शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

कर्नाटक निकालाचा  लोकसभेवर काय परिणाम? सर्वांनाच ‘रिथिंकिंग’ करावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 11:17 IST

लोकसभा निवडणूक दहा महिन्यांवर आली असताना, विविध राज्यांतील निकालांमुळे सर्वांनाच ‘रिथिंकिंग’ करावे लागेल.

सुनील चावके, सहयोगी संपादक, दिल्ली -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विजयांची ऐतिहासिक हॅट्ट्रिक नोंदवून सत्तेत परतण्याचे उद्दिष्ट बाळगणाऱ्या भाजपची झोप कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवाने उडविली आहे. या पराभवानंतर भाजपची केंद्रात पूर्ण बहुमताने सत्तेत परतण्याचा मार्ग आणखीच बिकट झाला आहे.

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहारपाठोपाठ कर्नाटक या लोकसभेच्या १५८ जागा असलेल्या चार राज्यांमध्ये वर्चस्व शाबूत राखून सत्तेत परतण्याचे अवघड आव्हान पंतप्रधान मोदी यांच्या भाजपपुढे असेल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने  महाराष्ट्रात शिवसेना, तर बिहारमध्ये जनता दल युनायटेड आणि लोकजनशक्ती पार्टीशी युती करून या १५८ जागांपैकी १२५ जागा जिंकल्या होत्या. त्यात भाजपचा वाटा ८३ जागांचा आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने कर्नाटकात २६, महाराष्ट्रात २३, पश्चिम बंगालमध्ये १८ तर बिहारमध्ये १७ जागा जिंकल्या आहेत. पण या चार राज्यांमध्ये २०२४ चे चित्र एवढे गुलाबी नसेल. बिहारमध्ये भाजपचा मित्रपक्ष जनता दल युनायटेडने राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसशी युती केली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने दुहेरी आकडा गाठू नये म्हणून ममता बनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने मोर्चेबांधणी केली आहे, तर महाराष्ट्रात भाजपची अवस्था सैरभैर झाल्याचे चित्र आहे.  लोकसभा निवडणूक दहा महिन्यांवर आली असताना या चार राज्यांनी भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढविली आहे. 

काँग्रेसने २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत १२५ जागा जिंकून सत्ता संपादन केल्यानंतर  २०१४ साली भाजपने लोकसभेच्या १७ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी काँग्रेस लोकसभेच्या ९ जागांवर विजयी झाली होती; पण २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत १०४ जागा जिंकून सत्तेच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २८ पैकी २५ जागा जिंकून प्रत्येकी एक जागा जिंकू शकलेल्या काँग्रेस आणि जद सेक्युलरचा धुव्वा उडविला होता. मात्र, आज विधानसभा निवडणुकीत दहा वर्षांनंतर निर्विवाद बहुमत मिळविताना काँग्रेसने तब्बल १५ लोकसभा मतदारसंघांमध्ये मताधिक्य प्रस्थापित करताना भाजपच्या गणिताला धक्का दिला आहे.  

कर्नाटक विधानसभेच्या ताज्या संख्याबळानुसार भाजपचा लोकसभेचा आकडा २५ वरून ८ वर घसरला आहे. हाच ट्रेंड कायम राहिल्यास भाजपला कर्नाटकात २०१९ साली जिंकलेल्या २५ जागा शाबूत राखणे अतिशय जिकिरीचे ठरणार आहे. कर्नाटकात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ५१ टक्के मते मिळवत १६० विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली होती. पण २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची पार घसरगुंडी झाली आहे. भाजपची मते २०१९ च्या तुलनेत तब्बल १५ टक्क्यांनी घसरली असून, ५१ टक्क्यांवरून ३५.७४ टक्क्यांवर आली आहेत. कर्नाटकात विधानसभेतील पराभवाने भाजपच्या लोकसभेच्याही चिंता वाढविल्या आहेत.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकKarnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे