शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

हवामानाचे अंदाज चुकतात कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 05:57 IST

हवामान खात्याचे चुकलेले अंदाज ही एक खिल्ली उडवण्याची बाब आहे. हे अंदाज का आणि कसे चुकतात? ते मिळवले जातात, ...

हवामान खात्याचे चुकलेले अंदाज ही एक खिल्ली उडवण्याची बाब आहे. हे अंदाज का आणि कसे चुकतात? ते मिळवले जातात, ही सर्वसामान्यांच्या दृष्टीने नेहमीच उत्सुकतेची बाब असते.आजमितीस जगभरात हवामान व पावसाचे अंदाज मिळवण्यासाठी सर्वत्र संगणकीय व्यवस्थेचा वापर होतो. अवकाशातील उपग्रहांद्वारे मिळालेली माहिती या संगणकांना पुरविली जाते. कोणताही संगणक त्यास दिल्या जाणाऱ्या प्रणालीनुसार कार्य करीत असतो. पृथ्वीवरील हवामान आधीच्या अनेक वर्षांत कोणत्या परिस्थितीत (कंडिशन्स) कसे होते, याची माहिती संगणकाला पुरवलेली असते. त्याआधारे व आताच्या हवामानाची स्थिती काय आहे, याचा तपशील संगणकाला मिळाल्यानंतर संगणक भविष्यातील हवामान व पाऊस कसे असेल याचा अंदाज व्यक्त करतो. परंतु आपला निसर्ग हवामानातील लहान बदलांबाबतही खूप संवेदनशील आहे. परिणामी, जर संगणकांची प्रणाली लिहिताना जर काही चूक झाली तर हवामानाचे अंदाज पण चुकणार आहेत.निसर्गात एकाच वेळेला अनेक घटक कार्यरत असतात. कुठल्या घटकाला किती महत्त्व द्यायचे हे ठरवित असताना अनेकदा चुका होत असतात. उदा. समुद्राच्या पाण्याचे तापमान, त्यातून निर्माण होणारी वाफ, समुद्रातील हिमसाठा व अन्य घटक. दोन्ही ध्रुवांवरील बर्फ वेगाने वितळत असल्याने पाण्याचे तापमान स्थिर राहत नाही. वातावरणातील कार्बनडाय आॅक्साइडचे प्रमाण सतत वाढत आहे. परिणामी तापमानवाढ वेगाने होत आहे. या तापमानवाढीमुळे हवामानात जीवनास धोकादायक बदल होत आहेत. हे बदल संगणकाची प्रणाली तयार करताना त्यात समाविष्ट केलेले नाहीत. परिणामी, हवामानाचे अंदाज चुकीचे ठरत आहेत. याचे उत्तम उदाहरण नुकत्याच अमेरिकेत आलेल्या मायकेल वादळाचे आहे. तेथे खूप प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध असूनही, या वादळाची तीव्रता अचानक इतकी वाढली की नागरिकांना या वादळाच्या धोक्याची सूचना फक्त काही तासच आधी देण्यात आली. परिणामी, अजून २ हजार लोक घरांच्या ढिगाºयाखाली अडकले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत १८ जण या वादळांत मरण पावले आहेत. तरी सुमारे ३० लाख लोकांनी स्थलांतर केले होते.कार्बन वायू सूर्याकडून आलेली उष्णता पृथ्वीवर येऊ देतो, मात्र रात्री ही वातावरणातील दिवसा शोषलेली उष्णता काही प्रमाणात अडवून ठेवतो व त्यामुळे शोषलेली उष्णता पूर्णपणे पृथ्वीच्या वातावरणाबाहेर पडत नाही. परिणामी, पृथ्वीवरचे तापमान वाढते. या तापमानवाढीमुळे हवामानात झालेले बदल जीवनास हानिकारक आहेत. तापमानवाढ रोखण्यासाठी मानवाने फोसील इंधनाचा वापर पूर्णपणे थांबविणे आवश्यक आहे. म्हणून सोलार, विंड व समुद्र लाटांपासून पुन्हा पुन्हा निर्मित होऊ शकणारी ऊर्जा वापरणे अत्यावश्यक झाले आहे. वातावरणातील कार्बनचे प्रमाण ३५० पेक्षा जास्त असणे हानिकारक असते. आताच हे प्रमाण ४१० पीपीएम एवढे झाले आहे. परिणामी, आताच आपण यावर सारासार विचार करत हवामानाचा अंदाज देताना प्रामुख्याने सर्व अंगाने विचार केला पाहिजे.- शिरीष मेढी । पर्यावरणशास्त्र अभ्यासक

टॅग्स :environmentवातावरण