्यपूर्ण विचार मांडले जात असतात. पर्यावरण संवर्धनात जंगलतोड, प्रदूषण, ढासळती जैवविविधता, पाणीटंचाई असे अनेक मुद्दे असले, तरी पृथ्वीवर असलेली मानवी लोकसंख्या आणि तिला जगण्यासाठी लागणारे विविध घटक, सुविधा यांचाही ताण पर्यावरणावर पडत असतोच. आपल्या कृतीतून एक छोटी, सहज करण्याजोगी गोष्ट एरवी लहानशी वाटली, तरी ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे कामास येऊ शकते. आपल्याच वापरत्या कपड्यांचं ऑडिट घरातच करून पाहा. सतत कपड्यांची खरेदी सुरू असते, तरीही ऐनवेळी घालायला बरे कपडे नाहीतच, अशीच भावना अनेकांच्या मनात असते. कपड्यांचा पसारा आटोक्यात ठेवायला एक मंत्र खूप उपयोगी ठरू शकतो. आपल्याकडच्या कपड्यांमधले ऐंशी टक्के कपडे आपण फारसे वापरतच नाही. नेहमी वापरतो, ते वीस टक्के कपडे नेमके कोणते आहेत, ते आपल्याला का आवडतात, काय सोय, स्टाइल त्या कपड्यांमुळे मिळते, त्याचा विचार करून तसेच कपडे घ्यावे. म्हणजे नुसतेच पडून राहणारे, क्वचित वापरले जाणारे कपडे हळूहळू कमी होऊ लागतात. आहे ते नीट वापरले जाऊ लागतात. कपडे घरात पडू द्यायचे नाहीत, हे एकदा ठरवलं की आपली गरज किती कपड्यांची आहे, ते शोधून काढावं. जो आकडा येईल, त्यापेक्षा कमीच; पण चांगल्या दर्जाचे कपडे आपल्या कपाटात ठेवावेत. एकदाच आपली गरज नीट ठरवावी आणि पडून असलेले सगळे कपडे नीट करून कुणाला द्यावे, विकावे, इतर गोष्टींसाठी वापरावेत. मोकळा झालेला वॉर्डरोब तसाच मोकळा ठेवायचा आहे, हे आधी स्वतःवर बिंबवावं.  जितकं आपलं कपड्यांचं कपाट सुटसुटीत असेल, तितकं मोकळंढाकळं जगता येतं. गरज नेमकी ठरवून आणि हौस न मारता देखील हे साध्य होऊ शकते. आजकाल रिंकल फ्री कपडे देखील मिळतात, परंतु त्याचे धागे प्लास्टिकपासून तयार झालेले आहेत की कसं, ते तपासून घ्यावं. कपडे धुतानाच ते नीट वाळत घातले, तर सुती कपडे देखील नीट घडी करून ठेवता येतात आणि इस्त्री टाळता येते. डोक्यावरच्या टोपीपासून ते पायातल्या मोज्यांपर्यंत जे काय ‘कापड’ म्हणून आपण वापरतो, ते सगळंच एकदा आवरा.  त्याबाबत जागरूक होऊन सवयी बदलून घ्या. पर्यावरण संवर्धनात आपलाही खारीचा वाटा!     prachi333@hotmail.com

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाelectricityवीज