शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आजचा अग्रलेख: भारतीय क्रिकेटमधील कोहलीचे वाढलेले ‘वजन’ अन् ‘विराट ओझ्या’ची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 06:51 IST

पुढे विराट कोहली हा भारतीय क्रिकेट संघाचा सर्वच प्रकारातला निर्विवाद ‘कप्तान’ बनत गेला.

‘मैं पल दो पल का शायर हूँ.. पल दो पल मेरी कहानी हैं!’ असं म्हणत धोनीनं समाजमाध्यमात एक दिवस अचानक आपण निवृत्त होत असल्याची घोषणा केली. अर्थात ती निवृत्ती अनपेक्षित नव्हतीच, विश्वचषकानंतर बराच कालावधी उलटून गेल्यावर त्यानं  निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. पुढे  झारखंडमध्ये सेंद्रिय शेती करत असल्याची त्याची छायाचित्रं झळकू लागली. क्रिकेटजगापासून लांब असल्यासारखा, तो  ‘शांत’ होता. आता मात्र अचानक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - खुद्द जय शहांनीच घोषणा केली की, धोनी आता ‘मेण्टॉर’ म्हणून टी-ट्वेण्टी संघासोबत असेल; येत्या टी-ट्वेण्टी विश्वचषकात त्याच्या अनुभवाचा संघाला फायदा होईल! ‘तो’ परत येतोय म्हटल्यावर त्याच्या चाहत्यांना अर्थातच आनंद झाला, एकेकाळी पाकिस्तानला हरवत त्यानं जिंकलेल्या पहिल्या टी-ट्वेण्टी विश्वचषकाच्या आठवणी ताज्या झाल्या. 

पण हे अजिबात विसरता कामा नये की, तेव्हा तो खेळाडू होता, कप्तान होता. मैदानात उतरून खेळत होता. प्रशिक्षक-मार्गदर्शक आजच्या भाषेत  ‘मेण्टॉर’  कितीही अनुभवी असला तरी तो असतो मैदानाबाहेरच. मैदानात उतरतात ते खेळाडू, मेण्टॉर नव्हे. जिंकण्या-हरण्याची परीक्षाही त्यांचीच असते. आणि मुख्य प्रश्न असतो तो मेण्टॉर, प्रशिक्षक आणि कप्तान, संघातले खेळाडू यांचं नातं नेमकं कसं आहे? धोनी कप्तान असताना विराट कोहलीची ‘ॲण्टी धोनी’ प्रतिमा कधीही लपून राहिली नाही. पुढे विराट कोहली हा भारतीय क्रिकेट संघाचा सर्वच प्रकारातला निर्विवाद  ‘कप्तान’ बनत गेला. कप्तानासमोर क्रिकेट मंडळ झुकू लागलं, मला प्रशिक्षक म्हणून अमुकच हवा, तमुक नको इतपत कप्तानाचं मत मान्य करण्यापर्यंत विराट कोहलीचं ‘वजन’ वाढलं. तो जितकी वर्षे क्रिकेट खेळतो आहे, त्याच्या निम्मी वर्षे तो कप्तान आहे.   

कोहलीच्या कप्तानीच्या सुरुवातीच्या काळात कुंबळे प्रशिक्षक होता, कोहली-कुंबळे या जोडीचं कसोटी सामने जिंकण्याचं सातत्य आणि आकडेवारी उत्तम आहे. त्याचकाळात भारतीय संघ कसोटीत क्रमांक एकवर पोहोचला. पण कोहली - कुंबळेतल्या बेबनावापायी कुंबळेला प्रशिक्षकपद सोडावं लागलं. रवी शास्त्री आणि कोहली ही जोडी उत्तम जमली. त्यानंतर चित्र असं की, कोहली म्हणेल तीच पूर्व! गेल्या काही काळात विशेषत: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी कोहली पितृत्त्व रजेसाठी भारतात परतला, अजिंक्य राहणेच्या नेतृत्वात संघ जिंकला. तिथून कोहलीच्या नेतृत्वाविषयी आणि त्याच्या प्रचंड सत्तेविषयी उघड विरोधी चर्चा सुरू झाली. भारतीय क्रिकेटमध्ये ‘ऑल इज वेल’ आहे असं चित्र रंगवण्याचा पूर्ण प्रयत्न बीसीसीआयने केला, मात्र ते तसे नाही हे स्पष्ट दिसत होते. 

कोहली आणि राेहित शर्मा यांच्यातली परस्पर स्पर्धा, शर्माची कप्तानीची इच्छा, त्याचं आयपीएलमध्ये कप्तान म्हणून उत्तम यश, आयपीएलमधलंच कोहलीचं अपयश, आटलेला धावांचा ओघ, कप्तानीतल्या उणिवा ते रोहित शर्माचं अलीकडे इंग्लंड दौऱ्यात उत्तम प्रदर्शन इथपर्यंतचा प्रवास पाहिला तरी कोहलीला आव्हान म्हणून रोहित शर्मा उभा राहिला असं दिसतं. अर्थात हे वरकरणी चित्र, संघांतर्गत स्पर्धेतलं. तिकडे जय शहा आणि सौरव गांगुली या बीसीसीआयच्या शीर्षनेतृत्वाला कोहली आणि शास्त्री या जोडीचे भारतीय क्रिकेटवरचं वर्चस्वही खुपायला लागलं की काय, अशीही दबकी चर्चा सुरू. 

शास्त्री प्रशिक्षकपदावरून पायउतार होणार हे चित्र जसंजसं स्पष्ट होऊ लागलं तशी समीकरणं बदलू लागली. श्रीलंका दौऱ्यावर राहुल द्रविड प्रशिक्षक म्हणून रवाना झाला. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले जात असताना द्रविडची निवड प्रशिक्षक म्हणून व्हावी अशाही बातम्या फुटल्या. इकडे निवड समिती आणि कोहली यांच्यात खटके उडू लागल्याचीही कुजबुज सुरूच होती. चहूबाजूनं सत्तासंघर्ष सुरू झाला. कोहलीची कप्तानीच धोक्यात येईल असं चित्र आकार घेऊ लागलं; पण काेहलीनं एक पाऊल पुढे टाकत, स्वत:च समाजमाध्यमात जाहीर करून टाकले की ‘वर्कलोड‘ पाहता मी विश्वचषकानंतर टी-ट्वेण्टीची कप्तानी सोडतो आहे. म्हणजे ‘तोवर तरी मीच कप्तान आहे आणि एकदिवसीय आणि कसोटी कप्तानीही माझ्याचकडे आहे’, हे त्यानंच जाहीर करून टाकलं. 

तिकडे बीसीसीआयने आपल्या निवेदनात ‘कोहली भारतीय संघात वरिष्ठ खेळाडू म्हणून खेळेल’ अशी शब्दरचना करत ‘पर्याय खुले’ असल्याचे बिटविन द लाइन्स सांगून टाकलं. एकीकडे कोहलीचं लक्ष्य २०२३ चा मायदेशातच खेळवला जाणारा एकदिवसीय विश्वचषक आहे हे उघड आहे, दुसरीकडे संघांतर्गत स्पर्धा, बीसीसीआयचं नेतृत्व, निवड समिती, नवीन प्रशिक्षक या साऱ्यांना कप्तान म्हणून कोण हवा, हा प्रश्न. टी-ट्वेण्टी विश्वचषकच बहुदा ठरवेल, नेमकी कोणाची ‘हस्ती पल दो पल की’?

टॅग्स :Team Indiaभारतीय क्रिकेट संघVirat Kohliविराट कोहलीBCCIबीसीसीआय