शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

वट वट सावित्रीची कथा

By संदीप प्रधान | Published: July 06, 2018 2:35 AM

काँग्रेसचे सत्यवचनी युधिष्ठिर पृथ्वीराजबाबा यांनी पुण्याचे ऋषितुल्य उल्हासदादांना प्रश्न पुसला की, हाताला लकवा मारल्यानं असलेली सत्ता गमावून वनवास नशिबी आलेल्या काँग्रेससारखी कुणी पतिव्रता आहे का?

काँग्रेसचे सत्यवचनी युधिष्ठिर पृथ्वीराजबाबा यांनी पुण्याचे ऋषितुल्य उल्हासदादांना प्रश्न पुसला की, हाताला लकवा मारल्यानं असलेली सत्ता गमावून वनवास नशिबी आलेल्या काँग्रेससारखी कुणी पतिव्रता आहे का? त्यावर ऋषीवर उल्हासदादा आपल्या लालेलाल दाढीवरून हात फिरवत व दोन्ही हात हवेत झाडत टाळी देत हास्यचित्कार करीत बोलले की, शिवसेना नावाच्या वट वट सावित्रीने आपल्या पातिव्रत्याची अशीच घोर परीक्षा दिली आहे. तुंबई नामे नगरीवर उद्धवोठाकरी नामे राजा राज्य करीत होता. त्याची कन्या शिवसेना ही लहानपणी अत्यंत व्रात्य, उत्पाती, राडेबाज होती. अशा कन्येशी कुणी विवाह करणार नाही या विवंचनेतून उद्धवोठाकरी राजाने महत्प्रयासाने आपल्या कन्येची शांती केली. या धार्मिक विधीत त्याला अनिलकुमार देसाई, डॉ. नीलम गोºहेताई आदी दरबारी सहकाऱ्यांनी साथ दिली. शिवसेना विवाहयोग्य झाली तेव्हा उद्धवोठाकरी राजाने तिला तिचा वर निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. शिवसेना कधी बारामती नगरीचे राजे शरदबाबू भानामतीकर यांना डोळा घालायची तर कधी नागपूरकर देवेंद्रभाऊ फडणवीस यांचा गालगुच्चा घ्यायची. धर्मशास्त्रानुसार जो पिता विवाहयोग्य कन्येचे कन्यादान करीत नाही त्याला निंदनीय मानले गेले आहे. मात्र आपली कन्या वट वट सावित्री काय गुण उधळेल, या चिंतेनी धर्मशास्त्र धाब्यावर बसवून उद्धवोठाकरी राजाने तिला स्वातंत्र्य बहाल केले. मध्यंतरीच्या पंधरा वर्षांत शिवसेना वणवण फिरली. पण तिला वर काही मिळाला नाही. शिवसेनेची ही वणवण न पाहून खाद्यमहर्षी नितीनभाऊ गडबडकरी यांनी उद्धवोठाकरी राजाला ‘मातोश्री’ महाली फोन केले. मात्र खाद्यमहर्षींचे फोन उद्धवोठाकरी राजाचे अमात्य मिलिंद नार्वेकर राँगनंबरवाले यांनी घेतले व हॅलो हॅलो करून ठेवून दिले. अखेरीस बरीच डोळे मारामार केल्यावर या वट वट सावित्रीला वर लाभला. त्याला घेऊन ती तुंबई नगरीत आली तेव्हा उद्धवोठाकरी हे देवर्षी संजय राऊतमुनींसोबत बसले होते. मिशीला पिळ देत मुनीवर म्हणाले की, हा विवाह फार काळ टिकणार नाही. या वराच्या गळ्याला अल्पावधीत नख लागेल व कुणी लावले नाही तर मीच लावेन. शिवसेना विवाहाकरिता आता घायकुतीला आली होती. तिने आपल्या पित्याला कन्यादान करण्याची गळ घातली. विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. देशोदेशीचे राजे-महाराजे हजर राहिले. पंचपक्वान्नाच्या पंक्ती उठल्या. अत्तराचे कारंजे थुईथुई नाचले. शिवसेना आपल्या पतीला अल्पायुषी ठरवण्याकरिता रोजच त्याचा छळ करू लागली. रोजच घर सोडून पळून जाण्याचे इशारे देऊ लागली. वट वट सावित्रीचा हा व्याप असह्य होऊन एक दिवस तिचा पती जंगलात लाकडं फोडायला गेला. पतीच्या मागं हात धुवून लागलेली ही सावित्री मागं मागं गेली. पतीला ढगात पोहोचवण्याकरिता तिनं ‘नाणार व्रत’ केलं होतं. त्यामुळं जो भेटेल त्याला ती जाणार...जाणार... सांगत सुटली होती. ईव्हीएमवर स्वार यमराज समोर उभे राहताच सावित्रीचा पारा चढला. अरे, यमा तू याचे प्राण सोबत न्यायला आलायस की, याच्या कुडीत प्राण फुंकायला आलायस, अशी दमदाटी तिनं केली. भयभीत यमानं सावित्रीला वर मागण्यास सांगितले. तेव्हा ती बोलली की, पुढील सात निवडणुकीत पतीविना १५१ आमदारांनी माझी कूस उजू दे...(तिरकस)

टॅग्स :Politicsराजकारण