शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

विजयाचे ‘वरुड पॅटर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 1:02 AM

निवडणुकीत जी व्यक्ती विजय मिळवते तो विजय त्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाचा असला पाहिजे की निवडणूक जिंकण्याच्या तंत्राचा? अर्थातच कार्यकर्तृत्वाचा असला पाहिजे. पण, दुर्दैवाने आजच्या निवडणुका या निवडणूक जिंकण्याच्या तंत्रावर जिंकल्या जात आहेत. हे तंत्र ज्याला साधले तो सत्ताधीश. मग त्यात ती सत्ता सांभाळण्याची क्षमता आहे की नाही, याकडे बघायला कुणाकडेच वेळ नाही.

निवडणुकीत जी व्यक्ती विजय मिळवते तो विजय त्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाचा असला पाहिजे की निवडणूक जिंकण्याच्या तंत्राचा? अर्थातच कार्यकर्तृत्वाचा असला पाहिजे. पण, दुर्दैवाने आजच्या निवडणुका या निवडणूक जिंकण्याच्या तंत्रावर जिंकल्या जात आहेत. हे तंत्र ज्याला साधले तो सत्ताधीश. मग त्यात ती सत्ता सांभाळण्याची क्षमता आहे की नाही, याकडे बघायला कुणाकडेच वेळ नाही. म्हणूनच मेघालयात फक्त दोन आमदार असलेला पक्ष सत्तास्थापनेत महत्त्वाची भूमिका वठवतो आणि तब्बल २१ आमदार जिंकून जनाधार आपल्यासोबत आहे हे सिद्ध करणारा पक्ष विरोधी बाकावर बसतो. निवडणूक व त्यासाठी आवश्यक असलेले राजकारण मग ते दिल्लीच्या तख्ताचे असो वा गल्लीतल्या संस्थेचे. आजच्या निवडणुका अशाच जिंकण्याच्या तंत्रावर जिंकल्या जात आहेत. हे ‘तंत्र’ नव्याने आठवण्याचे कारण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती नियामक मंडळाची निवडणूक आहे. काल-परवाच या निवडणुकीचा निकाल लागला. नागपुरातून तीन जागांकरिता सात उमेदवार रिंगणात होते. यापैकी नागपूर शाखेचे नरेश गडेकर, शेखर बेंद्रे, प्रमोद भुसारी अपेक्षेनुसार विजयी झाले. यामध्ये रंगसेवक पॅनलचे अनिल चणाखेकर, सलीम शेख या अनुभवी रंगकर्मींना पराभवाचे तोंड बघावे लागले. दिलीप देवरणकर व दिलीप ठाणेकर यांना मिळालेली अनुक्रमे १११ व २८ मतेही फारच बोलकी आहेत. ही निवडणूकही तंत्राने जिंकण्यात आल्याची चर्चा आता रंगत आहे. या तंत्राचे गोड नामकरणही झाले आहे. ‘वरुड पॅटर्न’. हा ‘वरुड पॅटर्न’ नेमका काय आहे आणि तो या निवडणुकीत कसा चालला, याची कथाही नाटकाइतकीच रंजक आहे. वरुडच्या एका शाळेतील तब्बल ७९ जण नाट्य परिषदेचे मतदार आहेत. विशेष म्हणजे, या सगळ्यांचा पत्ताही सारखाच आहे. यातल्या ६६ जणांनी या निवडणुकीत मतदान केले. आजूबाजूच्या शहरात नाटकाची फारशी चर्चा नसताना वरुडसारख्या छोट्या गावातील एकाच शाळेत इतके मतदार असणे व त्यांनी या निवडणुकीत व्यापक सक्रियता दाखवणे, यात काहीच वावगे नाही. प्रश्न हा आहे की यातल्या किती जणांना नाटक नावाचा प्रकार माहिती आहे? जे उमेदवार मैदानात होते त्यांचे जवळपास १०० नातेवाईकही या निवडणुकीत मतदार होते. याचा अर्थ निवडणूक डोळ्यापुढे ठेवूनच मतदारांची संख्या पद्धतशीर वाढविण्यात आली आणि निवडणुकीत ती मते आपल्याकडे वळती करण्यात आली, असे म्हणण्याला पूर्ण वाव आहे. खंत एकाच गोष्टीची की या निवडणुकीत तंत्र जिंकले पण नाटक हरले. नाटक जिंकले असते तर नागपूर-विदर्भातील नवोदित रंगकर्मींचा आवाज ‘मध्यवर्ती’पर्यंत पोहोचवता आला असता. ‘वरुड पॅटर्न’ने हा आवाजच दडपून टाकला आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक