शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

विराटने आगे आकर खेलना था यार!

By यदू जोशी | Published: May 29, 2018 6:57 AM

राजकारणीअन् एसटी बसमध्ये काहीही फरक नाही. राज्यातील शेवटच्या माणसाला घेऊन चालते ती एसटीच पण बंदच्या काळात फुटते; तीही एसटीच.

राजकारणीअन् एसटी बसमध्ये काहीही फरक नाही. राज्यातील शेवटच्या माणसाला घेऊन चालते ती एसटीच पण बंदच्या काळात फुटते; तीही एसटीच. सरपंचांपासून पंतप्रधानांपर्यंत सर्वच राजकीय नेत्यांची परिस्थिती तीच. अंथरुणातून उठत नाही तर जी गाºहाणी सुरू होतात ती पुन्हा अंथरुणात जाईपर्यंत... (नेत्यांच्या बायका त्यांना काय म्हणत असतील कोण जाणे!) आडव्याउभ्याने फाडायची वेळ आली की लोकांना परत राजकारणीच दिसतात. नेतेही बिच्चारे पुढच्या पंचवार्षिकसाठी काय काय बोल सहन करत असतात. मोदींनी एक निर्णय घेतला रे घेतला की त्याचे विरोध-समर्थन करणारे सोशल मीडियातून फिरू लागतात. आपल्या देशात सल्ल्यांची वर्षातील ३६५ दिवस दुकाने थाटून बसणाऱ्यांची कमतरता नाही. सचिन असो की विराट कुणी आऊट झाले की यांचं दुकान लगेच सुरू, ‘अरे यार! उसने सामने आकर खेलना चाहीए था.’ आता ताशी दीडशे किलोमीटरच्या स्पीडने बॉल कानफटापासून जाताना तुम्ही स्वत: खेळून बघितलाय का कधी? पण नाही सल्ला देण्याचं त्यांचं पेटेंट आहे नं भौ! घरासमोरची फरशी लावण्यापासून देश विकासाच्या बड्या योजनांपर्यंत सगळं काही नेत्यांनीच कसं करावं यासाठीचा सल्लारूपी माल त्यांच्याकडे तयार असतो. घरचा महिन्याकाठचा हिशेब नीट सांभाळता येणार नाही पण मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कामगिरीचा हिशेब विचारायला चटकन तयार. बायकोनं चार वस्तू बाजारातून आणायला सांगितल्या तर त्यातलीही एक विसरतील पण तीन वर्षांपूर्वी कोडाइकॅनलमध्ये परकीय गुंतवणुकीसंदर्भातील एका सेमिनारमध्ये बोलताना मोदींनी दिलेल्या आश्वासनाची आठवण मात्र बरोब्बर ठेवतील. नियमानुसार असलेल्या वर्षभरातील एकूणएक सुट्या घेतील पण वर्षभरात एकही दिवस सुटी न घेणाºया मोदींना प्रत्येक गोष्टीसाठी जाब विचारतील. घरातील निवडणुकीत बायकोचंही मत मिळणार नाही, असे लोक कर्नाटकात कुणाचं काय चुकलं हे सांगत सुटतील. देशाची काँग्रेस सांभाळणाºया राहुल गांधींची हालत तर फारच खराब... निवडणुकीत साºया गावात ज्याला सगळ्यात कमी मतं पडली असा माणूसही राहुलबाबांची चेष्टा करू शकतो अन् काँग्रेस कशी चालवायची हेही फुशारकीनं सांगतो. गांधी-आंबेडकर-सावरकर यांच्याबाबत मुक्तचिंतन करणाºयांनी त्यांचे साहित्य वा जीवनप्रवास किती अभ्यासलंय हे विचारण्याची सोय नसते. हातची कामं सोडून सल्ले वाटणं सुरू असतं.कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक प्रचारात शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांना ‘बच्चा’ म्हणत त्यांची खेचली होती. त्याला सडेतोड उत्तर देत मुख्यमंत्री जे काही म्हणाले ते जागोजागी तयार झालेल्या सल्लागारांनी लक्षात घेतलं तर महाराष्ट्रातील ऐंशी टक्के सामाजिक, राजकीय प्रश्न सुटू शकतील. मुख्यमंत्री म्हणाले होते, रामदासभाई! तुमचा पगार किती अन् तुम्ही बोलता किती...? आता मुख्यमंत्री-रामदासभार्इंचा वाद सोडा पण आपल्या पगाराइतकंच (म्हणजे आपल्या लायकीइतकं) बोलण्याचं पथ्य सगळ्यांनी पाळलं तर पुरोगामी महाराष्ट्राचं भलंच होईल पण वास्तविकता ही आहे की जो उठला तो आपल्या पगारापेक्षा जास्तच बोलत सुटतो. पगार (कुवत) चपराश्याचा अन् बोलणं आयएएसचं ही खरी अडचण आहे. सल्ल्याचं बोट धरून मोकाट फिरणाºयांनी समजूतदारपणाचं बोट धरलं तर किती बरं होईल?- यदु जोशी