शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
2
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
3
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
4
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
5
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
6
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
7
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
8
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
9
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
11
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
12
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
13
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
14
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
15
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
16
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
17
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
18
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
19
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
20
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!

बहुत जाहले संशोधक त्यावर गुरूंची करामत

By सुधीर महाजन | Updated: January 9, 2020 09:05 IST

पीएच. डी. च्या गोरखधंद्याला कुलगुरूंची वेसण

- सुधीर महाजन

विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा आणि प्रतिष्ठा तेथे होणारे संशोधन आणि प्रसिद्ध होणारे प्रबंध यावर ठरतो. पीएच.डी. होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या त्या विद्यापीठाची गुणवत्ता दर्शविते, असा तुमचा समज असेल, तर तो गैरसमज ठरतो. कारण या पदवीचाही गोरखधंदा जोरात आहे आणि याच पीएच.डी. प्रकरणावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक संघटनेत प्रचंड असंतोष निर्माण झाला. नव्यानेच आलेले कुलगूरू डॉ. प्रमोद येवले यांनी या पदवीची गुणवत्ता वाढविण्यासाठी पीएच.डी. संशोधक मार्गदर्शकांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने निश्चित केलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आणि हेच प्राध्यापकांमधील अस्वस्थेचे कारण ठरले आणि त्यामुळेच कुलगुरू आणि संघटना यांच्यात संघर्ष उडण्याची चिन्हे आहेत. 

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम असणाऱ्या महाविद्यालयातील संशोधन केंद्रात दोन पूर्ण वेळ प्राध्यापक, तसेच अद्ययावत ग्रंथालय, संदर्भाच्या सुविधा, प्रयोगशाळा आवश्यक आहेत. आता हा नियम मराठवाड्यात लागू करायचा, तर अनेकांची ‘गाईडशिप’ रद्द होते. त्यातूनच ही अस्वस्थता निर्माण झाली. कारण असे निकष पूर्ण करण्याऱ्या महाविद्यालयांची आणि संशेधक मार्गदर्शक प्राध्यापकांची संख्या अगदी बोटांवर मोजण्याइतकी आहे.

पीएच.डी.च्या बाबतीत या विद्यापीठातील वास्तवावर प्रकाश टाकला, तर अनागोंदीच्या कारभार दिसतो. पीएच.डी प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा असते, जी की विद्यापीठाने वर्षातून दोन वेळा घ्यायला हवी; परंतु गेल्या चार वर्षांपासून अशी परीक्षाच झालेली नाही. २०१६ साली जाहिरात देऊन परीक्षा घेतली; पण तिचा निकाल अजून लागायचा आहे आणि ती प्रक्रियाच पूर्ण झालेली नाही. शेजारच्याच नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठात ही पूर्ण प्रक्रिया दीड महिन्यात मार्गी लावली जाते; पण या विद्यापीठाने चार वर्षांतही ती पूर्ण न करण्याचा विक्रम केला. हा गोंधळ येथेच संपत नाही, तर विद्यापीठात नेमके किती संशोधक मार्गदर्शक प्राध्यापक आहेत, किती विद्यार्थी संशोधन करीत आहेत याची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही.

एक मार्गदर्शक प्राध्यापक जास्तीत जास्त आठ विद्यार्थ्यांना मार्गदर्शक असू शकतो; पण एकाच वेळी पंचवीस विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा विक्रम करणारे प्राध्यापक येथे आहेत. एका प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत ७० विद्यार्थ्यांनी पीएच.डी. मिळविण्यासारख्या सुरस कथा आहेत. उदंड झाले संशोधक, अशी अवस्था असल्याने पीएच.डी. पदवी जी खिरापतीसारखी वाटल्याने तिचे महत्त्वच कमी झाले. याशिवाय संशोधनाचा दर्जाही सुमार झाला. ‘कोणीही यावे आणि टपली मारून जावे’ याप्रमाणे पीएच.डी. कोणीही मिळवतो. त्यातून असे पीएच.डी. करवून देणाऱ्यांची टोळीच कार्यरत असून, जी ‘सुपारी’ घेऊन तुम्हाला पदवी मिळवून देते. अगदी शेवटी परीक्षकही मॅनेज करते. म्हणजे पीएच.डी.चे मॅनेजमेंट असे नवेच अर्थशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र या विद्यापीठात जन्माला आले. 

नव्यानेच आलेल्या कुलगुरूंनी नेमकी ही दुखती नस आवळली आली आणि गटातटांत विभागले गेलेले प्राध्यापक ‘समान ध्येयाने’ एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली. पूर्वी विद्यापीठाने नियमावली तयार केली होती; परंतु प्राध्यापक संघटनांनी दबाव आणून त्यात बदल करून घेतला. इकडे कुलगुरू नियमांच्या अंमलबजावणीवर ठाम आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थी