शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

यालाच बिहार म्हणतात का?

By admin | Updated: March 2, 2016 02:46 IST

दिनांक १७ फेब्रुवारी २०१६ पालम, जि. परभणीचे सहायक गटविकास अधिकारी विजेंद्र मुंडे यांचे विभागीय आयुक्तांना पत्र. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी

दिनांक १७ फेब्रुवारी २०१६ पालम, जि. परभणीचे सहायक गटविकास अधिकारी विजेंद्र मुंडे यांचे विभागीय आयुक्तांना पत्र. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामातील अनियमतता खपवून घेऊन ती मंजूर करण्यासाठी येणाऱ्या दबावामुळे एक तर बदली करावी किंवा निलंबित करावे.दिनांक : १९ फेब्रुवारी २०१६पानगाव, ता. रेणापूर, जि. लातूर, झेंडे लावण्यास विरोध करणारे पोलीस शिपाई युनूस शेख आणि रमेश अवसकर यांना जमावाकडून मारहाण.दिनांक : २१ फेब्रुवारी २०१६धानोरा, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद वाळूची तस्करी रोखण्यासाठी गेलेले मोढ्याचे तलाठी महेश बडके यांना तस्करांकडून मारहाण. मदतीसाठी गेलेल्या तहसीलदाराच्या जीपवर दगडफेक.गेल्या पंधरवड्यातील मराठवाड्यातील या प्रमुख घटनांकडे पाहताना एकच प्रश्न पडतो की, येथे प्रशासन आणि कायदा, सुव्यवस्था नावाची काही गोष्ट अस्तित्वात आहे का? आपले काम करण्यास तयार नसणारे पालमचे प्रभारी गटविकास अधिकारी मुंडे एकटेच नाहीत, तर जिंतूरचे अंकुश चव्हाण रजेवर गेले आहेत. त्यांचा कार्यभार प्रभारी गोरे यांच्याकडे सोपविला; पण तेसुद्धा रजेवर निघून गेले. सेलूचे गटविकास अधिकारी चंद्रमणी मोडक यांना गेल्या महिन्यात ‘मनरेगा’ कंत्राटदारांनी गाडीत टाकून नेले आणि काही बिलांवर बळजबरीने स्वाक्षऱ्या घेतल्या. ते रजेवर आहेत. गाडीत टाकून नेले म्हणजे स्पष्ट शब्दात त्यांचे अपहरण करण्यात आले. समजा त्यांनी बिलांवर स्वाक्षऱ्या केल्या नसत्या तर...? पूर्णा येथील जयश्री वाघमारे या बीडीओ याच दबाव, धमक्यांना कंटाळून दोन वेळा रजेवर गेल्या. बेकायदेशीर कामे नियमित करून त्याचे पैसे मिळविण्यासाठी कंत्राटदारांचे हे दबावतंत्र या पातळीपर्यंत पोहोचले. येथे दबाव हा शब्द सभ्य भाषेतील समजला जातो. खरे तर ती सरळसरळ धमकीच असते; पण बिहारमधील अपहरण, धमकी हे परवलीचे शब्द आपल्याकडे अजून रुळायचे बाकी आहेत. जिंतूरचे सहायक बीडीओ अतिरिक्त पदभार स्वीकारत नाहीत हे पाहून त्यांना पदावनत करण्याची नोटीस बजावण्यात आली. कदाचित ही पाळी कंत्राटदारांना कंटाळून रजेवर गेलेल्या इतर बीडीओंवर आज किंवा उद्या येऊ शकते. कंत्राटदारांची दांडगाई मोडून काढण्यासाठी या अधिकाऱ्यांना पाठबळ देण्याऐवजी प्रशासन त्यांनाच कोंडीत पकडत आहे. नोकरीशिवाय पर्याय नसल्याने मुंडेंनी बदलीची किंवा निलंबनाची मागणी केली. कारण निलंबित केले तरी निम्मा पगार मिळतो आणि कुटुंब उघड्यावर पडत नाही. ‘मनरेगा’ हे तर कुरणच बनले आहे.परभणी जिल्ह्यात या कुरणात ८३ कोटी ५६ लाख रुपये खर्ची पडले. या खाबूगिरीने आता मराठवाड्यात प्रशासन वेठीस धरले. येथे कायदा निष्प्रभ होण्याचा धोका निर्माण झाला आहे. एक तर त्यांच्यात सामील व्हा किंवा निमूटपणे खाली मान घालून काम करा, अशी ही स्थिती आहे. आपण अशा स्थितीला बिहारचे उदाहरण देतो; पण आता बिहार बदलला आहे आणि मराठवाडा त्या वाटेने जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. परभणीतील बीडीओ आणि डेप्युटी सीईओ यांनी तर पोलीस संरक्षणाची मागणी केली.वाळू हे आणखी एक कुरण मोकळे सोडले. यामुळे ग्रामीण भागातील कायदा, सुव्यवस्थेची पार वाट लागली आणि नदीकाठच्या गावांमध्ये वाळूमाफिया नावाचे नवे पीक फोफावले. त्यांची हिंमत एवढी वाढली की, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यासही ते मागेपुढे पाहत नाहीत. सिल्लोडमध्ये एवढेच घडले नाही, तर प्रशासनाने जप्त केलेली ४१६ ब्रास वाळूची या माफियांनी चोरी केली. म्हणजे प्रशासनाला ठेंगा दाखविण्यात या माफियांनी कसर सोडली नाही.- सुधीर महाजन