शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
6
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
7
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
8
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
9
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
10
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
11
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
12
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
13
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
14
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
15
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
16
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
17
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
18
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
19
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
20
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
Daily Top 2Weekly Top 5

Weather: दिवसभर उष्णता गिळून रात्री तापणाऱ्या शहरांचे काय चुकते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 09:48 IST

Weather: यावर्षीच्या उन्हाळ्यातला रखरखाट विसरणे परवडणार नाही. सिमेंट काँक्रीटचे उत्तुंग जंगल उभारण्याच्या श्रीमंत वेडाला आवर घालण्याची वेळ आली आहे!

- सुलक्षणा महाजन(शहर नियोजन विशेषज्ञ )दिल्लीमध्ये उन्हाळ्यात पारा ५२ सेल्सियसच्या वर! राजस्थान, गुजराथ, मध्यप्रदेश उत्तर प्रदेश राज्यातील अनेक शहरांत तापमान ४५ ते ५० डिग्री सेल्सियस पार. उष्णतेच्या लाटांचा तडाखा, पाण्याचे दुर्भिक्ष, सावल्यांचा अभाव, बेघरांची वणवण…. चातकासारखी पावसाची वाट.  अ-वेळी, न-वेळी येणारा  पाऊस, पूर, वादळे, भूस्खलन, चिखलाचे पूर आणि त्यात हरवणाऱ्या वस्त्या आणि ठप्प होणारी शहरे ! गेली काही वर्षे भारतातील गावा-शहरांचे हे वर्तमान! माणसाच्या निसर्गातील हस्तक्षेपाबद्दल चार-पाच दशके तरी जगभरातील पर्यावरण तज्ज्ञ, वैज्ञानिक इशारे देत आहेत; पण  बहिऱ्या, आंधळ्या नेत्यांना त्यातले काही ऐकू येत नाही.  भारतामध्ये अजूनही बहुसंख्य सुशिक्षित, सधन शहरी नागरिक आणि लोकप्रतिनिधी सातत्याने या प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत. उष्णतारोधक नागरी धोरणांच्या विरोधात उष्णता वाढवणाऱ्या काँक्रीटचे जंगल उभारण्यासाठी एकवटले आहेत. विकासकांचे गुलाम बनून सुरक्षित बांधकाम नियमांची मनमानी मोडतोड करून दाटीवाटीने उत्तुंग इमारती उभारत आहेत. जोडीला मोटारींना वेगवान मुक्तमार्ग आणि पार्किंगसाठी बहुमजली व्यवस्था  उपलब्ध करीत आहेत. ८-१० मार्गिकांचे महामार्ग, शेकडो उड्डाणपूल, उन्नत मेट्रो यावर अतोनात सार्वजनिक पैसे उधळत आहेत. शहरांमधील सार्वजनिक मोकळ्या जागा, बगीचे, उद्याने यांचा विसरच पडला आहे. जमिनीचा प्रत्येक तुकडा इमारतींनी भरून काढत सिमेंटसाठी चुनखडीचे डोंगर, दगड आणि खडीसाठी काळे कातळ तोडत आहेत. डोंगर खणून शहरांची उष्णता बेटे करीत आहेत.

एकेकाळी शेतीसाठी भारतामधील जंगले जाळून नष्ट केली जात असत. तोही निसर्गाचा आणि परिसराचा विनाश होता, संथगतीने होणारा. तेव्हा जखमा भरून काढायला निसर्गाला थोडा-फार अवसर मिळत होता. तेव्हाही अनेक लोकसमूह देवराया आणि जंगलांचे प्राणपणाने जतन करीत होते. अलीकडच्या काळात मात्र शेती आणि खनिजांसाठी जंगले भराभर उद्ध्वस्थ करणे सुरू आहे. उजाड डोंगर, जमिनी आणि उत्तुंग इमारती सूर्याची उष्णता दिवसभर गिळून संध्याकाळी बाहेर टाकत रात्रीचेही तापमान वाढवत आहेत. वरून  हवा थंड करण्याची यंत्रे घरात-कार्यालयात बसवून आसमंत अधिकच तापवला  जात आहे. 

अशा उष्णतेने समुद्र, नद्यांचे तलावांचे पाणी तापते, पाण्याचे बाष्पीभवन वाढते, पाण्याचे दुर्भिक्ष वाढते आणि पाठोपाठ येणाऱ्या पावसाळ्यात पावसाचे, पुराचे, ढगफुटीचे, वादळवाऱ्यांचे तांडव सुरु होते. शहरे, घरे, नागरिक आणि संपत्ती पुरात वाहून जाते. जागतिक तापमान वाढीच्या समस्येला तोंड देण्यासाठी  वैयक्तिक पातळीवर ऊर्जेची आणि पाण्याची काटकसर हे उपाय आहेत; स्थानिक वस्त्या आणि शहरांच्या पातळीवर सुयोग्य वास्तुरचना आणि नागरी उष्णता कमी करण्यासाठी हरित जागांची रचना आवश्यक आहे. या शिवाय रस्त्यांवर सावली देणाऱ्या झाडांचे आच्छादन आवश्यक आहे. त्यासाठी रस्त्यांची रुंदी, त्यावर वेगाने धावणाऱ्या वाहनांवर तातडीने मर्यादा घालणे, उजाड डोंगर, नापीक शेतजमिनींवर गवताची, झुडुपांची लागवड करून तप्त धरित्रीला थंड करण्यासाठीचे  प्रयत्न आवश्यक आहेत. 

सर्वात आधी शहरी धनिक आणि मध्यमवर्गीयांचे उपभोग आणि त्यांच्या आहारी गेलेल्याराजकीय नेत्यांचे उपद्रव शहरी सजग नागरिकांनाच पुढाकार घेऊन मर्यादित करावे लागतील. भले प्रचंड  महामार्ग, सिमेंटचे रस्ते, वेगवान मोटारी, उत्तुंग इमारतींच्या वेडाला आवर घालावा  लागेल. हे सर्व भारतामध्ये कसे करायचे ह्याचे धडे उष्ण कटिबंधातील सिंगापूर, शीत कटिबंधातील स्वीडन, नॉर्वे आणि युरोपमधील अनेक देशांकडून शिकावे लागतील.

एक मात्र नक्की, पृथ्वीला थंडावा देण्यासाठी जनमत घडविण्याची सर्वात मोठी जबाबदारी सजग नागरिक, नगरपालिका, नगर नियोजनकार आणि वास्तुरचनाकारांची आहे. निसर्गनिर्मित आणि मानव निर्मित व्यवस्थांचा व व्यवहारांचा एकत्रित विचार करणारे नगरविज्ञान हे त्यासाठी सर्वात महत्त्वाचे साधन असणार आहे. नगरविज्ञानाची कास धरली तर धरित्रीचा ताप आणि शाप दूर करणे अजूनही शक्य होईल.    sulakshana.mahajan@gmail.com

टॅग्स :weatherहवामानenvironmentपर्यावरण