शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
11
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
12
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
13
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
14
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
15
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
16
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
17
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
18
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
19
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
20
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला

नाशिकचे राजकीय नाट्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 08:15 IST

काँग्रेसने नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात पक्षाचा एबी फॉर्म दिल्यानंतरही विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज न भरता त्यांचे पुत्र, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना पुढे चाल दिली.

विधान परिषद निवडणूक व राजकीय नाट्य हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे जणू समीकरणच बनू पाहत आहे. गेल्या जूनमध्ये राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीच्या वेळीच शिवसेना फुटली. एकएक करून आमदार सुरतमार्गे गुवाहाटीला पोहोचले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद सोडले. महाविकास आघाडीचे सरकार पडले. आता राज्यात दोन पदवीधर व तीन शिक्षक अशा विधान परिषदेच्या पाच जागांच्या रणधुमाळीची सुरुवात अर्ज भरण्याच्या राजकीय नाट्याने झाली. काँग्रेसनेनाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात पक्षाचा एबी फॉर्म दिल्यानंतरही विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज न भरता त्यांचे पुत्र, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना पुढे चाल दिली.

भारत जोडो यात्रेच्या आधारे पुनरुज्जीवनाची स्वप्ने पाहणारी काँग्रेस तांबे पिता-पुत्रांच्या डावपेचांबद्दल पूर्णपणे गाफील राहिली. या डावपेचांना मोठ्या राजकीय घराण्याचे वलय आहे. काँग्रेस विधिमंडळ गटनेते, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे डॉ. सुधीर तांबे हे मेहुणे, तर सत्यजित हे भाचे. या दोन्ही घराण्यांना दिवंगत स्वातंत्र्यसेनानी, सहकारितेचे अध्वर्यू भाऊसाहेब थोरात यांचा वारसा आहे. योगायोगाने गुरुवारीच भाऊसाहेब थाेरात यांची जयंती होती. आणखी योगायोग म्हणजे बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे यांनी त्यांच्या पहिल्या निवडणुका अपक्ष म्हणूनच जिंकल्या होत्या. सत्यजित यांच्या बंडाळीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फूस होती किंवा राजकीय नाट्याची संहिताच फडणवीसांनी लिहिल्याचे मानले जाते.

गेल्या महिन्यात गॅविन न्यूसम लिखित ‘सिटिझनविल’ या नागरी प्रश्नांवरील पुस्तकाच्या सत्यजित यांनी केलेल्या मराठी अनुवादाचे प्रकाशन फडणवीस व थोरात यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी ‘या कर्तबगार तरुणाला लवकर संधी द्या, अन्यथा आमचा त्यांच्यावर डोळा आहेच’, असे विधान फडणवीस यांनी केले होते. त्याचा संबंध सत्यजित यांच्या बंडाशी जोडला जात आहे. खरे-खोटे फडणवीस, तांबे व थाेरातच जाणोत. सत्यजित तांबे तरुण आहेत. युवक काँग्रेसचे नेतृत्व करताना महाराष्ट्रभर फिरून त्यांनी नेटवर्क उभे केले आहे. त्यांनी राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगण्यात काही चूक नाही. वडीलधारी मंडळी सत्तरीतही पदाला चिकटून राहणार असतील तर तरुणांनी किती वाट बघायची, असेही त्यांना वाटत असावे. कदाचित कुटुंबातील फूट टाळण्यासाठी तांबे पिता-पुत्रांनी हा निर्णय घेतला असेल. फक्त जे केले ते पक्षाला विश्वासात घेऊन केले असते तर नाचक्की झाली नसती. शिवाय, बाळासाहेब थोरात यांच्यासारखे मुरब्बी नेते भाच्याच्या योजनांबद्दल अनभिज्ञ असतील असे मानणे भाबडेपणाचे ठरते.

नागपूर विधिमंडळ अधिवेशनकाळात मॉर्निंग वॉकवेळी पाय घसरल्याने बाळासाहेब जखमी झाले. ते मुंबईत उपचार घेत असताना इकडे संगमनेरमध्ये राजकीय नाट्याची रंगीत तालीम सुरू होती, असे म्हणता येईल. गमतीने असेही म्हणता येईल, की चुलत्या-पुतण्यांच्या राजकीय खेळी, डावपेच महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर बहरत असताना त्याला मामा-भाचे नात्याची किनार लाभली आहे. फडणवीसांनी अशी खेळी खरेच केली असेल तर विखे, मोेहिते, महाडिक अशा काँग्रेस, राष्ट्रवादीच्या घराण्यांमधील नवी पिढी भारतीय जनता पक्षाच्या वळचणीखाली उभे राहिल्याचा प्रवाह प्रवरेकाठच्या संगमनेरपर्यंत विस्तारला आहे. खरे पाहता विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधरांसाठी राखीव जागांबद्दल राजकीय पक्ष नको तितके महत्त्वाकांक्षी आहेत. या जागा शिक्षक किंवा पदवीधरांच्या हक्काच्या. त्यांच्या संघटनांच्या तंबूत राजकीय पक्षांचे उंट शिरले व त्यांनी तंबू ताब्यात घेतले.

विविध प्रश्नांवर सतत आंदोलने करणाऱ्या संघटनांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी राजकीय पक्षांनी या जागाही शह-काटशहाचे मैदान बनवले. मुळात पक्षांकडे या जागांवर प्रबळ उमेदवार नाहीत. भाजपने कोकण व मराठवाड्यात उमेदवार आयात केले. नाशिकमध्ये उमेदवार नसल्याने सत्यजितना पाठिंबा देण्याचा विचार सुरू आहे. नागपुरात सक्षम उमेदवार नसल्याने विद्यमान आमदार नागो गाणार यांनाच समर्थन द्यावे लागले. शिवसेनेकडे पाचपैकी एकही मतदारसंघ नसल्याने उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटांना संधीची शक्यता नव्हती. तरीदेखील महाविकास आघाडीत नागपूरची जागा ठाकरे गटाने पदरात पाडून घेतली. औरंगाबादेत राष्ट्रवादीचे विक्रम काळे, अमरावतीत भाजपचे डॉ. रणजित पाटील व कोकणात बाळाराम पाटील असे सगळेच विद्यमान आमदार रिंगणात असले तरी राज्याचे लक्ष मात्र नाशिककडे असेल.

टॅग्स :Satyajit Tambeसत्यजित तांबेBJPभाजपाcongressकाँग्रेसNashikनाशिकPoliticsराजकारण