शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

सैन्यदलाचा असा वापर दुर्दैवी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 3:51 AM

सैन्यदलाशी संबंधित विषय फार संवेदनशीलतेने हाताळावे लागतात. मुंबईतील तीन रेल्वे पूल बांधण्यासाठी सैन्यदलाला बोलावून आम्ही त्यांचा वापर कधी, कसा करायचा यातील गांभीर्य घालवून बसलो आहोत.

सैन्यदलाशी संबंधित विषय फार संवेदनशीलतेने हाताळावे लागतात. मुंबईतील तीन रेल्वे पूल बांधण्यासाठी सैन्यदलाला बोलावून आम्ही त्यांचा वापर कधी, कसा करायचा यातील गांभीर्य घालवून बसलो आहोत. प्रश्न पूल कोणी बांधायचा हा नसून सैन्याचा वापर कुठे आणि कधी करावा हा आहे. हा विषय यामुळे ऐरणीवर आला आहे.मुंबईत एलफिस्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांचे बळी गेल्यानंतर तो पूल सैन्यदलाकडून बांधून घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. अवघ्या तीन महिन्यांत पूल तयार करण्याचे आश्वासन रक्षामंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले. पूल कोण बांधतो याहीपेक्षा जनतेला तीन महिन्यांत तो तयार करून मिळणार आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र या निर्णयामुळे चुकीचा पायंडा पडला आहे.हा पूल धोकादायक बनला आहे, तो तातडीने नवीन बांधला पाहिजे अशी मागणी अनेक वर्षे या पुलावरून जाणारे प्रवासी करत होते. एका प्रवाशाने तर तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना अनेकदा टष्ट्वीटही केल्याचे समोर आले. त्याचदिवशी प्रभू यांनी या पुलाच्या कामाला कितीतरी आधीच मंजुरी दिल्याचे स्पष्ट केले होते. त्यावेळी रेल्वे प्रशासन सुस्त झाल्याचे समोर आले. पुलाच्या दुरुस्तीसाठी तातडीने पावले उचलावीत असे तीन वर्षे अधिकाºयांना वाटले नाही. मात्र ज्या दिवशी २३ जणांचे जीव गेले त्याच दिवशी त्या पुलाची निविदा काढल्याचे सांगितले गेले. हे अक्षम्य दुर्लक्ष करणाºया रेल्वेच्या अधिकाºयावर कोणतीही कठोर कारवाई केली गेली नाही. उलट हा पूल सैन्यदलाकडून बांधून घेताना भाजपाने या विषयाचे राजकारण केले.सप्टेंबर महिन्यात पूल पडला. त्याचे काम जर एक महिन्याने सैन्याकडे देण्याचा निर्णय होत असेल तर त्याच एक महिन्यात अन्य यंत्रणांकडूनही हा पूल बांधता आला असता. पण तसे झाले नाही. रेल्वे दुर्घटनेनंतर बुलेट ट्रेनविषयी जनतेत निर्माण झालेला टोकाचा राग, असंतोष कसा घालवायचा याच्या चिंतनातून मिलिटरी कल्पना पुढे आणली गेली. आम्ही काहीतरी वेगळे करतो आहोत हे दाखविण्याचा अतिउत्साही प्रयत्न यातून झाला आहे.आपल्याकडे ‘मिलिटरीला बोलावले’ असे म्हटले की काहीतरी गंभीर घडले असे बोलले जाते. नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी सैन्यदलाला बोलावण्याची पद्धती आहे. लातूरच्या भूकंपात, गुजरातच्या पुरात सैन्यदल बोलावले गेले. येथे कोणतीही नैसर्गिक आपत्ती नव्हती. तर अधिकाºयांचे अक्षम्य दुर्लक्ष या घटनेला कारण होते. ज्या दिवशी हा पूल पडला होता त्याच्या दुसºयाच दिवशीच सैन्यदलाला बोलावून जर या पुलाचे काम सुरू केले असते तर सरकार या विषयावर खरोखरीच गंभीर आहे असे वाटले असते. पण तसे झाले नाही. महिन्यानंतर विचारपूर्वक केलेली ही राजकीय खेळी आहे.विरोध पूल बांधण्याला नाही, मात्र जर असे मिलिटरीला पूल बांधण्यासाठी बोलावले गेले तर उद्या छोट्या मोठ्या घटनांमध्येही सैन्यदलाला बोलावण्याची मागणी होऊ लागेल. ती नाही पुरवली तर त्यातून राजकीय आरोप प्रत्यारोप होतील. सैन्यदलाकडे कोणते विषय न्यायचे याचे तारतम्यही राखले गेले पाहिजे. आपल्याकडे अनेक अवघड बांधकामे कमी वेळेत करणाºया यंत्रणा असताना एक रेल्वेचा पूल आम्ही बांधू शकत नाही हे मान्य केल्यासारखे आहे. जो संदेश यातून गेला तो जास्त निराशाजनक आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई