शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

काळाच्या गरजेनुसार हवामानाचे पूर्वानुमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 5:15 AM

हवामान बदलाचे आव्हान मानवापुढील पर्यावरणीय आव्हानांपैकी सर्वात महत्त्वाचे आहे. या बदलत्या हवामानाचे दुष्परिणाम अन्न उत्पादन, नैसर्गिक परिसंस्था, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता

शुभांगी भुतेहवामान बदलाचे आव्हान मानवापुढील पर्यावरणीय आव्हानांपैकी सर्वात महत्त्वाचे आहे. या बदलत्या हवामानाचे दुष्परिणाम अन्न उत्पादन, नैसर्गिक परिसंस्था, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, तसेच आरोग्यावर होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या पाच वर्षांत नैसर्गिक आपत्तींची वाढलेली संख्या हे त्याचेच द्योतक आहे. जसे मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा भाग आणि संपूर्ण विदर्भाला उन्हाळ्यात तीव्र उष्ण लहरींचा सामना करावा लागत आहे. कोकणसुद्धा हवामान बदलाच्या तावडीतून सुटलेले नाही. अगदी अलीकडे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आपल्याला कोकणात म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि मुंबईला उष्ण लहरींचा इशारा द्यावा लागला होता, ही त्याची चुणूक आहे.पृथ्वीची हवामान प्रणाली अत्यंत गुंतागुंतीची आहे. त्यात वातावरण, हिम आणि नद्या, तसेच महासागर, इतर जलयंत्रणा अनेक सजीव यांची महत्त्वाची भूमिका असते. या संपूर्ण हवामान प्रणालीला ऊर्जा पुरविण्याचे कार्य सूर्य करत असतो. मात्र, सूर्याच्या सरळ येत असलेल्या किरणांपासून आपले संरक्षण करण्याचे काम पृथ्वीवरील वायूच्या पडद्यामुळे होत असते. मात्र, वाढत्या औद्योगिकरणासह शहरीकरणामुळे, पर्यावरणाच्या वाढत्या प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच हवामान बदल आव्हान मानवापुढील पर्यावरणीय आव्हानापैकी सर्वात महत्त्वाचे आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम अन्न उत्त्पादन, नैसर्गिक परिसंस्था, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, तसेच आरोग्य या संस्थावर दुष्परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या पाच वर्षांत नैसर्गिक आपत्तींची वारंवारता वाढली आहे. जसे मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा भाग आणि संपूर्ण विदर्भाला उन्हाळ्यात तीव्र उष्ण लहरींचा सामना करावा लागत आहे. तीव्र उष्ण लहरी केवळ २-३/४-५ दिवसांपर्यंत मर्यादित न राहता, आता ती प्रदीर्घ काळ १०-१५ दिवस अनुभवायला लागली आहे. हिवाळ्यात अती शीत लहरींची वारंवारता आणि कमाल तापमानात सरासरीपेक्षा जास्त वाढ, जेथे उष्ण लहरींसाठी चेतावणी द्यावी लागते. हाच हवामानातील बदल आहे. कोकणसुद्धा हवामान बदलाच्या तावडीतून संरक्षित आहे, असे नाही. अगदी अलीकडे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आपल्याला कोकणात अगदी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि मुंबईलासुद्धा उष्ण लहरींसाठी चेतावणी द्यावी लागली; कारण आपल्याला किमान तापमानात घट होणे अपेक्षित असते. पावसाळ्यातील तर पॅटर्न बदललाच आहे. सर्वसाधारण पावसाळ्याची सुरुवात दमदार पावसाने होऊन, दीर्घ काळ कोरड कालावधी दोन-तीन आठवड्यांचा असतो. त्यानंतर, आपण शेतीसाठी पेरणीची तयारी करतो; जुलैमध्येसुद्धा असेच फेरबदल दिसले आहेत. आॅगस्ट महिना जो कधी पावसासाठी गणला जातो, तेव्हाच मुसळधार किंवा अतिवृष्टी होते. हाच बदल आहे आणि आपण तो स्वीकारला आहे.आपण आता पिकांचे पॅटर्न बदलत आहोत आणि तेच नियोजित करत आहोत. या सगळ्यात बदलत्या हवामानाचे अंदाज देण्याची पद्धतसुद्धा बदललेली आहे. आता भारतीय हवामान विभागसुद्धा काळाच्या गरजेनुसार वेगवेगळ्या कालावधीसाठी पूर्वानुमान वर्तविते. जसे नाऊ कास्टिंग म्हणजे वर्तमान अंदाज (४-५ तासांसाठी). ज्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासाठी, वादळाची सूचना, अतिवृष्टीची सूचना, व्हॅलिडिटीसुद्धा सांगितली जाते. शहरासाठी पूर्वानुमान यामध्ये पुढील पाच दिवसांसाठी आणि दोन दिवसांचे अंदाज आणि शक्यता सांगितलेली असते. जिल्हानिहाय पूर्वानुमानामध्ये पुढील दिवसांसाठी उपविभागीय शक्यता सांगितली जाते. या सगळ्यामध्ये दीर्घकालीन ऋतू पूर्वानुमान आणि विस्तारित दीर्घकालीन पूर्वानुमान पावसाळा/मान्सून ऋतुसाठी अंत्यत महत्त्वाचे आहे. दीर्घकालीन पूर्वानुमान स्टेज वनमध्ये पावसाळ्याचे अंदाज असतात. ज्यामध्ये पावसाळा कसा राहील, सरासरी/सरासरीपेक्षा जास्त/खूप जास्त किंवा सरासरीपेक्षा कमी हे विस्तारितरीत्या नमूद केलेले असते. स्टेज दोनमध्ये मान्सून केरळमध्ये कधी दाखल होणार, याचा अंदाज असतो. तर स्टेज तीनमध्ये जून-सप्टेंबरदरम्यान पाऊस कसा असेल हे असते. विस्तारित पूर्वानुमान प्रत्येक गुरुवारी पुढील चार आठवड्याचे पावसाचे, तापमानाचे सरासरी चित्र असते. यामुळे कृषिसंबंधित नियोजनासाठी अत्यंत उपयोगी आहे. बदलत्या काळानुसार पूर्वानुमानसुद्धा आधुनिक तंत्रज्ञान वापरून पाठविले जातात. जसे एसएमएस, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, वेबसाइट आणि ई-मेलद्वारे नोंदणीकृत सदस्यांना पाठविले जातात. यामध्ये संपूर्ण रेल्वेचे मुख्य नोंदणीकृत अधिकारी, महाराष्ट्र शासनाचे अधिकारी, आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी, एनडीआरएफ, मच्छीमार, ऊर्जाक्षेत्र आणि आर्मी, नेव्हीलासुद्ध पाठविले जातात, तसेच प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाससुद्धा थंडरस्टॉर्म वॉर्निंग पाठविल्या जातात. हे सगळे अंदाज/पूर्वानुमान देताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. जसे विविध सॅटेलाइट प्रोडक्ट, डॉप्लर वेदर रडार प्रोडक्ट, सिनेर्जी प्रोडक्ट, जमिनीवरची निरीक्षणे, उच्च स्तरावरील निरीक्षणे याचा उपयोग केला जातो. या सगळ्यामध्ये न्युमिरिकल वेदर प्रेडिक्शन मॉड्यूल खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत असणारे अन्य हवामान वातावरणासंबंधी काम करत असलेल्या कार्यालयांच्या एकत्रित प्रयत्नाने पावसाचा अंदाज वर्तविण्यात यश येत आहे. काही वर्षांपूर्वी पूर्वानुमान, केवळ २४, ४८, ७२ तासांसाठी दिले जात होते. मात्र, आता काळाच्या गरजेनुसार विविध कालावधीसाठी दिले जाते.