शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

आम्ही भान का विसरतो ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 12:55 PM

मिलिंद कुलकर्णी कोरोना विषाणूशी सारे जग लढा देत असताना आणि आम्ही भारतीय लोकदेखील समर्थ आणि सशक्तपणे मुकाबला करीत असताना ...

मिलिंद कुलकर्णीकोरोना विषाणूशी सारे जग लढा देत असताना आणि आम्ही भारतीय लोकदेखील समर्थ आणि सशक्तपणे मुकाबला करीत असताना काही मोजक्या मंडळींच्या अविवेकी कृत्यामुळे धोकेदायक स्थिती निर्माण होऊ पहात आहे. सामाजिक भान आम्हाला कधी येणार असा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.जनता संचारबंदी पाळून संयम आणि संकल्पाचा परिचय द्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्याला भारतीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देखील दिला. ही जनता संचारबंदी का, याविषयी कारणमिमांसा पंतप्रधानांनी राष्टÑाला उद्देशून केलेल्या भाषणात केली होती. भारतीय जनतेने त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सायंकाळी ५ वाजता टाळ्या, थाळ्या वाजवून शंखनाद, घंटानाद केला. कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या डॉक्टरांपासून तर सगळ्या घटकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविला. आणि त्यात संपूर्ण देश सहभागी झाला. ही वेगळी अनुभूती होती. कोरोनाशी लढण्यासाठी देश सज्ज असल्याचे चित्र यानिमित्त निर्माण झाले. मात्र रात्री ९ वाजेनंतर कोरोनावर विजय मिळविल्याचा आनंद साजरा केल्यासारखी गर्दी रस्त्यांवर दिसून आली. लॉकडाऊन आणि संचारबंदी जारी केली असतानाही सोमवारी भाजीबाजारापासून तर बँकापर्यंत रांगा लागलेल्या दिसून आल्या. कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे, हे विसरुन आम्ही वागत आहोत.पंतप्रधानांच्या जनता संचारबंदी व टाळ्या वाजविण्याच्या उपक्रमातून जनतेला कोरोनाविषयी लढण्याचे गांभीर्य आणि मानसिकता असे दोन्ही जाणवले, हा फार मोठा फायदा होता. परंतु, त्या उपक्रमाची खिल्ली उडविण्यात काही महाभाग होतेच. अर्थात महात्मा गांधी यांनी काढलेली दांडीयात्रा आणि मूठभर मिठ उचलण्याचा प्रयोग, सविनय कायदेभंग, विदेशी कपड्यांची होळी अशा प्रयोगांची खिल्ली उडविणारी मंडळी तेव्हाही होतीच आणि आताही आहेच. त्याच पंक्तीतील ही मंडळी आहे, हे दिसून आले.कोरोनाचे संकट हे सामान्यांच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, ही जाणीव असल्याने पंतप्रधानांनी ‘जनता संचारबंदी’चा उपक्रम राबविला. त्यात कोणताही पक्ष, व्यक्तीचे स्तोम माजविण्याचा प्रयत्न नव्हता. परंतु, काही उतावीळ महाभागांनी ‘मोदीं’चा जयजयकार करीत विजयी रॅली काढली. अशा प्रकाराने मूळ उपक्रमाचे गांभीर्य हरवते, हे तरी मोदीप्रेमी मंडळींनी लक्षात घ्यायला हवे.सगळ्यात गंभीर प्रकार म्हणजे रावेरमधील जातीय दंगल. कोरोनाचे संकट समोर असतानाही आम्ही जाती-धर्माचे जोखड घेऊन एकमेकांची डोकी फोडत आहोत, हे कशाचे लक्षण आहे? कोरोनाचे संकट हे जात-धर्मापलिकडचे संकट असताना त्याच्याशी लढण्याऐवजी आम्ही एकमेकांविरुध्द लढून शक्तीपात करीत आहोत. संचारबंदी, लॉकडाऊनसारख्या निर्बंधाचे पालन करण्यात व्यग्र असणाºया महसूल व पोलीस प्रशासनाचे कामदेखील अशा दंगलींमुळे वाढत आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेला प्रयत्न करावे लागले. कोरोना राहिले बाजूला आणि सगळ्यांना दंगल काबूत आणण्यासाठी झटावे लागले. संकटाचे गांभीर्य आणि सामाजिक भान नसल्याचा हा परिपाक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव