शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

निषेध कुणाचा करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 05:33 IST

आपण निवडून दिलेल्या व आपल्या विचारांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर लोकांचा अजिबात विश्वास राहू नये आणि त्यांनी सत्तेच्या कोणत्याही प्रलोभनाला बळी पडून मनाला येईल तेव्हा पक्ष बदलावा असे दर्शविणारी ही आपल्या लोकप्रतिनिधींची अधोगती आहे.

कर्नाटकात गेले काही दिवस जे चालले आहे आणि परवा गोव्यात जे घडले ते सारे भारतीय लोकशाहीची विटंबना करणारे आणि जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी त्यांच्या पक्षनिष्ठांबाबत आणि वैचारिक भूमिकांबाबत केवढे बेशरम होऊ शकतात ते दाखवून देणारे आहे. कर्नाटकात आपला पक्ष क्रमांक एकचा असतानाही राहुल गांधींनी जेडी (एस) च्या कुमारस्वामींना सरकार बनवायला पाठिंबा दिला. त्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांना त्यांची मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी मागे घ्यायला लावली.

आघाडीचे सरकार जेवढ्या कुरबुरी करीत आणि तडजोडी सांभाळत चालावे तसे ते एवढे दिवस चालले. आता त्यातील कुमारस्वामींच्या पक्षातील काही व काँग्रेसच्या पक्षातील काही आमदारांनी सरकारविरुद्ध बंड करून भाजपच्या नेतृत्वात जाण्याचा निर्लज्जपणा केला. म्युन्सिपालटीचे सभासद अशा वेळी जसे पळावे तसे ते पळून मुंबईत राहायला गेले. (म्हणजे त्यांना तेथे नेऊन त्यांची सरबराई करण्याची व्यवस्था भाजपने केली) तेथून त्यांची धिंड गोव्यात जायची होती व पुढे बंगळुरूला जाऊन त्यांना कुमारस्वामींचे सरकार पाडायचे होते. मुंबईत त्यांना भेटायला गेलेल्या काँग्रेस व जेडी (एस) च्या नेत्यांना महाराष्ट्र सरकारच्या पोलिसांनी अटकाव करून त्यांच्या पक्षद्रोहाला व लोकशाहीच्या त्यांनी चालविलेल्या वस्त्रहरणाला शासकीय संरक्षण दिले. नेमक्या याच सुमारास गोव्यातील काँग्रेसच्या १५ आमदारांपैकी १० जणांनी भाजपशी नवा घरठाव केल्याचे वृत्त आले आणि पक्षांतर वा निष्ठांतर हा भारतीय राजकारणाला गेली काही दशके जडलेला रोग अजून तसाच आहे याचा पुरावा पुढे केला. आपण निवडून दिलेल्या व आपल्या विचारांवर निवडून आलेल्या प्रतिनिधींवर लोकांचा विश्वास राहू नये आणि त्यांनी सत्तेच्या कोणत्याही प्रलोभनाला बळी पडून मनाला येईल तेव्हा पक्ष बदलावा असे दर्शविणारी ही आपल्या लोकप्रतिनिधींची अधोगती आहे. भाजपची विचारसरणी व काँग्रेस आणि जेडी (एस) यांची विचारसरणी परस्परविरोधी आहे आणि आपले पक्षांतर हे विचारांतरही ठरणार आहे याची तमा या प्रतिनिधींनी बाळगली नाही आणि लोक आपले काही बिघडवू शकत नाहीत, असा विश्वासही त्यांनी जाहीर केला आहे. देशात कधी नव्हे तेवढे पक्षांतर हे आता टोकाचे ‘निष्ठांतर’ झाले आहे. काँग्रेस व जेडीएसमधून माणसे थेट भाजपचे भगवे निशाण खांद्यावर घेतात हा प्रकार थेट ‘धर्मांतर’च्या पातळीवर जाणारा आहे, अखेर धर्म काय किंवा विचारसरणी काय या माणसांच्या जीवननिष्ठा निश्चित करणाऱ्या बाबी आहेत. मात्र या प्रकारचा दोष पक्षांतर करणाºया आमदारांचाच नाही त्यांना त्यासाठी प्रोत्साहन व प्रलोभन देणाºया भाजपच्या नेत्यांचाही आहे.

काँग्रेस किंवा जेडीएस हे पक्ष आपले आमदार ‘सांभाळू’ शकले नाहीत यासाठी काही जण त्यांनाही दोष देऊ शकतील. पण सत्ताधाऱ्यांचे प्रलोभन आणि सत्ताहीनांची विनवणी यात फार मोठे अंतर आहे. सत्तेची पायरी चढून जाणे हा राजकारणातील एकमेव महत्त्वाकांक्षेचा विषय आहे आणि त्या पायरीसाठी पायघड्या घालायला प्रत्यक्ष दिल्लीतील सत्ताधारी पक्ष मुंबईत, गोव्यात आणि बंगळुरूमध्ये उतरत असेल तर त्या दिशेने जायला या आमदारांनाही लाज वाटण्याचे फारसे कारण नाही. सगळे पक्ष, सगळे पुढारी व सगळ्या संघटनाच यासाठी दोषी आहेत, असे मग म्हणावे लागेल. विचार व कार्यक्रम यावर पक्षाची उभारणी करता येत नाही आणि एखाद्या पुढाºयावरील निष्ठेपायीच ज्यांना संघटना उभ्या करता येतात त्यांचे याहून वेगळे काही व्हायचेही नसते. पक्षांतराची लागण (एक कम्युनिस्ट पक्ष सोडला) तर देशातील सगळ्या पक्षांना आहे. त्यांचा तमाशाच आज आपण राजकारणाच्या कानडी रंगभूमीवर पाहत आहोत. यात निषेध कुणाचा करायचा? त्या आमदारांचा, त्यांना प्रलोभने दाखविणाºया दिल्लीकरांचा की त्यांना आपण निवडून देतो म्हणून आपलाच?

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारण