शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

या ३४ शेतक-यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

By विजय दर्डा | Updated: October 9, 2017 00:10 IST

प्रत्येक सरकार शेतक-यांचा कैवारी असल्याचा दावा करते. मात्र तरीही शेतकºयांची अवस्था दयनीय आहे, ही वस्तुस्थिती आहे. शेतक-यांच्या नावाने मते मागून, त्यांचे नेते बनून राजकारणी विधानसभा आणि लोकसभेत जातात.

प्रत्येक सरकार शेतक-यांचा कैवारी असल्याचा दावा करते. मात्र तरीही शेतकºयांची अवस्था दयनीय आहे, ही वस्तुस्थिती आहे. शेतक-यांच्या नावाने मते मागून, त्यांचे नेते बनून राजकारणी विधानसभा आणि लोकसभेत जातात. पण प्रत्यक्षात ते शेतक-यांना मूर्ख बनविण्याखेरीज काही करत नाहीत. शेतक-याला अन्नदाता म्हटले जाते, पण देशाच्या पोटाची खळगी भरणा-या या शेतक-याचे पोट मात्र दारिद्र्याने खपाटीला गेलेले दिसते. महाराष्ट्रात कीटकनाशकांच्या फवारणीने ३४ शेतक-यांना प्राणास मुकावे लागले. पण राज्य किंवा केंद्र सरकारला याची जराही खंत वाटू नये, याहून मोठे दुर्दैव कोणते?जो देश शेतक-यांना सुखी, आनंदी व समृद्ध करतो तोच देश ख-या अर्थी शाश्वत महानता मिळवू शकतो, हे आपल्याकडे सरकारच्या किंवा नेत्यांच्या गावीही नाही. शेतक-यांच्या समस्या समजावून घेऊन त्यांच्या सोडवणुकीसाठी कितीतरी आयोग नेमले गेले. हे आयोग अहवाल देतात. त्यावर विधानसभा वा लोकसभेत मोठी चर्चा होते. पण हे सर्व माध्यमांमध्ये चमकण्यासाठीच असते. शेतकरी अडाणी आहे, कमजोर आहे त्यामुळे त्याला मूर्ख बनविले तरी चालेल, असे सरकार समजते की काय?मला असे ठामपणे वाटते की, गेल्या ७० वर्षांत शेतकºयांनी घाम गाळून देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले आहे. एकेकाळी आपण अन्नधान्य आयात करायचो. आज भारत स्वत:ची गरज भागवून अन्नधान्य व अन्य शेतमालांची निर्यात करतो. असे असूनही शेतीला एक उद्योग मानून त्यानुसार सवलती देण्याचा विचारही कधी सरकारच्या मनात आला नाही. उद्योग उभारण्यासाठी शेतक-यांच्या जमिनी कवडीमोल किमतीने घेतल्या जातात. उद्योगांसाठी कर्जपुरवठा, २४ तास वीज-पाणी, रस्ते व अन्य सोयीसुविधा पुरविण्यासाठी पायघड्या घातल्या जातात. भारतीय उद्योगांच्या मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी सरकार देश-विदेशात प्रचार करते. उद्योगांना सवलती व सोयी-सुविधा देण्यास माझा मुळीच विरोध नाही. पण तोच न्याय सरकार शेती आणि शेतक-यांना का देत नाही, असा माझा प्रश्न जरूर आहे. शेतक-यांना प्रगत शेतीचे प्रशिक्षण, दर्जेदार बियाणी, सुरक्षित कीटकनाशके आणि पिकांसाठी पुरेसे पाणी याची व्यवस्था सरकार करत नाही. अनेक शेतक-यांनी एकत्र येऊन ‘क्लस्टर शेती’ (सामूहिक शेती) करावी, असे सरकारच्या कधी मनातही आले नाही. लहान तुकड्यांच्या जमिनीवर केलेली शेती कधीच फायदेशीर ठरू शकत नाही. म्हणूनच जगातील अनेक देशात १० ते २० हजार एकरापर्यंतची जमीन एकत्र करून त्यावर सामूहिक शेती केली जाते. जमिनीच्या प्रमाणात शेतीतून होणाºया नफ्याची वाटणी केली जाते. खरं तर सरकारने कधी आधुनिक शेतीकडे लक्षच दिले नाही. त्यामुळे निकृष्ट बियाणे, पाण्याची टंचाई, अवर्षण आणि दुष्काळ, शेतमालाला वाजवी किंमत न मिळणे हे सर्व आपल्या शेतकºयांच्या जणू पाचवीलाच पुजलेले आहे. अनेक वेळा तर तयार झालेले पीक कापून बाजारात नेऊन विकण्यासाठी जेवढा खर्च येतो तेवढीही किंमत तयार झालेल्या शेतमालाला मिळत नसल्याने शेतकरी पिकाची काढणीच करत नाही! उद्योगधंद्यांना दिलेली १३ ते १५ लाख कोटी रुपयांची कर्जे बुडीत खात्यांत टाकायला या बँका तयार होतात. शेतक-याकडे मात्र काही हजारांचे कर्ज थकले की लगेच त्याच्यामागे तगादा लागतो. हजारो कोटी रुपये पाटबंधारे योजनांच्या नावाने खर्च झाले, पण यातही भ्रष्टाचार व घोटाळे झाले आणि शेतीला पाणी मिळणे दूरच राहिले.आज देशात होणाºया शेतकरी आत्महत्या हा याच नष्टचक्राचा परिपाक आहे. महाराष्ट्रातील विदर्भ तर शेतकरी आत्महत्यांमध्ये अव्वल आहे. आता तर असे दुर्दैव पाहण्याची वेळ आली की, शेती निरोगी राहावी म्हणून जी कीटकनाशके फवारली जातात तीच शेतक-यांच्या जीवावर उठली. याहून दारुण विडंबना असू शकत नाही! जगभरात बंदी असलेली कीटकनाशके आपल्याकडे खुलेआम विकली जातात आणि आपले कृषी मंत्रालय मात्र झोपलेले आहे. या प्राणघातक कीटकनाशकांच्या विक्रीस जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे नोंदवून खटले चालवायला हवेत. एखाद्या शाळेत विद्यार्थ्याचा खून झाला तरी त्या संस्थेच्या संचालकांना लगेच तुरुंगात टाकले जाते. इस्पितळात रुग्ण दगावला आणि नातेवाईकांनी ओरड केली की संचालकांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागतो. एखाद्या कारखान्यात काही अपघात घडला तर मालकाला तुरुंगाची हवा खावी लागते. एकापाठोपाठ रेल्वे अपघात होतात व प्रवाशांचे प्राण जातात. पण त्यासाठी रेल्वे अधिकाºयांना कधी तुरुंगात जावे लागल्याचे दिसत नाही. शेतकºयांच्या मृत्यूचेही तेच. दोषींविषयी सरकारचा दृष्टिकोन समान असायला हवा, मग दोषी खासगी क्षेत्रातील असो की सरकारी क्षेत्रातील. त्यांच्यात भेदभाव करणे सरकारला शोभत नाही.हे लिखाण संपविण्यापूर्वी...जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताच्या मुली कमाल करत आहेत. रशियात झालेल्या वुशू अजिंक्यपद स्पर्धेत सीआरपीएफमध्ये हेड कॉन्स्टेबल असलेल्या पूजा कादियान यांनी भारताला प्रथमच सुवर्णपदक मिळवून दिले. वुशू हा चिनी मार्शल आर्टसारखा क्रीडाप्रकार आहे. सन १९९१ पासून दर दोन वर्षांतून एकदा ही स्पर्धा होत आहे. परंतु भारताने यंदा प्र्रथमच सुवर्णपदक पटकावले आहे. या धवल यशाबद्दल पूजाचे मनापासून अभिनंदन!

(लेखक लोकमत समूहातील एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आहेत)

टॅग्स :Farmerशेतकरी