शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

कुठे गेली सभ्यता?

By admin | Updated: September 14, 2015 00:46 IST

दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी सत्तास्थानी नवागत असताना एकदा त्यांच्या एका जाहीर भाषणात विरोधकांना उद्देशून ‘नानी याद दिलायेंगे’ असे धमकीवजा

दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी सत्तास्थानी नवागत असताना एकदा त्यांच्या एका जाहीर भाषणात विरोधकांना उद्देशून ‘नानी याद दिलायेंगे’ असे धमकीवजा आव्हान आल्यावरून बरीच खळबळ माजली होती. सदरचे आव्हान पंतप्रधानपदावरील व्यक्तीच्या मुखातून येणे त्या पदाचे मोल लक्षात घेता, असभ्य या श्रेणीतच गणले गेले व म्हणून टीकाही झाली. अर्थात त्यात दोष जरी राजीव गांधींचे ते भाषण तयार करून देणाऱ्याचा असला, तरी त्या दोषाचे धनीपण अखेर राजीव गांधी यांच्याचकडे गेले. अर्थात त्यानंतर मात्र असे असभ्य उल्लेख टाळले जाऊ लागले. पुढे गुजरात दंगलींमधील नरसंहारास नरेन्द्र मोदी यांना जबाबदार धरून सोनिया गांधी यांनी ‘मौत के सौदागर’ असे पुन्हा असभ्य श्रेणीत मोडणारे विशेषण बहाल केले. अगदी अलीकडे सोनियांनीच पंतप्रधान मोदींच्या घोषणांना हवाबाजी म्हणणे, त्याला लगेच मोदींनीही हवालाबाजी म्हणणे व त्यातून मग दगाबाजीसारख्या आणखी काही बाजींचा उभयतांकडून उल्लेख केला जाणे पाहिल्यानंतर कुठे गेली देशाच्या सार्वजनिक जीवनातील सभ्यता असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. एरवी राजधानी दिल्लीतील एखाद्या समारंभात सोनिया-मोदी समोरासमोर येतात तेव्हा दोहोंच्या वर्तणुकीत आणि देहबोलीत संपूर्ण सभ्यता आणि शालीनता प्रगट होत असते आणि तेच योग्यदेखील आहे. राजकीय विरोध आणि वैचारिक मतभिन्नता म्हणजे वैर वा शत्रुत्व नव्हे. ते तसे नसते म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांचे भाषण पंडित नेहरूंपासून ते थेट डॉ. मनमोहनसिंगांपर्यंतचे सारे पंतप्रधान लक्ष देऊन ऐकत असत व वाजपेयींच्या सूचनांचा विचारही करीत असत. अर्थात हे केवळ एक उदाहरण झाले. संसदेत वा राज्याच्या विधिमंडळात अशा सभ्यतेचे वारंवार दर्शन घडत असे. अशीच सभ्यता सार्वजनिक जीवनातही आढळून येत असे. मग हल्ली हल्ली हा जो विरोधाभास दिसून येतो तोे कशामुळे? इंग्रजीत ज्याला ‘प्लेइंग फॉर गॅलरी’ म्हणजे लोकरंजनासाठी तर नव्हे? तसे असेल तर आता लोकांवर याचा काहीही परिणाम होत नाही. सोनिया गांधींनी मौत का सौदागर म्हटल्यानंतरही गुजरातच्या मतदारांनी मोदींना तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपद बहाल केले व नंतर तर देशाने थेट पंतप्रधानपदीच त्यांना नेऊन बसविले. अर्थात सोनिया वा मोदी यांच्याकडून लोकांना सभ्यतेची अपेक्षा आहे म्हणून हे म्हणायचे. तशी अपेक्षा ठाकरे बंधंूंकडून कोण कशाला करेल? पण जमले तर त्यांनीही याचा विचार करावा. मनसेच्या आमदारांची संख्या तेरावरून एकावर का गेली याचा जरा विचार केला तर धाकट्या ठाकरेंना कदाचित झाला तर काही अर्थबोध होऊनही जाईल. असभ्य आणि वचावचा बोलण्याने लोक भले टाळ्या आणि शिट्ट्यांचा अहेर देत असतील, पण मते मात्र देत नाहीत.