शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

वाकडी ते राईनपाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 12:11 PM

- मिलिंद कुलकर्णीभौतिक प्रगती साधत असताना, विज्ञान-तंत्रज्ञानाचा साधन म्हणून लिलया वापर करणारा माणूस दिवसेंदिवस असहिष्णू व संवेदनाशून्य होत चालल्याची भयावह उदाहरणे महाराष्टÑात विशेषत: ग्रामीण भागात दिसू लागली आहेत. एकसंघ आणि निकोप समाजाच्यादृष्टीने ही भयसूचक घंटा आहे. या घटनांनी संपूर्ण माणुसकीला काळीमा फासला जात आहे. वाकडीतील घटनेत अंघोळीने विहिर बाटवली म्हणून ...

- मिलिंद कुलकर्णीभौतिक प्रगती साधत असताना, विज्ञान-तंत्रज्ञानाचा साधन म्हणून लिलया वापर करणारा माणूस दिवसेंदिवस असहिष्णू व संवेदनाशून्य होत चालल्याची भयावह उदाहरणे महाराष्टÑात विशेषत: ग्रामीण भागात दिसू लागली आहेत. एकसंघ आणि निकोप समाजाच्यादृष्टीने ही भयसूचक घंटा आहे. या घटनांनी संपूर्ण माणुसकीला काळीमा फासला जात आहे. वाकडीतील घटनेत अंघोळीने विहिर बाटवली म्हणून दोन कुमारवयीन मुलांची नग्न धिंड काढून बेदम मारहाण करण्यात आली. त्याची चित्रफित बनवून स्वत:ची मर्दुमकी गाजविण्यासाठी समाजमाध्यमांवर प्रसारीत करण्यात आली. धुळे जिल्ह्यातील राईनपाडा या गावात आठवडे बाजारात भविष्य सांगणाऱ्या मंगळवेढा (जि.सोलापूर) येथील पाच जणांना मुलांना पळवून नेणाºया टोळीचे सदस्य समजून ३ ते ५ हजार लोकांच्या जमावाने ठेचून मारण्याचे राक्षसी कृत्य केले. मुले पळवून नेण्याची अफवा सध्या खान्देशसह संपूर्ण देशभर पसरली आहे. समाजमाध्यमांमुळे या अफवेचा अधिक वेगाने प्रसार होत आहे. मास हिस्टेरिया असे त्याला म्हटले जाते. कोणतीही खातरजमा न करता, विवेक, भान न वापरता समूहाची मानसिकता प्रभावी ठरुन अशी राक्षसी कृत्ये घडू लागली तर हाहाकार माजेल. विशेष म्हणजे, या घटना ग्रामीण भागात सर्वाधिक घडत आहे. पाचोरा, म्हसावद, घोटाणे, भादली बुद्रूक, सुभाष वाडी अशा गावांमध्ये केवळ गैरसमजापोटी हे प्रकार घडले आहेत. दोन दिवसांपूर्वी ‘समाजमाध्यम दिन’ साजरा करण्यात आला. या संपर्काच्यादृष्टीने प्रभावी असलेल्या माध्यमाचे उपयोग, चांगल्या बाजूंवर साधकबाधक चर्चा झाली. परंतु अफवा पसरविण्यात, चुकीच्या गोष्टी प्रसारीत करण्यासाठी या माध्यमांचा दुरुपयोग होत असेल तर ही चिंताजनक गोष्ट आहे. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये एकविसाव्या शतकात अंधश्रध्देचा मोठा पगडा आहे. भुताटकी, डाकीण असे प्रकार सर्रास घडतात. ज्योतिषावर गाढ विश्वास असतो. त्यातूनच मुले पळविणारी टोळी, किडन्या काढून विकणारी टोळी अशी अफवा पसरली तर भोळ्याभाबड्या आदिवासी बांधवांचा त्यावर पटकन विश्वास बसतो. समूह मानसिकतेच्या प्रभावात मग असे राक्षसी क्रौर्य घडून येते. माणूस माणसाचा जीव घेण्यापर्यंत बेभान होऊ शकतो हे खरोखर भयंकर कृत्य आहे. स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतर खेडोपाडी शिक्षण, आरोग्य, दळणवळण, वीज, पाणी पोहोचविण्यात यश मिळाले. भौतिक सुविधा दिल्या गेल्या. परंतु ‘आम्ही सारे भारतीय आहोत’ ही भावना पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेत अडकून राहिली. आमच्या मन आणि हृदयात ती पोहोचली नाही. शहाणपण, समंजसपणा आला नाही. प्रबोधनाच्या निव्वळ गप्पा झाल्या; पण माणसे अद्यापही जातपात, अंधश्रध्दा, प्रांतभेद या जोखडात अडकून पडली आहेत. मानसिकदृष्टया सक्षमीकरणाची नितांत गरज अशा घटनांमधून आवर्जून दिसून येते.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाJalgaonजळगाव