शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...

By विजय दर्डा | Updated: May 6, 2024 07:59 IST

या माणसाचे व्यक्तिमत्त्व असे की, त्यांच्याविना काँग्रेसचे पान हलत नाही, त्यांचे नाव घेतल्याविना भाजपलाही चैन पडत नाही!

डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

वायनाडव्यतिरिक्त राहुल गांधी आणखी कोठून निवडणूक लढवतील याची अखंड चर्चा या निवडणुकीत झाली. चर्चा अमेठीविषयीही होतीच. १५ वर्षे खासदार राहिल्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत राहुल यांना अमेठीत पराभवाचा सामना करावा लागला होता. अमेठीशी गांधी परिवाराचे जुने नाते आहे. संजय गांधी १९८० मध्ये अमेठीतून निवडून आले. त्यानंतर तीन वेळा राजीव गांधी, एकदा सोनिया गांधी आणि तीन वेळा राहुल गांधी यांना या मतदारसंघाने लोकसभेत पाठवले.  परंतु, यावेळी राहुल गांधी अमेठीतून का उभे राहिले नाहीत? ‘हा मतदारसंघ तुमच्यासाठी सुरक्षित नाही?’ असे त्यांच्या हितचिंतकांनी सांगितले असेल का? माझ्या मते  त्यांनी अमेठीतून निवडणूक लढवायला हवी होती. यावेळी निवडूनही आले असते.

काँग्रेसने गांधी कुटुंबाचे निकटवर्ती किशोरीलाल शर्मा यांना अमेठीतून मैदानात उतरवले आहे. प्रियांका गांधी अमेठीतून निवडणूक लढवतील असा अंदाज होता, पण आपण किशोरीलाल शर्मा यांचा जोरदार प्रचार करू, असे त्या म्हणतात. प्रियांका खुद्द मैदानात असत्या तर विजयाची शक्यता नक्कीच बळकट झाली असती. त्या निवडणूक लढवत नाहीत आणि राहुल यांनी रायबरेलीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

गांधी-नेहरू कुटुंबाची पाळेमुळे रायबरेलीत जास्त जुनी आणि खोलवर गेलेली आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत फिरोज गांधी रायबरेलीतूनच संसदेत पोहोचले होते. इंदिरा गांधी तीनवेळा येथून निवडणूक जिंकल्या. सोनिया गांधींनी २००४ पासून सलग चार वेळा रायबरेलीचे प्रतिनिधित्व केले. रायबरेलीत राहुल गांधी यांनी  गाजावाजा करत उमेदवारी अर्ज भरला. 

भाजपचे एक महोदय उपहासाने मला म्हणाले, ‘राहुल गांधी तर म्हणत होते ईडीने काँग्रेसचे बॅंक खाते सील केले आहे; आणि त्यांच्याकडे रेल्वेचे तिकीट घ्यायलासुद्धा पैसे नाहीत. मग ते स्वतः विमानातून कसे आले?’ - त्या विमानात  अशोक गहलोत आणि केसी वेणुगोपालही  होते. दुसऱ्या विमानातून सोनिया गांधी, प्रियांका, रॉबर्ट वड्रा आणि तिसऱ्या विमानातून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही रायबरेलीत आले.  किशोरीलाल शर्मा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी यांच्यापैकी कोणीही अमेठीमध्ये गेले नव्हते, हे भाजपच्या ‘त्या’ महोदयांनी मला ऐकवलेच!- ते कसली संधी सोडतात? पुढे जाऊन भाजपने तर असाही दावा करून टाकला की राहुल गांधी घाबरून वायनाडमधून पळाले. ‘आमच्या तगड्या उमेदवारासमोर राहुल गांधी यांचे निवडून येणे कठीण आहे’, असे केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी म्हटले असले, तरी राहुल यांच्या तिथल्या विजयाची शक्यता बळकट आहे!

- समजा, राहुल गांधी दोन्ही जागांवर निवडणूक जिंकले तर ते कोणती जागा ठेवतील? माझ्या मते, कुटुंबाची परंपरागत जागा म्हणून रायबरेलीला ते प्राधान्य देतील. उत्तर प्रदेशावर कब्जा होत नाही तोपर्यंत देशावर राज्य करण्याचा विचार करणेही अशक्य होय, हे ते जाणतात.राहुल गांधी भले काँग्रेसचे अध्यक्ष नसोत, पण त्यांच्याशिवाय काँग्रेसचे पान हलत नाही आणि दुसरीकडे भाजपचेही त्यांच्यावाचून अडतेच!  पंतप्रधानांपासून प्रत्येक मोठ्या नेत्याचे भाषण राहुल गांधी यांचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यांना ‘पप्पू’ ठरवण्याचे प्रयत्न झालेच! मी म्हणतो, एखादी व्यक्ती तुमच्यासाठी इतकी अयोग्य असेल तर  पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीचे नाव का घेता? परंतु, राहुल गांधी यांच्याकडे दुर्लक्ष करणे शक्य नाही. देशाच्या निर्माणात गांधी कुटुंबाचे योगदान आणि त्या कुटुंबाने केलेले प्राणार्पण कसे विसरता येईल? लालकृष्ण अडवाणी एकदा मला म्हणाले होते, ‘काँग्रेसला आमचा राजकीय विरोध आहे. परंतु, ते आमचे शत्रू नाहीत. आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही!’

हल्ली अनेक लोक राहुल गांधींच्या वेशभूषेवरही टिप्पणी करतात. राजीव गांधी अतिशय आधुनिक होते; परंतु राजकारणात आल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या खादीचा स्वीकार केला, सोनियाही साडी नेसायला लागल्या. परंतु, राहुल अल्ट्रा मॉडर्न आहेत. ते तरुण वेशभूषेत असतात.  खरेतर, राजकारणात पोशाखाला खूप महत्त्व असते, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. 

ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद, मिलिंद देवरा, टी पी सिन्हा यांच्यासारखे त्यांचे निकटचे मित्र त्यांची साथ सोडून गेले. हे लोक राहुल गांधी यांच्या स्वभावामुळे दूर गेले की त्यांना आपले भविष्य असुरक्षित वाटू लागले होते म्हणून? राहुल यांच्या आजूबाजूला जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेत त्यांची घुसमट होत होती का? बरेच लोक काँग्रेस सोडून गेले. सोनिया गांधींना प्रकृती त्रास देते आहे. तरीही चिकाटीने लढणाऱ्या राहुल आणि प्रियांका यांचा सामना  भाजपशी आहे. नरेंद्र मोदी यांच्या ‘चमत्कारी’ नेतृत्वाने या पक्षाला शिखरावर नेऊन ठेवले आहे. अमित शाह आणि  योगी आदित्यनाथ यांच्यासारखे राजकारणाचे धुरंधर खेळाडू मोदींबरोबर आहेत. काँग्रेसच्या भात्यातून एखादा बाण निघण्याचा अवकाश, भाजपचा बाण निशाण्यावर लागलेलाही असतो. या लढाईत यशस्वी होण्यासाठी राहुल गांधी यांच्याजवळ हिंमत आहे, परंतु सशक्त सेना  नाही. पक्षाची नव्याने बांधणी होत नाही, तोवर अशी सेना उभी राहू शकत नाही. या पक्षाचे उमेदवार व्यक्तिगत गुणवत्तेवर निवडून येतात. काँग्रेस पक्षाला बलशाली बनवण्याचे आव्हान पेलणे तूर्तास अजिबात सोपे नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीrae-bareli-pcरायबरेलीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४