शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

उपचारांचा बाजार कधी थांबणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 18:01 IST

बिल न भरल्याने रूग्णाला डांबून ठेवणे व नातेवाईकांना मृतदेह न देणे हा रूग्णालयाविरूद्ध गुन्हा ठरेल, अशी तरतुद केंद्र सरकार करणार आहे़. त्यासाठी नागरिकांच्या सूचना व हरकती मागवण्याचे काम सुरू आहे.  

- विनायक पात्रुडकरबिल न भरल्याने रूग्णाला डांबून ठेवणे व नातेवाईकांना मृतदेह न देणे हा रूग्णालयाविरूद्ध गुन्हा ठरेल, अशी तरतुद केंद्र सरकार करणार आहे़. त्यासाठी नागरिकांच्या सूचना व हरकती मागवण्याचे काम सुरू आहे.  रूग्ण व नातलगांचे हक्क अबाधित ठेवणारे नियम केंद्र सरकारने तयार केले आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार यांच्या आदेशानुसार ही प्रक्रिया झाली आहे. केंद्र सरकारने असे नियम करायचा विचार केला यासाठी त्यांचे आधी कौतुकच करायला हवे़ कारण शिक्षण क्षेत्राप्रमाणे वैद्यकीय क्षेत्राचे बाजारीकरण सुरू होऊन आता दोन दशके झाली असतील. ग्रामीण व शहरी भाग असा यामध्ये फरक राहिलेला नाही. वाढते प्रदूषण व बदलती जीवनशैली यामुळे शरीराला आजारांचे निमंत्रण न बोलावताच मिळते. याचा फायदा औषध बनविणाऱ्या मोठ्या कंपन्यांनी घेतला. रक्तदाब व मधूमेहाची वयोमर्यादा दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. बर याचे निकष कोण ठरवत, कोण याला मान्यता देत याचा तपशील कोणत्याच रूग्णालयाकडे अथवा तज्ज्ञ डॉक्टकडे नसेल. मात्र, आज प्रत्येक घरात एक तरी मधुमेह व रक्तदाबाला नियंत्रित ठेवणारे औषध घेणारा असेल. ही औषधे स्वस्त मिळत असली तरी त्याच्या विक्रीची उलाढाल कोट्यवधी रूपयांची आहे. याप्रमाणे गंभीर आजारांच्या शस्त्रक्रियेचे लाखो रूपयांचे पॅकेज ठरलेले आहे़. प्रत्येक रूग्णालयाचा, आॅपरेशन थिएटरचा दर ठरलेला असतो़ त्यात काही डॉक्टर रूग्णासमोर अशाप्रकारे आजाराचा तपशील देतात, की रूग्ण शस्त्रक्रिया करण्यास तत्काळ तयार होतो. असा ही आरोप आहे, की, काही बड्या रूग्णालयातील डॉक्टरांना अमूकएक शस्त्रक्रिया झाल्याच पाहिजेत, असे टार्गेट दिले आहे़. आता तर रक्ताचे नमूने तपासण्यासाठीही कपड्यांच्या सेलप्रमाणे सवलती दिल्या जातात. म्हणजे अमूक रक्त चाचणी केल्यास दहा टक्के सूट, दोन रक्त चाचण्या केल्यास वीस टक्के सूट, असे फलक रक्त चाचणी करणा-या लॅबच्या बाहेर लावले गेले आहेत. वैद्यकीय क्षेत्राचे असे बाजारीकरण झाल्याने रूग्णांना पैशांसाठी त्रास देणे, असे प्रकार होणे अपेक्षितच होते. मुंबईत याचे पहिले प्रकरण घडले ते हिंदुजा रूग्णालयात़ सुमारे चार वर्षापूर्वी बिल थकल्याने एका रूग्णाला डिस्चार्ज देण्यास रूग्णालयाने नकार दिला होता. याविरोधात रूग्णाच्या नातेवाईकाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयाने रूग्णालयाचे कान उपटले होते. रूग्णाला डांबणे बेकायदा आहे, असा दम न्यायालयाने दिला होता. असे प्रकार रोखण्यासाठी नियमावली तयार करा, रूग्णालयांची मनमानी रोखा, असे आदेशही न्यायालयाने राज्य शासनाला दिले होते़. राज्य शासनाने याची तयारी केली. मात्र त्याला अंतिम स्वरूप अजून मिळालेले नाही़. आता तर केंद्र सरकारच रूग्णालयांना नियंत्रित करण्यासाठी नियमावली तयार करत आहे. महाराष्ट्र सरकारप्रमाणे केंद्र सरकारची गती धिमी होऊ नये, एवढीच अपेक्षा़ काही देशांमध्ये रूग्ण सेवा ही सर्व श्रेष्ठ मानली जाते. त्याला अनुसरूनच तेथे रूग्णांवर मोफत उपचार केले जातात. आपल्याकडे मात्र उपचाराचा बाजार मांडला गेला आहे़, त्यामुळे रूग्णांना अधिकार देणा-या केंद्र सरकारची नवीन नियमावलीची अधिक सक्षमपणे अंमलबजावणी व्हावी व त्यासाठी प्रशासकीय अधिकारी आणि नेत्यांनी प्रयत्न करायला हवेत. कारण बलात्कार पीडितेला मिळणा-या नुकसान भरपाईसाठी लाच मागण्याचा प्रकार आपल्या राज्यात घडलेला आहे़. तशी अवस्था रूग्ण अधिकारांची व्हायला नको़ जीवाशी खेळणा-या वैद्यकीय क्षेत्राच्या बाजारीकरणाची ही व्यवस्था एक दिवस रसातळाला नेल्याशिवाय राहणार नाही़. 

 

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल