शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

अतुल सावे कोणा कोणाच्या घरी पाणी भरत आहेत ?

By सुधीर महाजन | Updated: April 30, 2019 15:46 IST

पाणी टंचाईला शिवसेनेइतकेच भाजप ही जबाबदार आहे याचा विसर मात्र भाजपला सोयीस्कर पडतो.

- सुधीर महाजन

सटाण्याला देव मामलेदारांचे मंदीर आहे; मामलेदार नावाचा देव म्हटल्यानंतर नावातच उत्सुकता खुण्या मारुती, कानफोडे हनुमान अशा नावांना सरावलेले आपले काम असतांनाही हे नाव कानावर पडले की वेगळेच वाटते. मामलेदार म्हणजे तहसीलदार. तहसीलदाराला लोक देव मानतात हे म्हणजे फारच झाले. तर या देव मामलेदारांनी बागलान परिसरात प्रचंड लोकोपयोगी काम केली. पाण्याचा प्रश्न सोडविला त्यांच्या अशा कामांनी जनतेने त्यांना देवत्त्व बहाल केले. त्यांचे मंदीर बांधले. त्याची दरवर्षी मोठी यात्रा भरते. सोयगाव या तालुक्याच्या गावानेही नाईक गुरूजींचे मंदीर बांधले. या शिक्षकाने आयुष्यभर ज्ञानदान आणि समाज कार्य केले. पाच वर्षापूर्वी निधनानंतर त्यांचे मंदीर गावाने बांधले. अशी उदाहरणे दुर्मीळ असतात आपले काम चाकोरीबाहेर जावून करणे व लोककल्याण साधने अशांनाच देवत्त्व प्राप्त होते. आज एक बातमी वाचतांना या दोघांची आवठवण झाली. देव मामलेदारांना मी पाहिलेले नाही. कारण ते ब्रिटिशांच्या काळात होते; परंतु नाईक गुरूजींना भेटलो आहे. आपण वेगळे काही करतो आहे असा अभिनिवेश नसलेला निर्मळ, साधा माणुस तुमच्या माझ्या घरातील आजोंबासारखा. 

तर या दोघांच्या आठवणीचे कारण एक बातमी होती. औरंगाबादमध्ये भीषण पाणी टंचाई आहे. आठ-दहा दिवस पाणी मिळत नाही. सगळ्यांच्याच तोडचे पाणी पळाले आहे. जनतेच्या रोषामुळे लोकप्रतिनिधी तोंड लपवत आहेत. त्यांच्या नाकर्तेपणाची प्रतिती लोकांना पावला पावलावर येते तर पाण्याच्या टँकरसाठी सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर एक जमाव गेलेला. आधिच उन्हाची काहिली आणि त्यात पाणी टंचाईची भर संतापलेल्या जमावाने येथे टँकर अडवले. तेवढ्यात एक टँकर रांग मोडून घुसला तो भाजपचे आमदार अतुल सावेंचा होता जनतेला पाणी पुरवठा करण्याच्या कल्याणकारी कामासाठी सावेंनी हा टँकर सुरू केला. मतदारांच्या काळजीचा उदात्त हेतु असावा असे तरी दिसत होते. लोकांनी तो अडवला. एकाने त्यातील रजिस्टर उघडून नावे तपासली तर म्हणजे या टँकरने पाणी देवून कोणाची सेवा बजावली हे तपासले आणि नावे वाचण्यास सुरूवात केली. तर यात विजया रहाटकर ज्या की माजी महापौर आणि आता महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. किशनचंद तनवाणी, स्वत: अतुल सावे अशी नावे बाहेर आली. आणखी वस्त्रहरण नको म्हणून समयसूचकता दाखवत सावे यांच्या टँकर चालकाने ते रजिस्टर हिसकावून घेत पोबारा केला. या कृतीतूनच आमदारांच्या समाजसेवेचे दर्शन घडले.

पाण्याच्या प्रश्नावर गेल्या महिन्यात भाजपच्या नगरसेवकांनी आंदोलनाचा आव आणला होता. जो तो उठून आंदोलन करत आपण कसे समजासेवक, जनतेचे कैवारी आहोत याचे दर्शन घडवत होता. खरे तर शिवसेनेच्या गळ्यात गळा घालून ही मंडळी संत्तेत आहेत, सत्ताधारी आहेत; पण सत्ताधारीच आंदोलन करतात असे अभूतपूर्व दृश्य औरंगाबादकरांनी अनुभवले. पाणी टंचाईला शिवसेनेइतकेच भाजप ही जबाबदार आहे याचा विसर मात्र भाजपला सोयीस्कर पडतो. भ्रष्टाचारी माणूस भरपूर पैसे कमावतो व पाप क्षालनासाठी वर्षातून एकदा तिरुपतीला जावून हुंडीत काही रक्कम टाकून स्वत:चे समाधान करून घेतात, असा हा नगरसेवकांच्या आंदोलनाचा प्रकार आहे. त्यामुळे आपल्या पक्षांच्या सहकाऱ्यांच्या घरी अतुल सावे पाणी भरतात यात वावगे ते काय ही सर्व एकाच संस्कृतीची मंडळी आहेत हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. रोम जळत असतांना निरो गिटार वाजवत होता ही प्रपृत्ती अनादी काळापासूनची असल्याने वेगळे काहीच नाही. जनतेच्या तोंडचे पाणी काढून घेण्याचा प्रकार नवा नाही.

टॅग्स :Atul Saaveअतुल सावेwater scarcityपाणी टंचाईAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका