शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

नाकावर राग का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:38 IST

सूरजपाल अमू हा वेडा इसम आहे. तो तसा असतानाही भारतीय जनता पक्षाने त्याला लोकसभेचे तिकीट देऊन त्या शहाण्यांच्या सभागृहात त्याला निवडून आणले आहे. समाजकारण, राजकारण आणि संघकरण यात राहूनही त्याला विवेक वा लोकशाही संकेतांची ओळख पटलेली नाही.

सूरजपाल अमू हा वेडा इसम आहे. तो तसा असतानाही भारतीय जनता पक्षाने त्याला लोकसभेचे तिकीट देऊन त्या शहाण्यांच्या सभागृहात त्याला निवडून आणले आहे. समाजकारण, राजकारण आणि संघकरण यात राहूनही त्याला विवेक वा लोकशाही संकेतांची ओळख पटलेली नाही. एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध होत असेल तर माणसाने किती संतापावे व विशेषत: सार्वजनिक जीवनातील पुढारी म्हणविणाºयांनी आपल्या रागाचा पारा किती अंशांपर्यंत वाढवावा याचे तारतम्य सगळ्याच समजूतदार माणसांनी बाळगायचे असते. अमू हा या समजूतदारपणापासून दूर असलेला वेडा खासदार आहे. ‘पद्मावती’ या सध्या चर्चेत असलेल्या चित्रपटाच्या वादाची एक बाजू घेऊन हा खासदार भडकला आहे. या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा शिरच्छेद करणाºयाला त्यांनी पाच कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. दीपिका पादुकोण या त्या चित्रपटात पद्मावतीचे काम करणाºया नटीचे नाक कापून आणणाºयालाही त्यांनी मोठे बक्षीस जाहीर केले आहे. तेवढ्यावर न थांबता या इसमाने बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही, त्यांचे नाक कापण्याची व त्यांची शूर्पणखा करण्याची धमकी दिली आहे. या अमूचे एक राजकीय तारतम्य मात्र येथे कुणाच्याही नजरेतून न सुटणारे आहे. पद्मावतीच्या प्रदर्शनाला महाराष्टÑ सरकारने मान्यता दिली आहे. पण अमूचा फडणविसांच्या नाकावर डोळा नाही कारण ते अमूच्याच पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. ममतादीदींचा पक्ष वेगळा आणि अमूच्या पक्षाला कडवा विरोध करणारा आहे. ही बाब पद्मावतीविषयीचे हे भांडण नुसते ऐतिहासिक वा सांस्कृतिक नसून राजकीयही आहे, हे चाणाक्षांच्या लक्षात आणून देणारी ठरावी. डोक्यात वेडेपण घेतलेली माणसे पुढारी कशी होतात, त्यांना तिकिटे कशी मिळतात आणि ती निवडली तरी का जातात हा यातला खरा प्रश्न आहे. कायद्याला हिंसाचार मान्य नसला तरी सध्याच्या राजकारणाला तो चालणारा आहे. त्यातही असा हिंसाचार सामूहिक असेल आणि तो एखाद्या समाजाविरुद्ध वा समाजाच्या धारणांविरुद्ध असेल तर तो निवडणुकीत विजयी करणाराही आहे. दिल्लीतील शिखांच्या आणि गुजरातमधील मुसलमानांच्या कत्तलीनंतर, त्या कत्तली करणारे पक्षच सत्तेवर निवडून आले हे याच राजकीय हिंसाचाराविषयीच्या आवडीचे लक्षण आहे. त्यामुळे अमूला कोणी अडवणार नाही. त्याला कायद्याचा बडगा दाखविला जाणार नाही आणि त्याच्या पक्षाचा कोणताही पुढारी त्याचे कान उपटणार नाही. उपराष्टÑपती व्यंकय्या नायडू म्हणाले, लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही. पण उपराष्टÑपतींचे पद शोभेचे व अधिकारशून्य आहे. ज्या पदांना अधिकार आहे तीही माणसे अशावेळी गप्प का राहतात. मोदी बोलत नाहीत, राजनाथ बोलत नाहीत आणि अमित शहा? त्यांना तर असा गदारोळ राजकीयदृष्ट्या लाभाचाच वाटावा असा आहे. फार पूर्वी उत्तर प्रदेशातील भाजपाच्या एका खासदाराने राज ठाकरे यांना मारहाण करणाºयाला बक्षीस जाहीर केले होते. तो प्रकार खपला. परिणामी अशा जाहीर धमक्यांचे पेवच देशात फुटले. खून करणे, शिरच्छेद करणे, नाक कापणे, हातपाय तोडणे अशा थेट तालिबानांच्या आणि इसीसच्या पातळीवर जाणाºया धमक्याच देशात दिल्या गेलेल्या पाहता आल्या. पोलीस थंड असतात. कायदे पुस्तकात राहतात आणि अशा धमकीबहाद्दर लोकांचे चेले त्यांच्या विजयी मिरवणुकाही काढतात. देशात संविधान दिवस साजरा होत असताना हे घडावे ही त्यातली आणखी शरमेची बाब. पण अमूला कोणी आवरणार नाही आणि आपल्या लोकशाहीला जडलेली ही हिंसेची काजळीही कधी पुसली जाणार नाही. अमूच्या वेडासारखे आणखीही अनेकांचे वेड आपल्याला काही काळ सांभाळायचे आहे हा या घटनाक्रमाचा अर्थ आहे.

टॅग्स :Padmavatiपद्मावतीcinemaसिनेमाIndiaभारत