शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

सरकार कामाला कधी लागणार ?

By admin | Updated: January 19, 2015 01:35 IST

भाजपा शिवसेनेचे सरकार सत्तेवर येऊन अडीच महिने झाले. मात्र चार दोन मंत्री सोडले तर सरकार कामाला लागले आहे, राज्यात बदल झाला आहे

अतुल कुलकर्णी -

भाजपा शिवसेनेचे सरकार सत्तेवर येऊन अडीच महिने झाले. मात्र चार दोन मंत्री सोडले तर सरकार कामाला लागले आहे, राज्यात बदल झाला आहे असे वाटत नाही. निर्णयांवर निर्णय घेतले जात आहेत पण अंमलबजावणी कशी होणार? त्याची कसलीच स्पष्टता नाही. अजून मंत्र्यांना त्यांची दालनं मिळालेली नाहीत. आहेत ती कायम राहणार की नाही याची खात्री नाही. अनेकांना पीए, पीएस नेमता आलेले नाहीत. दहा वर्षे ज्यांनी मंत्र्यांकडे काम केले आहे अशा अधिकाऱ्यांना नव्या मंत्र्यांनी घेऊ नये, असा आदेश असताना मुख्यमंत्री कार्यालयातच असे कोणी काम करत असेल तर अन्य मंत्र्यांना ते कोणत्या तोंडाने सांगणार? काही जण कोणतेही आदेश नसताना कार्यरत आहेत. त्यांना त्यांचा पगार कसा मिळणार याची चिंता नाही. विनापगार हे अधिकारी कशाच्या बळावर कार्यरत आहेत हा प्रश्न आहे. अनेक मंत्र्यांना अजूनही त्यांचा पूर्ण स्टाफ नेमता आलेला नाही. जे कार्यरत आहेत त्यांना तात्पुरत्या स्वरूपाच्या आॅर्डर आहेत. ते किती काळ राहणार हे त्यांनाही माहीत नाही. कोणत्याही मंत्र्यांच्या दालनात जा, अजूनही दालनं लावण्याचेच काम चालू आहे. राज्यमंत्र्यांची अवस्था आणखी कठीण आहे.मंत्री नवे, त्यांचा स्टाफ नवा, त्यातच राज्यात ६० हून अधिक आयएएस अधिकारी बदलले गेले, तेसुद्धा नवीन. दिवाळीत घरी खूप पाहुणे आले की घरच्या प्रमुखाची जशी धांदल उडते तशी अवस्था जवळपास सगळ्या विभागात आहे. या अशा नवलाईत अडीच महिने कापरासारखे निघून गेले. कोणत्या विषयावर कोणी प्रतिक्रिया द्यावी याचे संकेत पाळले जात नाहीत. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, अमुक तारखेला शपथविधी होणार या बातम्या मुख्यमंत्र्यांनी सांगायच्या, मात्र यावर सहकारमंत्री माध्यमांशी बोलतात. मुंबईत लोकल रेल्वे दिरंगाईवरून भडका उडाला तेव्हा पाच ते सहा मंत्र्यांनी निवेदने काढली आणि आपण रेल्वेमंत्र्यांशी बोललो असे सांगितले. केंद्रात एकाचवेळी किती मंत्री बोलले, त्यांचा त्या विषयाचा संबंध होता का? त्यातून पुढे काय झाले? नुसतीच चर्चा. संजय दत्त प्रकरणावरुन गृहराज्यमंत्री बेधडक बोलले. सुटीच्या दिवशी काम करणाऱ्या पोलिसांना डबल पगार देण्याची घोषणा त्यांनी शनिवारीच केली आहे. कसलीही तरतूद नसताना अशी घोषणा राज्यमंत्र्यांना करता येते का? मागच्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्रालयात गर्दीने सगळे विक्रम मोडले. ५२ हजार लोक आले. लोकांच्या अपेक्षांनी टोक गाठलेले आहे. मंत्री सांगतात, आमचेच बस्तान बसू द्या, मग तुमची कामे करु. हे किती दिवस चालेल? त्यांना त्यांचे बस्तान तातडीने बसवावे लागेल. सगळे विभाग कामाला लागले आहेत हे दिसणार कधी? टोलच्या प्रश्नावर निर्णय नाही. साखर, दूध, कापूस, फळबागांचे प्रश्न आ वासून आहेत. अडत्यांचा प्रश्न सुटलेला नाही. मुख्यमंत्री, मंत्री सांगतात दोन दिवसांत प्रश्न सुटेल. त्याला चार दिवस झाले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला उघडे पाडण्याचा प्रयत्न केला, पण दुसरी बाजू कोणी तितक्या ठामपणे मांडण्यास पुढे आले नाही. राजू शेट्टीच्या आंदोलनावर टीका केली पण शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांचा पक्ष कोणता मार्ग अवलंबणार, असा सवाल केला तेव्हा त्यांनी त्याचे कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही. ते सरकारची मजा पाहत तिरकस शैलीत चिमटे काढणार असतील, तर ज्यांच्या पोटाला चिमटे पडू लागले आहेत अशा बळीराजाने जायचे कोणाकडे?काँग्रेस पक्षात कोणाचा मागमूस कोणात नाही. मुंबई काँग्रेस ठप्प आहे. राज्यस्तरीय काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर काय ते पाहू म्हणून हातावर हात ठेवून बसले आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील गेल्या ्पंधरा दिवसांत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काही ठोस भूमिका घेत आंदोलन उभे करण्याचे बोलले असे चित्र नाही. चित्र गंभीर आहे. लोकांना आता घोषणा ऐकून कंटाळा आलाय. चारच गोष्टी सांगा, पण त्या करून दाखवा, असे लोक म्हणण्याच्या आत हालचाली व्हायला हव्यात.