शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

बहुत जाहले संशोधक त्यावर गुरूंची करामत

By सुधीर महाजन | Updated: January 9, 2020 09:05 IST

पीएच. डी. च्या गोरखधंद्याला कुलगुरूंची वेसण

- सुधीर महाजन

विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा आणि प्रतिष्ठा तेथे होणारे संशोधन आणि प्रसिद्ध होणारे प्रबंध यावर ठरतो. पीएच.डी. होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या त्या विद्यापीठाची गुणवत्ता दर्शविते, असा तुमचा समज असेल, तर तो गैरसमज ठरतो. कारण या पदवीचाही गोरखधंदा जोरात आहे आणि याच पीएच.डी. प्रकरणावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक संघटनेत प्रचंड असंतोष निर्माण झाला. नव्यानेच आलेले कुलगूरू डॉ. प्रमोद येवले यांनी या पदवीची गुणवत्ता वाढविण्यासाठी पीएच.डी. संशोधक मार्गदर्शकांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने निश्चित केलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आणि हेच प्राध्यापकांमधील अस्वस्थेचे कारण ठरले आणि त्यामुळेच कुलगुरू आणि संघटना यांच्यात संघर्ष उडण्याची चिन्हे आहेत. 

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम असणाऱ्या महाविद्यालयातील संशोधन केंद्रात दोन पूर्ण वेळ प्राध्यापक, तसेच अद्ययावत ग्रंथालय, संदर्भाच्या सुविधा, प्रयोगशाळा आवश्यक आहेत. आता हा नियम मराठवाड्यात लागू करायचा, तर अनेकांची ‘गाईडशिप’ रद्द होते. त्यातूनच ही अस्वस्थता निर्माण झाली. कारण असे निकष पूर्ण करण्याऱ्या महाविद्यालयांची आणि संशेधक मार्गदर्शक प्राध्यापकांची संख्या अगदी बोटांवर मोजण्याइतकी आहे.

पीएच.डी.च्या बाबतीत या विद्यापीठातील वास्तवावर प्रकाश टाकला, तर अनागोंदीच्या कारभार दिसतो. पीएच.डी प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा असते, जी की विद्यापीठाने वर्षातून दोन वेळा घ्यायला हवी; परंतु गेल्या चार वर्षांपासून अशी परीक्षाच झालेली नाही. २०१६ साली जाहिरात देऊन परीक्षा घेतली; पण तिचा निकाल अजून लागायचा आहे आणि ती प्रक्रियाच पूर्ण झालेली नाही. शेजारच्याच नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठात ही पूर्ण प्रक्रिया दीड महिन्यात मार्गी लावली जाते; पण या विद्यापीठाने चार वर्षांतही ती पूर्ण न करण्याचा विक्रम केला. हा गोंधळ येथेच संपत नाही, तर विद्यापीठात नेमके किती संशोधक मार्गदर्शक प्राध्यापक आहेत, किती विद्यार्थी संशोधन करीत आहेत याची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही.

एक मार्गदर्शक प्राध्यापक जास्तीत जास्त आठ विद्यार्थ्यांना मार्गदर्शक असू शकतो; पण एकाच वेळी पंचवीस विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा विक्रम करणारे प्राध्यापक येथे आहेत. एका प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत ७० विद्यार्थ्यांनी पीएच.डी. मिळविण्यासारख्या सुरस कथा आहेत. उदंड झाले संशोधक, अशी अवस्था असल्याने पीएच.डी. पदवी जी खिरापतीसारखी वाटल्याने तिचे महत्त्वच कमी झाले. याशिवाय संशोधनाचा दर्जाही सुमार झाला. ‘कोणीही यावे आणि टपली मारून जावे’ याप्रमाणे पीएच.डी. कोणीही मिळवतो. त्यातून असे पीएच.डी. करवून देणाऱ्यांची टोळीच कार्यरत असून, जी ‘सुपारी’ घेऊन तुम्हाला पदवी मिळवून देते. अगदी शेवटी परीक्षकही मॅनेज करते. म्हणजे पीएच.डी.चे मॅनेजमेंट असे नवेच अर्थशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र या विद्यापीठात जन्माला आले. 

नव्यानेच आलेल्या कुलगुरूंनी नेमकी ही दुखती नस आवळली आली आणि गटातटांत विभागले गेलेले प्राध्यापक ‘समान ध्येयाने’ एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली. पूर्वी विद्यापीठाने नियमावली तयार केली होती; परंतु प्राध्यापक संघटनांनी दबाव आणून त्यात बदल करून घेतला. इकडे कुलगुरू नियमांच्या अंमलबजावणीवर ठाम आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थी