शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
4
भाजपा नेत्यासमोरच पत्नीची हत्या, धारदार हत्याराने चिरला गळा, दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे खळबळ  
5
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
6
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
7
ग्रीन झोनमध्ये शेअर बाजाराची कामकाजास सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह 'हे' शेअर्स उघडले
8
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
9
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
11
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
12
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
13
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
14
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
15
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
16
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
17
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
18
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
19
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
20
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!

हवामानाचे अंदाज चुकतात कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 05:57 IST

हवामान खात्याचे चुकलेले अंदाज ही एक खिल्ली उडवण्याची बाब आहे. हे अंदाज का आणि कसे चुकतात? ते मिळवले जातात, ...

हवामान खात्याचे चुकलेले अंदाज ही एक खिल्ली उडवण्याची बाब आहे. हे अंदाज का आणि कसे चुकतात? ते मिळवले जातात, ही सर्वसामान्यांच्या दृष्टीने नेहमीच उत्सुकतेची बाब असते.आजमितीस जगभरात हवामान व पावसाचे अंदाज मिळवण्यासाठी सर्वत्र संगणकीय व्यवस्थेचा वापर होतो. अवकाशातील उपग्रहांद्वारे मिळालेली माहिती या संगणकांना पुरविली जाते. कोणताही संगणक त्यास दिल्या जाणाऱ्या प्रणालीनुसार कार्य करीत असतो. पृथ्वीवरील हवामान आधीच्या अनेक वर्षांत कोणत्या परिस्थितीत (कंडिशन्स) कसे होते, याची माहिती संगणकाला पुरवलेली असते. त्याआधारे व आताच्या हवामानाची स्थिती काय आहे, याचा तपशील संगणकाला मिळाल्यानंतर संगणक भविष्यातील हवामान व पाऊस कसे असेल याचा अंदाज व्यक्त करतो. परंतु आपला निसर्ग हवामानातील लहान बदलांबाबतही खूप संवेदनशील आहे. परिणामी, जर संगणकांची प्रणाली लिहिताना जर काही चूक झाली तर हवामानाचे अंदाज पण चुकणार आहेत.निसर्गात एकाच वेळेला अनेक घटक कार्यरत असतात. कुठल्या घटकाला किती महत्त्व द्यायचे हे ठरवित असताना अनेकदा चुका होत असतात. उदा. समुद्राच्या पाण्याचे तापमान, त्यातून निर्माण होणारी वाफ, समुद्रातील हिमसाठा व अन्य घटक. दोन्ही ध्रुवांवरील बर्फ वेगाने वितळत असल्याने पाण्याचे तापमान स्थिर राहत नाही. वातावरणातील कार्बनडाय आॅक्साइडचे प्रमाण सतत वाढत आहे. परिणामी तापमानवाढ वेगाने होत आहे. या तापमानवाढीमुळे हवामानात जीवनास धोकादायक बदल होत आहेत. हे बदल संगणकाची प्रणाली तयार करताना त्यात समाविष्ट केलेले नाहीत. परिणामी, हवामानाचे अंदाज चुकीचे ठरत आहेत. याचे उत्तम उदाहरण नुकत्याच अमेरिकेत आलेल्या मायकेल वादळाचे आहे. तेथे खूप प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध असूनही, या वादळाची तीव्रता अचानक इतकी वाढली की नागरिकांना या वादळाच्या धोक्याची सूचना फक्त काही तासच आधी देण्यात आली. परिणामी, अजून २ हजार लोक घरांच्या ढिगाºयाखाली अडकले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत १८ जण या वादळांत मरण पावले आहेत. तरी सुमारे ३० लाख लोकांनी स्थलांतर केले होते.कार्बन वायू सूर्याकडून आलेली उष्णता पृथ्वीवर येऊ देतो, मात्र रात्री ही वातावरणातील दिवसा शोषलेली उष्णता काही प्रमाणात अडवून ठेवतो व त्यामुळे शोषलेली उष्णता पूर्णपणे पृथ्वीच्या वातावरणाबाहेर पडत नाही. परिणामी, पृथ्वीवरचे तापमान वाढते. या तापमानवाढीमुळे हवामानात झालेले बदल जीवनास हानिकारक आहेत. तापमानवाढ रोखण्यासाठी मानवाने फोसील इंधनाचा वापर पूर्णपणे थांबविणे आवश्यक आहे. म्हणून सोलार, विंड व समुद्र लाटांपासून पुन्हा पुन्हा निर्मित होऊ शकणारी ऊर्जा वापरणे अत्यावश्यक झाले आहे. वातावरणातील कार्बनचे प्रमाण ३५० पेक्षा जास्त असणे हानिकारक असते. आताच हे प्रमाण ४१० पीपीएम एवढे झाले आहे. परिणामी, आताच आपण यावर सारासार विचार करत हवामानाचा अंदाज देताना प्रामुख्याने सर्व अंगाने विचार केला पाहिजे.- शिरीष मेढी । पर्यावरणशास्त्र अभ्यासक

टॅग्स :environmentवातावरण