शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

स्वयम् शिक्षणाचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:26 IST

स्वयम् शिक्षण प्रयोग संस्थेच्या माध्यमातून महिला केवळ स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या नाहीत, तर त्यांनी बेरोजगार महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. गावातील जमीन महिलांच्या नावावर करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम स्तुत्य आहे.

-विजय बाविस्कर

महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणाच्या चर्चा आपण नेहमीच ऐकत असतो; परंतु त्याला कृतीची जोड देत समाजासमोर आदर्श ठेवणाऱ्या फार मोजक्याच संस्था सभोवताली आहेत. स्वयम् शिक्षण प्रयोग १९९३पासून महाराष्ट्रातील ग्रामीण विभागात महिला सक्षमीकरण व ग्रामविकासासाठी कार्य करते. ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने धडपडणारी अग्रणी संस्था म्हणून संस्थेची जागतिक स्तरावर ओळख आहे. महिलांना बचत गटाच्या माध्यमातून संघटित करून बचत, कर्ज व परतफेडीची सवय संस्थेने लावली. महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम व ओडिशा या राज्यांमध्ये १,४५,००० महिला शेतकरी व व्यावसायिकांचे जाळे तयार करून ५ लाख लोकांपर्यंत पोहोचली आहे.१९९३च्या लातूरच्या भूकंप पुनर्वसनासाठी सल्लागाराची भूमिका पार पाडताना प्रकल्पाचा अपेक्षित वेग गाठण्यासाठी आणि महिला सक्षमीकरण व सहभाग कसा महत्त्वाचा आहे, हे पटवून देत महिलांना संवाद सहायक बनवून घरांची रचना करताना कुटुंबाच्या सुविधांचाही विचार करून बांधण्यात आली. पुढे गुजरातचा भूकंप २००१, तमिळनाडूची त्सुनामी २००४, बिहारचा पूर २००७मध्ये सदर महिलांनी आपल्या आपत्तीतून शिकलेले अनुभव इतरांना मदत करीत सर्वांना विकासाकडे नेण्याचा प्रयत्न केला.पंचायत राज, सखी बचत गट ते सखी महासंघ, पाणी व स्वच्छता, स्वच्छ ऊर्जा, शेती व अन्नसुरक्षा, वित्तीय साक्षरता, व्यवसाय-जागृती ते विकास अशा विविध उपक्रमांमध्ये महिलांचे नेतृत्व व सहभाग वाढविण्यासाठी संस्था सदैव कार्यरत आहे.स्वयम् शिक्षण प्रयोगमार्फत महिला व्यावसायिकांना आर्थिक मदत, बाजारपेठ व कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी सखी समुदाय कोश, सखी युनिक रुरल एंटरप्राईज, सखी सोशल एंटरप्राईज नेटवर्क या संस्थांची निर्मिती करण्यात आली.२०१४ पासून संस्थेमार्फत शाश्वत शेती हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. कुटुंबातून महिलांना त्यांच्या निर्णयानुसार शेती करण्यासाठी किमान १ एकर शेतीमध्ये घरी लागणाºया खाद्यपदार्थांची लागवड करून ते नैसर्गिक पद्धतीने पिकवून घरीच वापरले जातात. जेणेकरून महिलांचे सक्षमीकरण, अन्नसुरक्षा तसेच पर्यावरणाचे रक्षण या तिन्ही बाबी साध्य होतात. आजपर्यंत ४१,००० महिला शेतकºयांसोबत संस्था कार्य करीत आहे. पुढील काळात १ लाख महिला शेतकरी आणि १ लाख व्यावसायिकांसोबत काम करण्याचे उद्दिष्ट २०२३ पर्यंत ठेवण्यात आले आहे.जागतिक तसेच देश पातळीवर विविध पुरस्कारांनी संस्थेला सन्मानित करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने यूएनडीपी एक्वेटर प्राईझ (२०१७) आणि यूएनएफसीसीसीचा मोमेंटम फॉर चेंज पर्यावरण पर्याय पुरस्कार (२०१६) यांचा विशेष उल्लेख करता येईल.शासन, आंतरराष्ट्रीय देणगीदार संस्था व मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या सीएसआर निधीतून संस्थेला आर्थिक पाठबळ मिळते.संस्थेने केलेल्या कामामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. या संस्थेच्या कामामुळे शेतकरी कुटुंबातील महिलांना अर्थार्जनाची संधी निर्माण झाली आहे. संस्थेचे यश तळागाळातील महिलांची क्षमता आणि त्यांचा सहभाग यामुळेच शक्य झाले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र