शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

पाणथळ जागा, स्थलांतरित पक्षी आणि त्याचा अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 04:04 IST

पक्षी स्थलांतर ही पक्षी जगतातील अत्यंत अद्भुत व अनोखी अशी बाब आहे. फार पुरातन काळापासून या स्थलांतराबाबत विविध मते मांडली जात आहेत.

- संजय करकरे, सहायक संचालक, बीएनएचएसपक्षी स्थलांतर ही पक्षी जगतातील अत्यंत अद्भुत व अनोखी अशी बाब आहे. फार पुरातन काळापासून या स्थलांतराबाबत विविध मते मांडली जात आहेत. आर्क्टिक परिसराचा अथवा भारताचा विचार केला तर हिमालयात हिवाळा सुरू झाला की, लाखो पक्षी दक्षिणेकडे म्हणजेच उबदार प्रदेशाकडे आपोआप वाटचाल करायला लागतात. यासाठी हे पक्षी हजारो किलोमीटरचे अंतर पार करतात.

या पक्षी स्थलांतराचा अभ्यास करण्याची सर्वांत सोपी व कमी खर्चीक पद्धत म्हणजे या पक्ष्यांच्या पायात कडी घालायची. आपल्या देशात सर्वप्रथम हे काम पर्यावरण क्षेत्रात अग्रणी अशा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) सुरू केले. १९२७ च्या सुमारास सुरू झालेले हे काम गेली नऊ दशके अव्याहतपणे सुरू आहे. आजतागायत बीएनएचएसने सुमारे सात लाखांहून अधिक पक्ष्यांच्या पायात कडी अडकवली आहे. हे कडी अडकवलेले पक्षी नंतर २९ देशांत सापडले. या अभ्यासामुळे पक्षी कोठून कोठे स्थलांतर करतात, त्यांचे मार्ग कुठले, इतका दूरचा प्रवास ते कसा करतात? यासारख्या महत्त्वपूर्ण गोष्टींचे खुलासे झाले आहेत. या अभ्यासाद्वारे पक्ष्यांच्या स्थलांतराचा उड्डाण मार्ग (फ्लाय वे) कळला आहे. रशिया ते भारतीय उपखंडापर्यंतचा मध्य आशियाई उड्डाण मार्ग (सेंट्रल एशियन फ्लायवे-सीएफ) अधोरेखित झाला आहे. जगभरात विविध असे ९ उड्डाण मार्ग असून, आपल्या परिसरात येणारे ९० टक्के पक्षी मध्य आशियाई उड्डाण मार्गासह तीन मार्गांचा अवलंब करतात. या मार्गावर येणारे पक्ष्यांचे थांबे हे तळी, नद्या, सरोवरे, दोन स्थळांतील अंतर, तसेच पक्ष्यांच्या विणीच्या जागाही समजल्या आहेत. या शास्त्रीय माहितीचा उपयोग पक्ष्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. बीएनएचएसने ९० वर्षांच्या अभ्यासावर प्रसिद्ध केलेले ‘इंडियन बर्ड मायग्रेशन अ‍ॅटलस’ हे पुस्तक बघितले तर या पक्ष्यांच्या अद्भुत अशा स्थलांतर व संवर्धनाचे महत्त्व समजून येईल. जसे तंत्रज्ञान प्रगत होत गेले तसे पक्षी शास्त्रातील या विषयाचे परिमाणही बदलले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाल्याने सॅटेलाईट टेलिमेट्रीने पक्ष्यांची अधिक व अचूक माहिती, त्यांचे योग्य असे उड्डाण मार्ग, थांबे स्पष्ट होऊ लागले. आता या तंत्रज्ञानाचाच बीएनएचएस मोठ्या प्रमाणावर वापर करीत असून, त्यातूनही अद्भुत अशी माहिती समोर येत आहे. हवामान बदलाचे फटके जसे माणसांना बसताहेत तसे निसर्गातील या घटकांनाही बसत आहेत. पक्ष्यांचा स्थलांतराचा मार्ग बदलत आहे. त्यांच्या संख्येवर परिणाम होत आहे. पक्षी स्थलांतराचा पारंपरिक मार्ग बदलू लागले आहेत. यामुळे या परिणामांचा विस्तृत अभ्यास करण्यासाठी पाणथळ जागांच्या संरक्षण संवर्धनासाठी राष्ट्रीय कृती आराखडा तयार केला आहे. २०१८ मध्ये केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने २०१८ ते २०२३ अशा पाच वर्षांचा हा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धनासाठी तसेच त्यांच्या आधिवासाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. या आराखड्यात बीएनएचएसचे महत्त्वाचे योगदान आहे.
भारतीय उपखंडाचा विचार केला तर सुमारे ३७० जातींचे स्थलांतरित पक्षी तीन उड्डाण मार्गांचा वापर करून येथे येतात. त्यातील ३१० जातींचे पाणपक्षी, तर उर्वरित पक्षी जमिनीवरील विविध आधिवासांचा वापर करतात. यातील १८२ जातींचे पाणपक्षी मध्य आशियाई उड्डाण मार्गाचा अवलंब करतात. देशभरातील १७ राज्यांतील वीसहून अधिक पाणथळ जागांचा या कृती आराखड्यानुसार अभ्यास केला जाणार आहे. महाराष्ट्रातील जायकवाडी, गाणगापूर धरण व माळरान परिसर तसेच नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्याचा यात समावेश आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील माहुल, शिवडी परिसर, अलिबाग, उरण व ठाणे खाडीतील पक्ष्यांचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने लोणावळा येथे १८ ते २२ नोव्हेंबरअखेर ‘पाणथळ जागा व स्थलांतरित पक्षी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद सुरू झाली आहे. या परिषदेत अनेक देशांचे शास्त्रज्ञ यासंदर्भात आपले योगदान व विचार मांडणार आहेत.
ज्या जंगलात वाघ राहतात, ते जंगल समृद्ध समजले जाते. अगदी तसेच ज्या पाणथळ परिसरात पक्षी मोठ्या संख्येने राहतात तो परिसर समृद्ध मानला जातो. हा परिसर केवळ पक्ष्यांसाठीच नाही, तर माणसांसाठीही समृद्ध असतो. या परिसरात भरपूर पाणी आणि संपन्न शेती असते. मात्र अनधिकृत मासेमारी, गाळपेरा, पाण्याचा प्रचंड उपसा आणि प्रदूषणामुळे पाणथळीच्या जागा धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे निसर्गासाठी, निसर्गातील प्रत्येक घटकासाठी पक्ष्यांसह सर्वच घटकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

टॅग्स :environmentपर्यावरण