शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

गोव्याच्या पोटातल्या खनिजांची मालकी कुणाची?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 05:46 IST

खाणचालकांना गोव्यातील खनिज साठ्यावर तहहयात स्वामित्व हवे आहे, त्यासाठी त्यांनी ‘खाण अवलंबितां’ना पुढे करावे, हे अजबच!

- राजू नायक, संपादक, लोकमत, गोवागोव्यातल्या खाण अवलंबितांचे आंदोलन पुन्हा उचल खाणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. हे आंदोलन अजब आहे. अजब अशासाठी की, आंदोलनकर्त्यांना न्याय नकोय, तर ठराविक व्यक्ती आणि कंपन्यांनाच अन्याय्य मार्गाने खाणींचे वितरण झालेले हवे आहे. वरकरणी जरी हे आंदोलन खाण अवलंबितांचे वाटत असले, तरी त्याचे दिशानिर्देशन मोजकेच खाणचालक करताहेत, हे लपून राहिलेले नाही. या खाणचालकांना राज्यातील खनिज साठ्यावर तहहयात स्वामित्व हवे आहे, त्यासाठी कायद्याला वाकवा, असा त्यांचा आग्रह आहे. 

गोवा मुक्तीनंतरच्या सहा दशकांच्या काळात खाणचालक हे गोव्यातले फार मोठे प्रस्थ होते. त्यांच्या इशाऱ्यासरशी सरकारे घडायची आणि पडायची. नव्या मुख्यमंत्र्यांचा वकुब न पाहताच त्यांच्या दिमतीला सुटकेस भरून नोटा पाठवल्या जायच्या आणि या दातृत्वाची परतफेड त्यांच्या सक्रिय मौनातून मागितली जायची. हे मौन पोर्तुगीजकालीन कायद्याच्या संदर्भातले असायचे. वसाहतवादाचे जोखड झुगारून सहा दशके लोटली, तरी गोव्यात वसाहतवाद्यांनी लादलेल्या खनिज उत्खननविषयक सवलतींची (कन्सेशन्स) चलती होती. सरकारच्या तिजोरीत नाममात्र शुल्क जमा करून, कोणताही अन्य कर न भरता या साठ वर्षांच्या काळात लाखो टन खनिज उपसले गेले आणि त्याची निर्यात करण्यात आली. १९८७ मध्ये या सवलतींना दीर्घकालीन लीज करारांत परिवर्तीत करणारा नवा कायदा राज्य सरकारने केला. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या चिकित्सेवर हे लीज करार टिकू शकले नाहीत. राज्य आणि केंद्र सरकारच्या सक्रिय सहकार्यातून चाललेला आतबट्ट्याचा व्यवहार अवैध असल्याचा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला. खनिज ही सार्वजनिक मालकीची मालमत्ता असून, तिचे वितरण विद्यमान व भावी पिढ्यांचे हीत नजरेसमोर ठेवून व्हायला हवे, असे सुनावत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला खनिजसाठ्यांच्या लिलावाचा सल्ला दिला.
उपरोक्त निवाड्यासंदर्भात खाणचालक व राज्य सरकारने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर विचाराधीन आहेत.  आपल्याला देण्यात आलेल्या खाण लिजांचा विचार भारत सरकारने १९८७ मध्ये अधिसूचित केलेल्या मायनिंग अँड मिनरल्स (डिव्हेलॉपमेंट अँड रेग्युलेशन) ॲक्टनुसार करायचा असल्यास खाण लिजांच्या नूतनीकरणाचा आरंभ १९८७ पासून (गोवा मुक्त झालेले वर्ष १९६१ पासून नव्हे) गृहित धरला जावा आणि त्यामुळे २०३७ पर्यंत उत्खनन करण्याची आपल्याला परवानगी मिळावी, असा खाणचालकांच्या या याचिकांचा त्रोटक अर्थ. देशभरातील खनिज संपत्तीचे वितरण न्याय्य पद्धतीने करायचे असेल, तर लिलाव हाच उत्तम मार्ग असल्याचा निवाडा याआधीच्या अनेक संसाधनविषयक प्रकरणांत देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयात या याचिकांची संभावना कशाप्रकारे होणार आहे, हे अवघ्याच काही दिवसात कळेल; पण त्याआधी दबावतंत्र वापरून गोव्यातली जनभावना परिस्थिती जैसे ठेवण्याच्या बाजूची आहे, असे चित्र उभे करण्याचा केविलवाणा यत्न खाणचालकांनी चालवला आहे. त्यासाठी “खाण अवलंबित” म्हणवणाऱ्यांना मोर्चे काढण्यास उद्युक्त केले जाते, सरकारला धमक्या आणि इशारे दिले जातात. हल्लीच एका सभेत बोलताना खाण अवलंबितांच्या एका नेत्याने या प्रकरणाचा संबंध थेट काश्मीर प्रश्नाशी जोडण्याचा अश्लाघ्य यत्न केला. जर ३७० वे कलम रद्दबातल करण्यासाठी प्रशासकीय पर्याय उपलब्ध असतील, तर तसाच एखादा पर्याय खाणींच्या तहहयात वितरणासाठी का वापरू नये, असा बेमुर्वत सवाल या नेत्याने जाहीररित्या केला. पोर्तुगीजकालीन कायद्याचे अधिष्ठान स्वतंत्र भारतात कायम राहावे, यासाठी या लोकांना घटनात्मक दुरुस्ती हवी आहे. खाणी बंद पडल्यामुळे खाण अवलंबितांचे हाल होत आहेत, या निरीक्षणात काहीअंशी तथ्य असले, तरी त्याच लुटारू खाणचालकांकडे नाममात्र मूल्याने खाणी सुपूर्द करणे हा या समस्येवरील पर्याय नव्हे, हे या अवलंबितांच्या नेत्यांना कळत नाही वा कळत असूनही वळत नाही. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवण्याचा हा प्रकार सर्वोच्च न्यायालयाच्या नजरेतून सुटू नये, यासाठी गोवा फाउंडेशनसारख्या बिगर सरकारी संघटना कार्यरत आहेत. आता त्यांनाही धमकावले जात आहे. अराजकातून आपले इप्सित साध्य करता येईल, अशा धारणेपर्यंत खाणचालक आल्याचे दिसते. दुर्दैवाने राज्य सरकारची प्रज्ञाही खाणचालकांची तळी उचलवून धरण्यातच खर्च होते आहे. खनिज हस्तांतरणातली विविध कंत्राटे घेत करोडोपती झालेल्या मंत्री-आमदारांचे प्रस्थ सत्ताधारी आणि विरोधी पक्षातही असल्यामुळे राजकीय क्षेत्राकडून या समस्येवर न्याय्य किंवा लोकानुवर्ती तोडगा निघण्याची शक्यताच नाही. सर्वोच्च न्यायालयाचा संतुलित निवाडाच गोव्याच्या अमूल्य खनिज संपदेला विद्यमान व भावी पिढ्यांसाठी राखून ठेवू शकेल.