सर्मपणात जगा!
By Admin | Updated: June 30, 2014 08:55 IST2014-06-30T08:47:46+5:302014-06-30T08:55:01+5:30
रबराच्या निप्पलची जादू पाहा..तिने रडत असणारे बालक चुप होऊन जाते आणि संताच्या वाणीचा प्रभाव बघा-अभावाच्या प्रतिकूल जीवनातही माणूस आनंदी राहतो.

सर्मपणात जगा!
>अध्यात्म
श्री मुनी तरुणसागरजी
रबराच्या निप्पलची जादू पाहा..तिने रडत असणारे बालक चुप होऊन जाते आणि संताच्या वाणीचा प्रभाव बघा-अभावाच्या प्रतिकूल जीवनातही माणूस आनंदी राहतो.
लक्षात ठेवा सुख-दु:ख स्थायी नाहीत. स्थायी-चिरंतन तर आनंद आहे. जो साधनेने मिळत असतो. वासनेने नव्हे उपासनेने लाभतो.
***
परिवर्तन नित्य आहे. विश्वातील प्रत्येक वस्तू परिवर्तनशील आहे. सूर्य दिवसातून तीन रूप धारण करतो.
विना परिवर्तनाने जीवन ठप्प होऊन जाते. साचलेले पाणी सुकून जाते. तव्यावर चपाती जळून जाते, पान गळून पडते.
समाज पांगळा होऊन जातो. राष्ट्र भ्रष्टाचारात बुडून जाते. आणि संत साधनेपासून भ्रष्ट होऊन गृहस्थासारखा होऊन जातो.
ह्यास्तव चालत राहा, वाहात राहा, थांबू नका, साचू नका. थोडा विश्राम, पुन्हा सावधान.
हेच सत्य होय. विश्राम सावधान.
***
दु:ख कोणाच्या जीवनात येत नाही? गरीब असो वा श्रीमंत, संत असो वा संसारी, छोटा असो वा मोठा, सर्वांच्या जीवनात दु:ख येतच असते.
जीवनात सर्वांना दु:खाचा सामना करावा लागतो. फरक इतकाच की कोणी दु:खाला निपटून टाकतो, तर दु:ख कोणाला निपटून टाकते.
आपण माझे म्हणणे ऐकाल तर माझे निवेदन असेल : दु:खात रडू नका, सुखात झोपू नका.
अर्थ इतकाच दु:खात घाबरू, नका सुखात शेफारून जाऊ नका.
***
दोन बैल आहेत. दोघांपुढे चारा टाकला जातो. त्यातील एक बैल असा असतो, जो आपल्या समोर टाकलेला चारा खात नाही, तर दुसर्या बैला समोरचा चारा खाऊ लागतो. स्वत: समोरच्या चार्यावर पाय ठेवतो आणि दुसर्या बैलास शिंगाने मारू लागतो.
काही माणसे अशीही असतात जे इतरांच्या संपत्तीवर डोळा ठेवतात आणि संपत्ती हडप करू इच्छितात.
माझे म्हणणे असे : तुम्ही मनुष्य आहात गुरे-ढोरे नव्हे, आपला चारा खा, दुसर्याचा दुसर्याला खाऊ द्या.
***
जगायचे तर जागावे लागेल. केवळ अंथरुणातून उठणे म्हणजे जागणे नव्हे. जगण्याचे तात्पर्य : जागृतीचे सजगतेचे जीवन होय. आंतर्दृष्टी.. विवेकाचे नेत्र उघडणे होय.
क्रोध, पाप, अपराध आणि नशा-धुंदी बेशुद्धीची परिणती होय. जग म्हणते माणूस दारू पिऊन बेहोश होतो. परंतु, भगवान महावीर एक नवीन मुद्दा मांडतात. ते म्हणतात, दारू पिऊन माणूस बेहोश होत नाही, तर बेहोश माणूसच दारू पितो.