शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...

By विजय दर्डा | Updated: May 6, 2024 07:59 IST

या माणसाचे व्यक्तिमत्त्व असे की, त्यांच्याविना काँग्रेसचे पान हलत नाही, त्यांचे नाव घेतल्याविना भाजपलाही चैन पडत नाही!

डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

वायनाडव्यतिरिक्त राहुल गांधी आणखी कोठून निवडणूक लढवतील याची अखंड चर्चा या निवडणुकीत झाली. चर्चा अमेठीविषयीही होतीच. १५ वर्षे खासदार राहिल्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत राहुल यांना अमेठीत पराभवाचा सामना करावा लागला होता. अमेठीशी गांधी परिवाराचे जुने नाते आहे. संजय गांधी १९८० मध्ये अमेठीतून निवडून आले. त्यानंतर तीन वेळा राजीव गांधी, एकदा सोनिया गांधी आणि तीन वेळा राहुल गांधी यांना या मतदारसंघाने लोकसभेत पाठवले.  परंतु, यावेळी राहुल गांधी अमेठीतून का उभे राहिले नाहीत? ‘हा मतदारसंघ तुमच्यासाठी सुरक्षित नाही?’ असे त्यांच्या हितचिंतकांनी सांगितले असेल का? माझ्या मते  त्यांनी अमेठीतून निवडणूक लढवायला हवी होती. यावेळी निवडूनही आले असते.

काँग्रेसने गांधी कुटुंबाचे निकटवर्ती किशोरीलाल शर्मा यांना अमेठीतून मैदानात उतरवले आहे. प्रियांका गांधी अमेठीतून निवडणूक लढवतील असा अंदाज होता, पण आपण किशोरीलाल शर्मा यांचा जोरदार प्रचार करू, असे त्या म्हणतात. प्रियांका खुद्द मैदानात असत्या तर विजयाची शक्यता नक्कीच बळकट झाली असती. त्या निवडणूक लढवत नाहीत आणि राहुल यांनी रायबरेलीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

गांधी-नेहरू कुटुंबाची पाळेमुळे रायबरेलीत जास्त जुनी आणि खोलवर गेलेली आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत फिरोज गांधी रायबरेलीतूनच संसदेत पोहोचले होते. इंदिरा गांधी तीनवेळा येथून निवडणूक जिंकल्या. सोनिया गांधींनी २००४ पासून सलग चार वेळा रायबरेलीचे प्रतिनिधित्व केले. रायबरेलीत राहुल गांधी यांनी  गाजावाजा करत उमेदवारी अर्ज भरला. 

भाजपचे एक महोदय उपहासाने मला म्हणाले, ‘राहुल गांधी तर म्हणत होते ईडीने काँग्रेसचे बॅंक खाते सील केले आहे; आणि त्यांच्याकडे रेल्वेचे तिकीट घ्यायलासुद्धा पैसे नाहीत. मग ते स्वतः विमानातून कसे आले?’ - त्या विमानात  अशोक गहलोत आणि केसी वेणुगोपालही  होते. दुसऱ्या विमानातून सोनिया गांधी, प्रियांका, रॉबर्ट वड्रा आणि तिसऱ्या विमानातून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही रायबरेलीत आले.  किशोरीलाल शर्मा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी यांच्यापैकी कोणीही अमेठीमध्ये गेले नव्हते, हे भाजपच्या ‘त्या’ महोदयांनी मला ऐकवलेच!- ते कसली संधी सोडतात? पुढे जाऊन भाजपने तर असाही दावा करून टाकला की राहुल गांधी घाबरून वायनाडमधून पळाले. ‘आमच्या तगड्या उमेदवारासमोर राहुल गांधी यांचे निवडून येणे कठीण आहे’, असे केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी म्हटले असले, तरी राहुल यांच्या तिथल्या विजयाची शक्यता बळकट आहे!

- समजा, राहुल गांधी दोन्ही जागांवर निवडणूक जिंकले तर ते कोणती जागा ठेवतील? माझ्या मते, कुटुंबाची परंपरागत जागा म्हणून रायबरेलीला ते प्राधान्य देतील. उत्तर प्रदेशावर कब्जा होत नाही तोपर्यंत देशावर राज्य करण्याचा विचार करणेही अशक्य होय, हे ते जाणतात.राहुल गांधी भले काँग्रेसचे अध्यक्ष नसोत, पण त्यांच्याशिवाय काँग्रेसचे पान हलत नाही आणि दुसरीकडे भाजपचेही त्यांच्यावाचून अडतेच!  पंतप्रधानांपासून प्रत्येक मोठ्या नेत्याचे भाषण राहुल गांधी यांचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यांना ‘पप्पू’ ठरवण्याचे प्रयत्न झालेच! मी म्हणतो, एखादी व्यक्ती तुमच्यासाठी इतकी अयोग्य असेल तर  पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीचे नाव का घेता? परंतु, राहुल गांधी यांच्याकडे दुर्लक्ष करणे शक्य नाही. देशाच्या निर्माणात गांधी कुटुंबाचे योगदान आणि त्या कुटुंबाने केलेले प्राणार्पण कसे विसरता येईल? लालकृष्ण अडवाणी एकदा मला म्हणाले होते, ‘काँग्रेसला आमचा राजकीय विरोध आहे. परंतु, ते आमचे शत्रू नाहीत. आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही!’

हल्ली अनेक लोक राहुल गांधींच्या वेशभूषेवरही टिप्पणी करतात. राजीव गांधी अतिशय आधुनिक होते; परंतु राजकारणात आल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या खादीचा स्वीकार केला, सोनियाही साडी नेसायला लागल्या. परंतु, राहुल अल्ट्रा मॉडर्न आहेत. ते तरुण वेशभूषेत असतात.  खरेतर, राजकारणात पोशाखाला खूप महत्त्व असते, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. 

ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद, मिलिंद देवरा, टी पी सिन्हा यांच्यासारखे त्यांचे निकटचे मित्र त्यांची साथ सोडून गेले. हे लोक राहुल गांधी यांच्या स्वभावामुळे दूर गेले की त्यांना आपले भविष्य असुरक्षित वाटू लागले होते म्हणून? राहुल यांच्या आजूबाजूला जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेत त्यांची घुसमट होत होती का? बरेच लोक काँग्रेस सोडून गेले. सोनिया गांधींना प्रकृती त्रास देते आहे. तरीही चिकाटीने लढणाऱ्या राहुल आणि प्रियांका यांचा सामना  भाजपशी आहे. नरेंद्र मोदी यांच्या ‘चमत्कारी’ नेतृत्वाने या पक्षाला शिखरावर नेऊन ठेवले आहे. अमित शाह आणि  योगी आदित्यनाथ यांच्यासारखे राजकारणाचे धुरंधर खेळाडू मोदींबरोबर आहेत. काँग्रेसच्या भात्यातून एखादा बाण निघण्याचा अवकाश, भाजपचा बाण निशाण्यावर लागलेलाही असतो. या लढाईत यशस्वी होण्यासाठी राहुल गांधी यांच्याजवळ हिंमत आहे, परंतु सशक्त सेना  नाही. पक्षाची नव्याने बांधणी होत नाही, तोवर अशी सेना उभी राहू शकत नाही. या पक्षाचे उमेदवार व्यक्तिगत गुणवत्तेवर निवडून येतात. काँग्रेस पक्षाला बलशाली बनवण्याचे आव्हान पेलणे तूर्तास अजिबात सोपे नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीrae-bareli-pcरायबरेलीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४