शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
5
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
6
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
7
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
8
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
9
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
10
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
11
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
12
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
13
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
14
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
15
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
16
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
17
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
18
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
19
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा भाजपा-सेनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 06:04 IST

भाजपा व सेनेचे उमेदवार एकमेकांविरोधात लढले की मतदारांचे तिसऱ्याकडे लक्षच जात नाही.

नागपूर संघभूमी. भाजपासाठी खरी कर्मभूमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे शहर असल्यामुळे येथे होणाऱ्या भाजपाच्या जय-पराजयाची चर्चा राज्यासह देशभरात ठरलेलीच. त्यामुळेच नागपुरात गल्लीपासून दिल्लीपर्यंतची कोणतीही निवडणूक असो भाजपा नेते ती तेवढ्याच सिरियसली घेतात. त्यामुळेच निवडणूक लहान असली तरी पालकमंत्र्यांपासून ते आमदार, जिल्हा परिषद सदस्यांपर्यंत सारेच तुटून पडतात. पक्ष संघटनाही एखाद्या मिशनवर असल्यासारखी राबताना दिसते. तर ताकदीने कमी असलेली शिवसेनाही निवडणुकीत आपली शक्ती पणाला लावून लढते. भाजपा व सेनेचे उमेदवार एकमेकांविरोधात लढले की मतदारांचे तिसऱ्याकडे लक्षच जात नाही. असेच काहीसे चित्र नुकत्याच झालेल्या वानाडोंगरी व पारशिवनी नगर पंचायत निवडणुकीच्या निकालात पहायला मिळाले. वानाडोंगरीमध्ये कमळ फुलले तर पारशिवनीमध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण उंचावला. गेल्या दीड वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधकांनी शेतकºयांच्या प्रश्नासह विविध प्रश्नांचा आगडोंब माजवत भाजपाविरोधात रोष तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही वानाडोंगरीच्या निवडणुकीत भाजपाचा एकतर्फी विजय झाला. राष्ट्रवादीला जनाधार दिसत असतानाही निकाल पूर्णपणे विरोधात गेला. खरे तर भाजपा-सेनेला रोखून धरत आगामी निवडणुकीत आम्हीच बाजी मारू, असा संदेश देण्याची चांगली संधी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे होती. मात्र, पक्षापेक्षा गटाला अधिक महत्त्व देण्याच्या काँग्रेस नेत्यांच्या मानसिकतेचा फटका पक्षाला बसला. वानाडोंगरीत काँग्रेसशी आघाडी झाली खरी परंतु काही नेत्यांनी त्यात बिघाडी करण्याचेच काम जास्त केले. पारशिवनीत तर आघाडीचे प्रयत्नच अपयशी ठरले. काँग्रेसने रणनीती आखली खरी मात्र नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेपोटी अनेकांनी तिकीट न मिळण्याच्या भीतीने आधीच बंडखोरी केली. भाजपाने काँग्रेसमधील तोडीचे उमेदवार उचलले व कमळावर लढविले. याचा नेमका फायदा भाजपाला झाला. शिवसेना बºयापैकी जिवंत असलेल्या रामटेक विधानसभेअंतर्गत येणाºया या नगर पंचायतीमध्ये शिवसेनेने भाजपाच्या कडव्या आव्हानाला सामोरे जात बाजी मारली. नेहमीप्रमाणे पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडून काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मोकळे झाले. मात्र, निवडणुकीत पक्षाच्याच उमेदवारांना मागे खेचण्यासाठी काय काय खेळ खेळल्या गेले यावर नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची खरी गरज आहे. लोकसभा आणि विधानसभेचे घोडामैदान जवळ आहे. फडणवीस, गडकरींच्या नागपुरात भाजपाची फौज कंबर कसून तयार आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वेळीच हेवेदावे बाजूला सारून गटापेक्षा पक्ष मजबूत करण्याकडे लक्ष दिले नाही तर सर्वांवरच घरी बसण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक