शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कुठे गेली सभ्यता?

By admin | Updated: September 14, 2015 00:46 IST

दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी सत्तास्थानी नवागत असताना एकदा त्यांच्या एका जाहीर भाषणात विरोधकांना उद्देशून ‘नानी याद दिलायेंगे’ असे धमकीवजा

दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी सत्तास्थानी नवागत असताना एकदा त्यांच्या एका जाहीर भाषणात विरोधकांना उद्देशून ‘नानी याद दिलायेंगे’ असे धमकीवजा आव्हान आल्यावरून बरीच खळबळ माजली होती. सदरचे आव्हान पंतप्रधानपदावरील व्यक्तीच्या मुखातून येणे त्या पदाचे मोल लक्षात घेता, असभ्य या श्रेणीतच गणले गेले व म्हणून टीकाही झाली. अर्थात त्यात दोष जरी राजीव गांधींचे ते भाषण तयार करून देणाऱ्याचा असला, तरी त्या दोषाचे धनीपण अखेर राजीव गांधी यांच्याचकडे गेले. अर्थात त्यानंतर मात्र असे असभ्य उल्लेख टाळले जाऊ लागले. पुढे गुजरात दंगलींमधील नरसंहारास नरेन्द्र मोदी यांना जबाबदार धरून सोनिया गांधी यांनी ‘मौत के सौदागर’ असे पुन्हा असभ्य श्रेणीत मोडणारे विशेषण बहाल केले. अगदी अलीकडे सोनियांनीच पंतप्रधान मोदींच्या घोषणांना हवाबाजी म्हणणे, त्याला लगेच मोदींनीही हवालाबाजी म्हणणे व त्यातून मग दगाबाजीसारख्या आणखी काही बाजींचा उभयतांकडून उल्लेख केला जाणे पाहिल्यानंतर कुठे गेली देशाच्या सार्वजनिक जीवनातील सभ्यता असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. एरवी राजधानी दिल्लीतील एखाद्या समारंभात सोनिया-मोदी समोरासमोर येतात तेव्हा दोहोंच्या वर्तणुकीत आणि देहबोलीत संपूर्ण सभ्यता आणि शालीनता प्रगट होत असते आणि तेच योग्यदेखील आहे. राजकीय विरोध आणि वैचारिक मतभिन्नता म्हणजे वैर वा शत्रुत्व नव्हे. ते तसे नसते म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांचे भाषण पंडित नेहरूंपासून ते थेट डॉ. मनमोहनसिंगांपर्यंतचे सारे पंतप्रधान लक्ष देऊन ऐकत असत व वाजपेयींच्या सूचनांचा विचारही करीत असत. अर्थात हे केवळ एक उदाहरण झाले. संसदेत वा राज्याच्या विधिमंडळात अशा सभ्यतेचे वारंवार दर्शन घडत असे. अशीच सभ्यता सार्वजनिक जीवनातही आढळून येत असे. मग हल्ली हल्ली हा जो विरोधाभास दिसून येतो तोे कशामुळे? इंग्रजीत ज्याला ‘प्लेइंग फॉर गॅलरी’ म्हणजे लोकरंजनासाठी तर नव्हे? तसे असेल तर आता लोकांवर याचा काहीही परिणाम होत नाही. सोनिया गांधींनी मौत का सौदागर म्हटल्यानंतरही गुजरातच्या मतदारांनी मोदींना तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपद बहाल केले व नंतर तर देशाने थेट पंतप्रधानपदीच त्यांना नेऊन बसविले. अर्थात सोनिया वा मोदी यांच्याकडून लोकांना सभ्यतेची अपेक्षा आहे म्हणून हे म्हणायचे. तशी अपेक्षा ठाकरे बंधंूंकडून कोण कशाला करेल? पण जमले तर त्यांनीही याचा विचार करावा. मनसेच्या आमदारांची संख्या तेरावरून एकावर का गेली याचा जरा विचार केला तर धाकट्या ठाकरेंना कदाचित झाला तर काही अर्थबोध होऊनही जाईल. असभ्य आणि वचावचा बोलण्याने लोक भले टाळ्या आणि शिट्ट्यांचा अहेर देत असतील, पण मते मात्र देत नाहीत.