शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

पुन्हा भाजपा-सेनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 06:04 IST

भाजपा व सेनेचे उमेदवार एकमेकांविरोधात लढले की मतदारांचे तिसऱ्याकडे लक्षच जात नाही.

नागपूर संघभूमी. भाजपासाठी खरी कर्मभूमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे शहर असल्यामुळे येथे होणाऱ्या भाजपाच्या जय-पराजयाची चर्चा राज्यासह देशभरात ठरलेलीच. त्यामुळेच नागपुरात गल्लीपासून दिल्लीपर्यंतची कोणतीही निवडणूक असो भाजपा नेते ती तेवढ्याच सिरियसली घेतात. त्यामुळेच निवडणूक लहान असली तरी पालकमंत्र्यांपासून ते आमदार, जिल्हा परिषद सदस्यांपर्यंत सारेच तुटून पडतात. पक्ष संघटनाही एखाद्या मिशनवर असल्यासारखी राबताना दिसते. तर ताकदीने कमी असलेली शिवसेनाही निवडणुकीत आपली शक्ती पणाला लावून लढते. भाजपा व सेनेचे उमेदवार एकमेकांविरोधात लढले की मतदारांचे तिसऱ्याकडे लक्षच जात नाही. असेच काहीसे चित्र नुकत्याच झालेल्या वानाडोंगरी व पारशिवनी नगर पंचायत निवडणुकीच्या निकालात पहायला मिळाले. वानाडोंगरीमध्ये कमळ फुलले तर पारशिवनीमध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण उंचावला. गेल्या दीड वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधकांनी शेतकºयांच्या प्रश्नासह विविध प्रश्नांचा आगडोंब माजवत भाजपाविरोधात रोष तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही वानाडोंगरीच्या निवडणुकीत भाजपाचा एकतर्फी विजय झाला. राष्ट्रवादीला जनाधार दिसत असतानाही निकाल पूर्णपणे विरोधात गेला. खरे तर भाजपा-सेनेला रोखून धरत आगामी निवडणुकीत आम्हीच बाजी मारू, असा संदेश देण्याची चांगली संधी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे होती. मात्र, पक्षापेक्षा गटाला अधिक महत्त्व देण्याच्या काँग्रेस नेत्यांच्या मानसिकतेचा फटका पक्षाला बसला. वानाडोंगरीत काँग्रेसशी आघाडी झाली खरी परंतु काही नेत्यांनी त्यात बिघाडी करण्याचेच काम जास्त केले. पारशिवनीत तर आघाडीचे प्रयत्नच अपयशी ठरले. काँग्रेसने रणनीती आखली खरी मात्र नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेपोटी अनेकांनी तिकीट न मिळण्याच्या भीतीने आधीच बंडखोरी केली. भाजपाने काँग्रेसमधील तोडीचे उमेदवार उचलले व कमळावर लढविले. याचा नेमका फायदा भाजपाला झाला. शिवसेना बºयापैकी जिवंत असलेल्या रामटेक विधानसभेअंतर्गत येणाºया या नगर पंचायतीमध्ये शिवसेनेने भाजपाच्या कडव्या आव्हानाला सामोरे जात बाजी मारली. नेहमीप्रमाणे पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडून काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मोकळे झाले. मात्र, निवडणुकीत पक्षाच्याच उमेदवारांना मागे खेचण्यासाठी काय काय खेळ खेळल्या गेले यावर नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची खरी गरज आहे. लोकसभा आणि विधानसभेचे घोडामैदान जवळ आहे. फडणवीस, गडकरींच्या नागपुरात भाजपाची फौज कंबर कसून तयार आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वेळीच हेवेदावे बाजूला सारून गटापेक्षा पक्ष मजबूत करण्याकडे लक्ष दिले नाही तर सर्वांवरच घरी बसण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक