शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कुठे गेली सभ्यता?

By admin | Updated: September 14, 2015 00:46 IST

दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी सत्तास्थानी नवागत असताना एकदा त्यांच्या एका जाहीर भाषणात विरोधकांना उद्देशून ‘नानी याद दिलायेंगे’ असे धमकीवजा

दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी सत्तास्थानी नवागत असताना एकदा त्यांच्या एका जाहीर भाषणात विरोधकांना उद्देशून ‘नानी याद दिलायेंगे’ असे धमकीवजा आव्हान आल्यावरून बरीच खळबळ माजली होती. सदरचे आव्हान पंतप्रधानपदावरील व्यक्तीच्या मुखातून येणे त्या पदाचे मोल लक्षात घेता, असभ्य या श्रेणीतच गणले गेले व म्हणून टीकाही झाली. अर्थात त्यात दोष जरी राजीव गांधींचे ते भाषण तयार करून देणाऱ्याचा असला, तरी त्या दोषाचे धनीपण अखेर राजीव गांधी यांच्याचकडे गेले. अर्थात त्यानंतर मात्र असे असभ्य उल्लेख टाळले जाऊ लागले. पुढे गुजरात दंगलींमधील नरसंहारास नरेन्द्र मोदी यांना जबाबदार धरून सोनिया गांधी यांनी ‘मौत के सौदागर’ असे पुन्हा असभ्य श्रेणीत मोडणारे विशेषण बहाल केले. अगदी अलीकडे सोनियांनीच पंतप्रधान मोदींच्या घोषणांना हवाबाजी म्हणणे, त्याला लगेच मोदींनीही हवालाबाजी म्हणणे व त्यातून मग दगाबाजीसारख्या आणखी काही बाजींचा उभयतांकडून उल्लेख केला जाणे पाहिल्यानंतर कुठे गेली देशाच्या सार्वजनिक जीवनातील सभ्यता असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. एरवी राजधानी दिल्लीतील एखाद्या समारंभात सोनिया-मोदी समोरासमोर येतात तेव्हा दोहोंच्या वर्तणुकीत आणि देहबोलीत संपूर्ण सभ्यता आणि शालीनता प्रगट होत असते आणि तेच योग्यदेखील आहे. राजकीय विरोध आणि वैचारिक मतभिन्नता म्हणजे वैर वा शत्रुत्व नव्हे. ते तसे नसते म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांचे भाषण पंडित नेहरूंपासून ते थेट डॉ. मनमोहनसिंगांपर्यंतचे सारे पंतप्रधान लक्ष देऊन ऐकत असत व वाजपेयींच्या सूचनांचा विचारही करीत असत. अर्थात हे केवळ एक उदाहरण झाले. संसदेत वा राज्याच्या विधिमंडळात अशा सभ्यतेचे वारंवार दर्शन घडत असे. अशीच सभ्यता सार्वजनिक जीवनातही आढळून येत असे. मग हल्ली हल्ली हा जो विरोधाभास दिसून येतो तोे कशामुळे? इंग्रजीत ज्याला ‘प्लेइंग फॉर गॅलरी’ म्हणजे लोकरंजनासाठी तर नव्हे? तसे असेल तर आता लोकांवर याचा काहीही परिणाम होत नाही. सोनिया गांधींनी मौत का सौदागर म्हटल्यानंतरही गुजरातच्या मतदारांनी मोदींना तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपद बहाल केले व नंतर तर देशाने थेट पंतप्रधानपदीच त्यांना नेऊन बसविले. अर्थात सोनिया वा मोदी यांच्याकडून लोकांना सभ्यतेची अपेक्षा आहे म्हणून हे म्हणायचे. तशी अपेक्षा ठाकरे बंधंूंकडून कोण कशाला करेल? पण जमले तर त्यांनीही याचा विचार करावा. मनसेच्या आमदारांची संख्या तेरावरून एकावर का गेली याचा जरा विचार केला तर धाकट्या ठाकरेंना कदाचित झाला तर काही अर्थबोध होऊनही जाईल. असभ्य आणि वचावचा बोलण्याने लोक भले टाळ्या आणि शिट्ट्यांचा अहेर देत असतील, पण मते मात्र देत नाहीत.