शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

सरकार बदलल्याने खरोखर असे काय बदलते? खाडकन डोळे उघडणारे १० मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 08:41 IST

सरकारे बदलोत, मंत्री असोत-नसोत; गरिबांच्या जगण्यात काहीही फरक पडत नाही. सरकार आपले कल्याण करील, या भ्रमातून गरीब लोक बाहेर येऊ लागले आहेत!

-हेरंब कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते

सध्या महाराष्ट्रात सरकार बदलामुळे आणि मंत्रिमंडळच नसल्याने ठप्प कारभाराची चर्चा होते आहे. या चर्चेत मी एक वेगळा मुद्दा मांडू इच्छितो : सरकार बदलल्याने खरेच काही बदलते का?१) सरकार बदलल्याने काही धोरणे नक्कीच बदलतील, पण प्रत्यक्ष गरिबांच्या जगण्यात हस्तक्षेप करून सरकार नावाची यंत्रणा फार काही बदल घडवू शकते का? - प्रत्यक्ष अनुभव निराशाजनक!२) प्रशासकीय यंत्रणेचा पगार, पेन्शन आणि कर्जावरील मुद्दल व  व्याज यावर बजेटमधील ६० टक्केपेक्षा जास्त रक्कम खर्च होते. उरलेल्या रकमेत खरेच गरिबांचे आयुष्य बदलण्याचे सरकारने ठरवले तरी शक्य आहे का? 

३) गरिबांच्या विकास योजनांमध्ये ठेकेदारीला प्राधान्य असते.  योजनांची रचनाच ठेकेदारांना फायदा व्हावा अशी असते. विकासकामांचा दर्जा  अत्यंत खालावलेला राहतो.  ४)  गरीब कुटुंबासाठी रेशनचे धान्य, घरकुल सोडता थेट लाभाच्या योजना अतिशय कमी आहेत.  शिक्षण, आरोग्य, अंगणवाडी, परिवहन या सरकारी सुविधा सक्षम नाहीत. त्यामुळे गरीब निरुपायाने खासगी व्यवस्थेकडे वळतात. ही व्यवस्थाही गरिबांचे शोषणच करते.५)  रोजगार हमीसारखी थेट रोजगाराची योजना सोडली तर स्वयंरोजगाराच्या अन्य योजना हास्यास्पद आहेत. लाभार्थी निवडण्यात राजकीय हस्तक्षेप खूप मोठा असल्याने स्वयंरोजगाराला फारसा प्रतिसाद मिळत नाही. महिला बचत गटांना मदतीची तरतूदही दिवसेंदिवस कमी होते आहे. सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाने गरिबांच्या रोजगारासाठी फार प्रयत्न केलेले दिसत नाहीत. ६) गरिबांना दिल्या जाणाऱ्या थेट आर्थिक लाभाच्या योजना अत्यंत केविलवाण्या आहेत. संजय गांधी निराधार योजनेत फक्त १००० रुपये पेन्शन दिले जाते. मुले मोठी झाली की पेन्शन बंद होते व वार्षिक उत्पन्न २१००० रुपये असेल तरच पेन्शन मिळते. ५८ रुपये रोज इतक्या कमी उत्पन्नात महाराष्ट्रात एकही कुटुंब सापडणार नाही. गरिबांना लाभ मिळूच नये, अशी त्या योजनेची रचना आहे. दुसरीकडे आमदारांना ५ वर्षे काम केले तरी तहहयात पेन्शन!  गरिबांना १००० रुपये द्यायचे, तर हजार अटी! 

७) गरीब कुटुंबातील एखादी व्यक्ती अकस्मात मृत्यू पावली तर त्या कुटुंबाला २० हजार रुपये देण्याची केंद्राची योजना आहे. या योजनेत दारिद्र्यरेषेचे कार्ड सक्तीचे आहे. मात्र दारिद्र्यरेषेची यादी २००७ नंतर पुढे सरकलीच नाही. त्यामुळे योजनांची फक्त घोषणा, पण अंमलबजावणी नाही, असे अनेक योजनांबद्दल आहे.

८) दलित, आदिवासी, भटके विमुक्त यांचे जीवनमान फारसे उंचावले नाही. भटक्या विमुक्तातील अनेक कुटुंबे आजही गावोगाव फिरतात, त्यांना घरे नाहीत की त्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत. सरकार वाढीव आर्थिक तरतूद त्यांच्यासाठी करत नाही. कातकरी, माडियांसारखे आदिवासी समूह, शहर-खेड्यातील दलित कुटुंबे व सर्वच गरिबांची स्थिती विदारक आहे. सरकार बदलल्याने या वंचितांना काहीच बदल अनुभवायला मिळत नाही.९) गरिबांसाठी वाढीव तरतूद करणे सोडाच, पण मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय यांचे दडपण वाढत्या नागरीकरणामुळे सरकारवर वाढते आहे. त्यातून बुलेट ट्रेन काढाव्यात, समृद्धी महामार्ग, सी लिंक, मोठे पूल यावर आज तरतूद वाढते आहे. ती गरज असेलही, पण प्राधान्यक्रमात ते खूप मागे असायला हवे.१०) आदिवासी किंवा गरीब वस्तीत एक तर सरकारी योजना माहिती नसतात. माहिती मिळाली तर कागदपत्रे नसल्याने वैतागून अनेकजण नाद सोडतात. फक्त राजकीय कार्यकर्त्यांच्या जवळच्या व्यक्तींना लाभ मिळतात असेच दिसून आले आहे. यातून गरिबांनी सरकारचा नादच सोडून दिला आहे.  जमेल तोपर्यंत गावात कष्ट करायचे आणि गुजराण होणे थांबले  की सरळ तिथून स्थलांतर करायचे. ऊसतोडीला, वीटभट्टीला किंवा बांधकामावर अथवा शहरात कामाला निघून जायचे अशी जीवनशैली गरिबांनी स्वीकारली आहे. सरकारी व्यवस्था गावातल्या गरिबांना जगवत नाही याचा “स्थलांतर” हा महत्त्वाचा पुरावा आहे.

कितीही सरकारे बदलोत, मंत्री असोत की नसोत, गरीब जनतेला हे माहीत आहे की याने आपल्या जीवनात काहीही फरक पडणार नाही. सरकार आपले कल्याण करील, या भ्रमातून गरीब लोक बाहेर येतानाच मला तरी दिसतात. आजच्या ग्रामीण दारिद्र्याचे कठोर वास्तव आहे...herambkulkarni1971@gmail.com

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे