शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

सरकार बदलल्याने खरोखर असे काय बदलते? खाडकन डोळे उघडणारे १० मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 08:41 IST

सरकारे बदलोत, मंत्री असोत-नसोत; गरिबांच्या जगण्यात काहीही फरक पडत नाही. सरकार आपले कल्याण करील, या भ्रमातून गरीब लोक बाहेर येऊ लागले आहेत!

-हेरंब कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते

सध्या महाराष्ट्रात सरकार बदलामुळे आणि मंत्रिमंडळच नसल्याने ठप्प कारभाराची चर्चा होते आहे. या चर्चेत मी एक वेगळा मुद्दा मांडू इच्छितो : सरकार बदलल्याने खरेच काही बदलते का?१) सरकार बदलल्याने काही धोरणे नक्कीच बदलतील, पण प्रत्यक्ष गरिबांच्या जगण्यात हस्तक्षेप करून सरकार नावाची यंत्रणा फार काही बदल घडवू शकते का? - प्रत्यक्ष अनुभव निराशाजनक!२) प्रशासकीय यंत्रणेचा पगार, पेन्शन आणि कर्जावरील मुद्दल व  व्याज यावर बजेटमधील ६० टक्केपेक्षा जास्त रक्कम खर्च होते. उरलेल्या रकमेत खरेच गरिबांचे आयुष्य बदलण्याचे सरकारने ठरवले तरी शक्य आहे का? 

३) गरिबांच्या विकास योजनांमध्ये ठेकेदारीला प्राधान्य असते.  योजनांची रचनाच ठेकेदारांना फायदा व्हावा अशी असते. विकासकामांचा दर्जा  अत्यंत खालावलेला राहतो.  ४)  गरीब कुटुंबासाठी रेशनचे धान्य, घरकुल सोडता थेट लाभाच्या योजना अतिशय कमी आहेत.  शिक्षण, आरोग्य, अंगणवाडी, परिवहन या सरकारी सुविधा सक्षम नाहीत. त्यामुळे गरीब निरुपायाने खासगी व्यवस्थेकडे वळतात. ही व्यवस्थाही गरिबांचे शोषणच करते.५)  रोजगार हमीसारखी थेट रोजगाराची योजना सोडली तर स्वयंरोजगाराच्या अन्य योजना हास्यास्पद आहेत. लाभार्थी निवडण्यात राजकीय हस्तक्षेप खूप मोठा असल्याने स्वयंरोजगाराला फारसा प्रतिसाद मिळत नाही. महिला बचत गटांना मदतीची तरतूदही दिवसेंदिवस कमी होते आहे. सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाने गरिबांच्या रोजगारासाठी फार प्रयत्न केलेले दिसत नाहीत. ६) गरिबांना दिल्या जाणाऱ्या थेट आर्थिक लाभाच्या योजना अत्यंत केविलवाण्या आहेत. संजय गांधी निराधार योजनेत फक्त १००० रुपये पेन्शन दिले जाते. मुले मोठी झाली की पेन्शन बंद होते व वार्षिक उत्पन्न २१००० रुपये असेल तरच पेन्शन मिळते. ५८ रुपये रोज इतक्या कमी उत्पन्नात महाराष्ट्रात एकही कुटुंब सापडणार नाही. गरिबांना लाभ मिळूच नये, अशी त्या योजनेची रचना आहे. दुसरीकडे आमदारांना ५ वर्षे काम केले तरी तहहयात पेन्शन!  गरिबांना १००० रुपये द्यायचे, तर हजार अटी! 

७) गरीब कुटुंबातील एखादी व्यक्ती अकस्मात मृत्यू पावली तर त्या कुटुंबाला २० हजार रुपये देण्याची केंद्राची योजना आहे. या योजनेत दारिद्र्यरेषेचे कार्ड सक्तीचे आहे. मात्र दारिद्र्यरेषेची यादी २००७ नंतर पुढे सरकलीच नाही. त्यामुळे योजनांची फक्त घोषणा, पण अंमलबजावणी नाही, असे अनेक योजनांबद्दल आहे.

८) दलित, आदिवासी, भटके विमुक्त यांचे जीवनमान फारसे उंचावले नाही. भटक्या विमुक्तातील अनेक कुटुंबे आजही गावोगाव फिरतात, त्यांना घरे नाहीत की त्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत. सरकार वाढीव आर्थिक तरतूद त्यांच्यासाठी करत नाही. कातकरी, माडियांसारखे आदिवासी समूह, शहर-खेड्यातील दलित कुटुंबे व सर्वच गरिबांची स्थिती विदारक आहे. सरकार बदलल्याने या वंचितांना काहीच बदल अनुभवायला मिळत नाही.९) गरिबांसाठी वाढीव तरतूद करणे सोडाच, पण मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय यांचे दडपण वाढत्या नागरीकरणामुळे सरकारवर वाढते आहे. त्यातून बुलेट ट्रेन काढाव्यात, समृद्धी महामार्ग, सी लिंक, मोठे पूल यावर आज तरतूद वाढते आहे. ती गरज असेलही, पण प्राधान्यक्रमात ते खूप मागे असायला हवे.१०) आदिवासी किंवा गरीब वस्तीत एक तर सरकारी योजना माहिती नसतात. माहिती मिळाली तर कागदपत्रे नसल्याने वैतागून अनेकजण नाद सोडतात. फक्त राजकीय कार्यकर्त्यांच्या जवळच्या व्यक्तींना लाभ मिळतात असेच दिसून आले आहे. यातून गरिबांनी सरकारचा नादच सोडून दिला आहे.  जमेल तोपर्यंत गावात कष्ट करायचे आणि गुजराण होणे थांबले  की सरळ तिथून स्थलांतर करायचे. ऊसतोडीला, वीटभट्टीला किंवा बांधकामावर अथवा शहरात कामाला निघून जायचे अशी जीवनशैली गरिबांनी स्वीकारली आहे. सरकारी व्यवस्था गावातल्या गरिबांना जगवत नाही याचा “स्थलांतर” हा महत्त्वाचा पुरावा आहे.

कितीही सरकारे बदलोत, मंत्री असोत की नसोत, गरीब जनतेला हे माहीत आहे की याने आपल्या जीवनात काहीही फरक पडणार नाही. सरकार आपले कल्याण करील, या भ्रमातून गरीब लोक बाहेर येतानाच मला तरी दिसतात. आजच्या ग्रामीण दारिद्र्याचे कठोर वास्तव आहे...herambkulkarni1971@gmail.com

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे