शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

साहेबांकडे जायला भीती का वाटते?

By यदू जोशी | Updated: October 16, 2017 00:27 IST

मंत्रालयातील लंच टाइम दीड तासांचा असतो. बरेच कर्मचारी दिवसभर अळमटळम करतात.वर्षभर सगळे सण साजरे होतात. फक्त सामान्यांचेच प्रश्न सोडविले जातील, असा एखादा आठवडा मंत्रालयात साजरा करता येईल का?

 मंत्र्यांच्या केबिनमध्ये सदैव गर्दी असते. मंत्री एकावेळी आठदहा जणांशी बोलून गा-हाणी समजून घेतात, पीए, पीएसना सूचना देत असतात. लगेच संबंधितांशी फोनवर बोलतात. प्रत्येकाचे समाधान करण्याचा त्यांचा आटापिटा चाललेला असतो. तरीही रोषाला तेच बळी पडतात. या उलटचे चित्र हे तलाठ्यापासून सचिवांपर्यंत दिसते. सामान्य माणूस काम घेऊन आला तर साहेबांचे पीए त्याला टरकवतात. ‘साहेब नाहीत, मिटिंगला गेलेत’ हे परवलीचे शब्द असतात. गोरगरिबांची सावलीही काही बड्या अधिका-यांना चालत नाही. तेच अधिकारी कंत्राटदारांना बरोबर भेटतात. सचिवांची दुस-या खात्यात बदली झाली की त्यांचे निष्ठावंत कंत्राटदार नवीन केबिनमध्ये दिसू लागतात. शेवटच्या माणसाशी निगडित असलेल्या एक सचिव त्यांच्या केबिनमध्ये कलर्स वाहिनीवरील मालिका बघत असतात. राज्याचे मुख्य सचिव भेटत नाहीत म्हणून नागपूरच्या एका अवलियाला हायकोर्टात जावे लागते! मुख्य सचिव संवेदनशील आहेत, साहित्यिक आहेत पण लोकांच्या मनातील अस्वस्थताही समजून घेतली पाहिजे. मंत्रालयात नागरिकांंच्या येण्यावर सुरक्षेच्या नावाखाली बंधने टाकण्यात आली आहेत. सुरक्षेपेक्षा कोणी मंत्रालयात येऊन विष घेईल आणि मग आपली बदनामी होईल याची सरकारला जास्त चिंता दिसते. अन् बाहेर किड्यांबरोबर शेतक-यांचा जीव घेणारी कीटकनाशके नोकरशाहीच्या कृपाछत्राखाली फोफावतात. भाकरीच्या चंद्रासाठी उभे आयुष्य वेचणाºया भूमिपुत्रांची ही आर्त कहाणी आहे. सामान्यांचा कुणी वाली नाही ही भावना वाढीस लागली आहे. तेव्हा सामान्यांच्या समस्यांची दखल घेण्यासाठी एखादे स्वतंत्र मंत्रालय सुरू करा. ‘पगारात भागवा’ इतकेच ‘सौजन्याने वागा’ अभियान राबवा. लोकभावनांचे बॉम्ब अन् पिस्तूल झाले तर बंड होईल.नागपूर जिल्ह्यातील तेजराज मंगल हा शिक्षक अन् त्याचा मुलगा वर्षभरापासून त्याच्यावरील उपचाराची भरपाई मिळावी म्हणून खेटे घालताहेत. मुजोर कर्मचारी त्याची फाईल एका टेबलवरून दुसºया टेबलवर हलवायलादेखील तयार नाहीत. असे हजारो मंगल दरदिवशी तहसीलदारापासून मंत्रालयाचे उंबरठे झिजवतात. लोकांना ‘अटेंड’ करणे हे एकच काम अधिकाºयांना नाही हे खरे पण किमान आलेल्यांच्या दु:खावर फुंकर घालायला तर वेळ देता येतो?शैलेंद्र परांजपे हे मुंबईत एक पत्रकार आहेत. ते पुण्यात असताना एकदा प्रख्यात समाजवादी नेते ग.प्र.प्रधान यांच्याकडे गेले. दबकतच बेल दाबली. शैलेंद्र म्हणाला ‘मी जरा भीतभीतच आलो. म्हटलं दुपारची; आरामाची वेळ आहे; तुम्हाला काय वाटेल?’ प्रधान यांनी त्यावर दिलेले उत्तर अफलातून होते. ते म्हणाले, माझ्याकडे येण्याची कुठल्याही कारणाने का होईना तुुला भीती वाटते हा माझा पराभव आहे. आता मला स्वत:ला दुरुस्त केले पाहिजे.’- किती ही संवेदनशीलता!आजही ‘साहेब’ जमातीबद्दल सामान्यांना भीती वाटते. त्यांच्या केबिनमध्ये एकदम कसे जावे? असा मानसिक दबाव असतो. आजची नोकरशाही प्रधान मास्तरांच्या चष्म्यातून सामान्यांकडे पाहील तो सुदिन समजावा. शेवटच्या माणसाचा आयुष्याशी संघर्ष संपून त्याने दीपोत्सव अनुभवावा यासाठी नोकरशाहीने योगदान द्यावे. उद्यापासूनचे दीपपर्व हा या योगदानाचा नवआरंभ ठरावा.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार