शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

स्वयम् शिक्षणाचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:26 IST

स्वयम् शिक्षण प्रयोग संस्थेच्या माध्यमातून महिला केवळ स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या नाहीत, तर त्यांनी बेरोजगार महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. गावातील जमीन महिलांच्या नावावर करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम स्तुत्य आहे.

-विजय बाविस्कर

महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणाच्या चर्चा आपण नेहमीच ऐकत असतो; परंतु त्याला कृतीची जोड देत समाजासमोर आदर्श ठेवणाऱ्या फार मोजक्याच संस्था सभोवताली आहेत. स्वयम् शिक्षण प्रयोग १९९३पासून महाराष्ट्रातील ग्रामीण विभागात महिला सक्षमीकरण व ग्रामविकासासाठी कार्य करते. ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने धडपडणारी अग्रणी संस्था म्हणून संस्थेची जागतिक स्तरावर ओळख आहे. महिलांना बचत गटाच्या माध्यमातून संघटित करून बचत, कर्ज व परतफेडीची सवय संस्थेने लावली. महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम व ओडिशा या राज्यांमध्ये १,४५,००० महिला शेतकरी व व्यावसायिकांचे जाळे तयार करून ५ लाख लोकांपर्यंत पोहोचली आहे.१९९३च्या लातूरच्या भूकंप पुनर्वसनासाठी सल्लागाराची भूमिका पार पाडताना प्रकल्पाचा अपेक्षित वेग गाठण्यासाठी आणि महिला सक्षमीकरण व सहभाग कसा महत्त्वाचा आहे, हे पटवून देत महिलांना संवाद सहायक बनवून घरांची रचना करताना कुटुंबाच्या सुविधांचाही विचार करून बांधण्यात आली. पुढे गुजरातचा भूकंप २००१, तमिळनाडूची त्सुनामी २००४, बिहारचा पूर २००७मध्ये सदर महिलांनी आपल्या आपत्तीतून शिकलेले अनुभव इतरांना मदत करीत सर्वांना विकासाकडे नेण्याचा प्रयत्न केला.पंचायत राज, सखी बचत गट ते सखी महासंघ, पाणी व स्वच्छता, स्वच्छ ऊर्जा, शेती व अन्नसुरक्षा, वित्तीय साक्षरता, व्यवसाय-जागृती ते विकास अशा विविध उपक्रमांमध्ये महिलांचे नेतृत्व व सहभाग वाढविण्यासाठी संस्था सदैव कार्यरत आहे.स्वयम् शिक्षण प्रयोगमार्फत महिला व्यावसायिकांना आर्थिक मदत, बाजारपेठ व कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी सखी समुदाय कोश, सखी युनिक रुरल एंटरप्राईज, सखी सोशल एंटरप्राईज नेटवर्क या संस्थांची निर्मिती करण्यात आली.२०१४ पासून संस्थेमार्फत शाश्वत शेती हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. कुटुंबातून महिलांना त्यांच्या निर्णयानुसार शेती करण्यासाठी किमान १ एकर शेतीमध्ये घरी लागणाºया खाद्यपदार्थांची लागवड करून ते नैसर्गिक पद्धतीने पिकवून घरीच वापरले जातात. जेणेकरून महिलांचे सक्षमीकरण, अन्नसुरक्षा तसेच पर्यावरणाचे रक्षण या तिन्ही बाबी साध्य होतात. आजपर्यंत ४१,००० महिला शेतकºयांसोबत संस्था कार्य करीत आहे. पुढील काळात १ लाख महिला शेतकरी आणि १ लाख व्यावसायिकांसोबत काम करण्याचे उद्दिष्ट २०२३ पर्यंत ठेवण्यात आले आहे.जागतिक तसेच देश पातळीवर विविध पुरस्कारांनी संस्थेला सन्मानित करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने यूएनडीपी एक्वेटर प्राईझ (२०१७) आणि यूएनएफसीसीसीचा मोमेंटम फॉर चेंज पर्यावरण पर्याय पुरस्कार (२०१६) यांचा विशेष उल्लेख करता येईल.शासन, आंतरराष्ट्रीय देणगीदार संस्था व मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या सीएसआर निधीतून संस्थेला आर्थिक पाठबळ मिळते.संस्थेने केलेल्या कामामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. या संस्थेच्या कामामुळे शेतकरी कुटुंबातील महिलांना अर्थार्जनाची संधी निर्माण झाली आहे. संस्थेचे यश तळागाळातील महिलांची क्षमता आणि त्यांचा सहभाग यामुळेच शक्य झाले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र