शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

स्वयम् शिक्षणाचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:26 IST

स्वयम् शिक्षण प्रयोग संस्थेच्या माध्यमातून महिला केवळ स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या नाहीत, तर त्यांनी बेरोजगार महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. गावातील जमीन महिलांच्या नावावर करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम स्तुत्य आहे.

-विजय बाविस्कर

महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणाच्या चर्चा आपण नेहमीच ऐकत असतो; परंतु त्याला कृतीची जोड देत समाजासमोर आदर्श ठेवणाऱ्या फार मोजक्याच संस्था सभोवताली आहेत. स्वयम् शिक्षण प्रयोग १९९३पासून महाराष्ट्रातील ग्रामीण विभागात महिला सक्षमीकरण व ग्रामविकासासाठी कार्य करते. ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने धडपडणारी अग्रणी संस्था म्हणून संस्थेची जागतिक स्तरावर ओळख आहे. महिलांना बचत गटाच्या माध्यमातून संघटित करून बचत, कर्ज व परतफेडीची सवय संस्थेने लावली. महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम व ओडिशा या राज्यांमध्ये १,४५,००० महिला शेतकरी व व्यावसायिकांचे जाळे तयार करून ५ लाख लोकांपर्यंत पोहोचली आहे.१९९३च्या लातूरच्या भूकंप पुनर्वसनासाठी सल्लागाराची भूमिका पार पाडताना प्रकल्पाचा अपेक्षित वेग गाठण्यासाठी आणि महिला सक्षमीकरण व सहभाग कसा महत्त्वाचा आहे, हे पटवून देत महिलांना संवाद सहायक बनवून घरांची रचना करताना कुटुंबाच्या सुविधांचाही विचार करून बांधण्यात आली. पुढे गुजरातचा भूकंप २००१, तमिळनाडूची त्सुनामी २००४, बिहारचा पूर २००७मध्ये सदर महिलांनी आपल्या आपत्तीतून शिकलेले अनुभव इतरांना मदत करीत सर्वांना विकासाकडे नेण्याचा प्रयत्न केला.पंचायत राज, सखी बचत गट ते सखी महासंघ, पाणी व स्वच्छता, स्वच्छ ऊर्जा, शेती व अन्नसुरक्षा, वित्तीय साक्षरता, व्यवसाय-जागृती ते विकास अशा विविध उपक्रमांमध्ये महिलांचे नेतृत्व व सहभाग वाढविण्यासाठी संस्था सदैव कार्यरत आहे.स्वयम् शिक्षण प्रयोगमार्फत महिला व्यावसायिकांना आर्थिक मदत, बाजारपेठ व कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी सखी समुदाय कोश, सखी युनिक रुरल एंटरप्राईज, सखी सोशल एंटरप्राईज नेटवर्क या संस्थांची निर्मिती करण्यात आली.२०१४ पासून संस्थेमार्फत शाश्वत शेती हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. कुटुंबातून महिलांना त्यांच्या निर्णयानुसार शेती करण्यासाठी किमान १ एकर शेतीमध्ये घरी लागणाºया खाद्यपदार्थांची लागवड करून ते नैसर्गिक पद्धतीने पिकवून घरीच वापरले जातात. जेणेकरून महिलांचे सक्षमीकरण, अन्नसुरक्षा तसेच पर्यावरणाचे रक्षण या तिन्ही बाबी साध्य होतात. आजपर्यंत ४१,००० महिला शेतकºयांसोबत संस्था कार्य करीत आहे. पुढील काळात १ लाख महिला शेतकरी आणि १ लाख व्यावसायिकांसोबत काम करण्याचे उद्दिष्ट २०२३ पर्यंत ठेवण्यात आले आहे.जागतिक तसेच देश पातळीवर विविध पुरस्कारांनी संस्थेला सन्मानित करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने यूएनडीपी एक्वेटर प्राईझ (२०१७) आणि यूएनएफसीसीसीचा मोमेंटम फॉर चेंज पर्यावरण पर्याय पुरस्कार (२०१६) यांचा विशेष उल्लेख करता येईल.शासन, आंतरराष्ट्रीय देणगीदार संस्था व मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या सीएसआर निधीतून संस्थेला आर्थिक पाठबळ मिळते.संस्थेने केलेल्या कामामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. या संस्थेच्या कामामुळे शेतकरी कुटुंबातील महिलांना अर्थार्जनाची संधी निर्माण झाली आहे. संस्थेचे यश तळागाळातील महिलांची क्षमता आणि त्यांचा सहभाग यामुळेच शक्य झाले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र