शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
2
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
3
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
4
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
5
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
6
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
7
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
8
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
9
अमेठी, रायबरेलीत काँग्रेसच्या हाताला सपाच्या सायकलची साथ, अखिलेश यादव यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश 
10
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
11
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
12
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
13
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
14
UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी
15
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
16
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
18
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
19
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?
20
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?

‘विराट’ सातत्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 4:28 AM

गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ बनलेल्या विराट कोहलीने आपल्या कमालीच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर दबदबा राखला आहे. क्रि केट कोणत्याही प्रकारचे असो, त्यात कोहलीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडणार ही प्रत्येकालाच खात्री असते.

गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ बनलेल्या विराट कोहलीने आपल्या कमालीच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर दबदबा राखला आहे. क्रि केट कोणत्याही प्रकारचे असो, त्यात कोहलीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडणार ही प्रत्येकालाच खात्री असते. सातत्य म्हणजे काय आणि ते कशाप्रकारे अमलात आणावे याचा धडाच कोहलीने सर्व खेळाडूंना दिला आहे. २०१६ पूर्वी कोहलीच्या खात्यामध्ये एकही कसोटी द्विशतकाची नोंद नव्हती. परंतु, त्यानंतर त्याने सलग चार मालिकांमध्ये प्रत्येकी एक कसोटी द्विशतक ठोकण्याचा प्रयत्न केला. तसेच, नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात आणखी एक द्विशतक झळकावले. सध्या कोहलीचा सुरू असलेला धडाका पाहता त्याला थांबवणे कोणालाच शक्य होणार नाही, असेच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे त्याचे खेळाप्रति असलेले प्रेम आणि जिद्द वाखाणण्यासारखी आहे. त्यामुळेच की काय व्यस्त कार्यक्रमामुळे होत असलेल्या थकव्यानंतरही त्याच्या बॅटमधील धावांचा पाऊस काही थांबत नाही. काही दिवसांपूर्वीच कोहलीने सततच्या क्रिकेट वेळापत्रकामुळे शरीरावर अतिरिक्त ताण पडत असल्याचे कारण देत ‘मी रोबोट नाही’ असे सांगत विश्रांती मिळण्याची मागणी केली. कोहलीच्या मागणीमध्ये काहीच चुकीचे नव्हते. पण एकूणच त्याची सध्याची कामगिरी पाहता कोहली खरंच थकलेला आहे का, असा दुसरा प्रश्नही पडतो. कोहलीने राखलेली तंदुरुस्ती जबरदस्त आहे. त्यामुळेच त्याच्या खेळीपेक्षा तंदुरुस्ती कशी राखली गेली पाहिजे, हे जरी इतर खेळाडूंनी त्याच्याकडून शिकले तरी खूप झाले. विक्रमांमागून विक्र म रचताना कोहलीने स्वत:चे स्थान दिग्गजांच्या पंक्तीमध्ये सहजपणे नेले. अर्थात यामागे कोहलीच्या अफाट मेहनतीला विसरता कामा नये. तंदुरुस्तीचा विचार करताना, कोहलीने विश्रांती मिळण्याबाबत केलेले वक्तव्य गंभीरपणे घेण्याची आवश्यकता आहे. आज, इतर खेळाडूंच्या तुलनेत भारतीय क्रि केटपटू वर्षभर सातत्याने खेळत असतात. दखल घेण्याची बाब म्हणजे क्रिकेट कोणत्याही प्रकारचे असो, त्यात प्रमुख खेळाडू कोहलीच असतो. त्यामुळेच आगामी विदेशी दौºयांकडे पाहता कोहलीला विश्रांती मिळणे हे भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण, कितीही गुणवत्ता ठासून भरलेली असली, तरी शेवटी कोहली हादेखील माणूसच आहे. त्यालाही दुखापती होतात. शिवाय कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये इतर खेळाडूंची कामगिरी कशी होते हेही बीसीसीआयला पाहता येईल. कारण, पुढील विश्वचषकासाठी तयारी करताना आपल्याला सर्वच बाजूंनी विचार करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीCricketक्रिकेटIndian Cricket Teamभारतीय क्रिकेट संघ