शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हवामानाचे अंदाज चुकतात कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 05:57 IST

हवामान खात्याचे चुकलेले अंदाज ही एक खिल्ली उडवण्याची बाब आहे. हे अंदाज का आणि कसे चुकतात? ते मिळवले जातात, ...

हवामान खात्याचे चुकलेले अंदाज ही एक खिल्ली उडवण्याची बाब आहे. हे अंदाज का आणि कसे चुकतात? ते मिळवले जातात, ही सर्वसामान्यांच्या दृष्टीने नेहमीच उत्सुकतेची बाब असते.आजमितीस जगभरात हवामान व पावसाचे अंदाज मिळवण्यासाठी सर्वत्र संगणकीय व्यवस्थेचा वापर होतो. अवकाशातील उपग्रहांद्वारे मिळालेली माहिती या संगणकांना पुरविली जाते. कोणताही संगणक त्यास दिल्या जाणाऱ्या प्रणालीनुसार कार्य करीत असतो. पृथ्वीवरील हवामान आधीच्या अनेक वर्षांत कोणत्या परिस्थितीत (कंडिशन्स) कसे होते, याची माहिती संगणकाला पुरवलेली असते. त्याआधारे व आताच्या हवामानाची स्थिती काय आहे, याचा तपशील संगणकाला मिळाल्यानंतर संगणक भविष्यातील हवामान व पाऊस कसे असेल याचा अंदाज व्यक्त करतो. परंतु आपला निसर्ग हवामानातील लहान बदलांबाबतही खूप संवेदनशील आहे. परिणामी, जर संगणकांची प्रणाली लिहिताना जर काही चूक झाली तर हवामानाचे अंदाज पण चुकणार आहेत.निसर्गात एकाच वेळेला अनेक घटक कार्यरत असतात. कुठल्या घटकाला किती महत्त्व द्यायचे हे ठरवित असताना अनेकदा चुका होत असतात. उदा. समुद्राच्या पाण्याचे तापमान, त्यातून निर्माण होणारी वाफ, समुद्रातील हिमसाठा व अन्य घटक. दोन्ही ध्रुवांवरील बर्फ वेगाने वितळत असल्याने पाण्याचे तापमान स्थिर राहत नाही. वातावरणातील कार्बनडाय आॅक्साइडचे प्रमाण सतत वाढत आहे. परिणामी तापमानवाढ वेगाने होत आहे. या तापमानवाढीमुळे हवामानात जीवनास धोकादायक बदल होत आहेत. हे बदल संगणकाची प्रणाली तयार करताना त्यात समाविष्ट केलेले नाहीत. परिणामी, हवामानाचे अंदाज चुकीचे ठरत आहेत. याचे उत्तम उदाहरण नुकत्याच अमेरिकेत आलेल्या मायकेल वादळाचे आहे. तेथे खूप प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध असूनही, या वादळाची तीव्रता अचानक इतकी वाढली की नागरिकांना या वादळाच्या धोक्याची सूचना फक्त काही तासच आधी देण्यात आली. परिणामी, अजून २ हजार लोक घरांच्या ढिगाºयाखाली अडकले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत १८ जण या वादळांत मरण पावले आहेत. तरी सुमारे ३० लाख लोकांनी स्थलांतर केले होते.कार्बन वायू सूर्याकडून आलेली उष्णता पृथ्वीवर येऊ देतो, मात्र रात्री ही वातावरणातील दिवसा शोषलेली उष्णता काही प्रमाणात अडवून ठेवतो व त्यामुळे शोषलेली उष्णता पूर्णपणे पृथ्वीच्या वातावरणाबाहेर पडत नाही. परिणामी, पृथ्वीवरचे तापमान वाढते. या तापमानवाढीमुळे हवामानात झालेले बदल जीवनास हानिकारक आहेत. तापमानवाढ रोखण्यासाठी मानवाने फोसील इंधनाचा वापर पूर्णपणे थांबविणे आवश्यक आहे. म्हणून सोलार, विंड व समुद्र लाटांपासून पुन्हा पुन्हा निर्मित होऊ शकणारी ऊर्जा वापरणे अत्यावश्यक झाले आहे. वातावरणातील कार्बनचे प्रमाण ३५० पेक्षा जास्त असणे हानिकारक असते. आताच हे प्रमाण ४१० पीपीएम एवढे झाले आहे. परिणामी, आताच आपण यावर सारासार विचार करत हवामानाचा अंदाज देताना प्रामुख्याने सर्व अंगाने विचार केला पाहिजे.- शिरीष मेढी । पर्यावरणशास्त्र अभ्यासक

टॅग्स :environmentवातावरण