शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा भाजपा-सेनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 06:04 IST

भाजपा व सेनेचे उमेदवार एकमेकांविरोधात लढले की मतदारांचे तिसऱ्याकडे लक्षच जात नाही.

नागपूर संघभूमी. भाजपासाठी खरी कर्मभूमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे शहर असल्यामुळे येथे होणाऱ्या भाजपाच्या जय-पराजयाची चर्चा राज्यासह देशभरात ठरलेलीच. त्यामुळेच नागपुरात गल्लीपासून दिल्लीपर्यंतची कोणतीही निवडणूक असो भाजपा नेते ती तेवढ्याच सिरियसली घेतात. त्यामुळेच निवडणूक लहान असली तरी पालकमंत्र्यांपासून ते आमदार, जिल्हा परिषद सदस्यांपर्यंत सारेच तुटून पडतात. पक्ष संघटनाही एखाद्या मिशनवर असल्यासारखी राबताना दिसते. तर ताकदीने कमी असलेली शिवसेनाही निवडणुकीत आपली शक्ती पणाला लावून लढते. भाजपा व सेनेचे उमेदवार एकमेकांविरोधात लढले की मतदारांचे तिसऱ्याकडे लक्षच जात नाही. असेच काहीसे चित्र नुकत्याच झालेल्या वानाडोंगरी व पारशिवनी नगर पंचायत निवडणुकीच्या निकालात पहायला मिळाले. वानाडोंगरीमध्ये कमळ फुलले तर पारशिवनीमध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण उंचावला. गेल्या दीड वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधकांनी शेतकºयांच्या प्रश्नासह विविध प्रश्नांचा आगडोंब माजवत भाजपाविरोधात रोष तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही वानाडोंगरीच्या निवडणुकीत भाजपाचा एकतर्फी विजय झाला. राष्ट्रवादीला जनाधार दिसत असतानाही निकाल पूर्णपणे विरोधात गेला. खरे तर भाजपा-सेनेला रोखून धरत आगामी निवडणुकीत आम्हीच बाजी मारू, असा संदेश देण्याची चांगली संधी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे होती. मात्र, पक्षापेक्षा गटाला अधिक महत्त्व देण्याच्या काँग्रेस नेत्यांच्या मानसिकतेचा फटका पक्षाला बसला. वानाडोंगरीत काँग्रेसशी आघाडी झाली खरी परंतु काही नेत्यांनी त्यात बिघाडी करण्याचेच काम जास्त केले. पारशिवनीत तर आघाडीचे प्रयत्नच अपयशी ठरले. काँग्रेसने रणनीती आखली खरी मात्र नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेपोटी अनेकांनी तिकीट न मिळण्याच्या भीतीने आधीच बंडखोरी केली. भाजपाने काँग्रेसमधील तोडीचे उमेदवार उचलले व कमळावर लढविले. याचा नेमका फायदा भाजपाला झाला. शिवसेना बºयापैकी जिवंत असलेल्या रामटेक विधानसभेअंतर्गत येणाºया या नगर पंचायतीमध्ये शिवसेनेने भाजपाच्या कडव्या आव्हानाला सामोरे जात बाजी मारली. नेहमीप्रमाणे पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडून काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मोकळे झाले. मात्र, निवडणुकीत पक्षाच्याच उमेदवारांना मागे खेचण्यासाठी काय काय खेळ खेळल्या गेले यावर नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची खरी गरज आहे. लोकसभा आणि विधानसभेचे घोडामैदान जवळ आहे. फडणवीस, गडकरींच्या नागपुरात भाजपाची फौज कंबर कसून तयार आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वेळीच हेवेदावे बाजूला सारून गटापेक्षा पक्ष मजबूत करण्याकडे लक्ष दिले नाही तर सर्वांवरच घरी बसण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक