शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

अस्वस्थ, ‘लॉकडाऊन’ जोडप्यांचा ‘एक दुजे के लिये’ आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 6:13 AM

सोशल मीडियाच्या काळात व्यक्त होण्यासाठी कैक साधनं तंत्रज्ञानानं आपल्या हातात दिलेली असतानाही ‘केवळ आपलं प्रेम कुटुंबाला रुचेल का?’ या भयग्रस्त जाणिवेपोटी दोन युगुलांनी स्वत:चा जीव गमावला, हे वास्तव विषण्ण करणारं खरंच!

- सचिन जवळकोटे। निवासी संपादक, लोकमत, सोलापूरनाव तिचं प्रतीक्षा. दहावीत शिकणारी. तारुण्याची फुलं अजून उमलायची होती; मात्र गेल्या आठवड्यात तिचा मृतदेह गावालगतच्या शिवारात लिंबाच्या झाडाला लटकलेला आढळलेला. याच झाडावर आणखी एका तरुणाचा मृतदेह लोंबकळत होता. त्याचंही शिक्षण केवळ बारावीपर्यंत झालेलं. गावात खालची मान वर न करणारी ही कोवळी पोरं थेट मान लटकवत गेली. मोहोळ तालुक्यातील नरखेडच्या या घटनेनं सोलापूर जिल्हा हळहळला. तिसऱ्या दिवशी याच तालुक्यातील सोहाळे गावात आणखी दोन मृतदेह आढळले. कहाणी तशीच. गावाबाहेरच्या वस्तीतील एका पत्राशेडमध्ये एकाच दोरीनं एका युगुलानं गळफास घेतला. ती विशीतली, तो पंचविशीतला. आता मात्र पश्चिम महाराष्टÑ हादरला. नवी पिढी कळवळली. जुनी पिढी भूतकाळात गढून गेली. त्यांना पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वीचा ‘एक दुजे के लिये’ चित्रपट आठवला. ‘आपण एकत्र जगू शकत नाही, तर मग एकत्र मरू तरी शकतो,’ हा त्यातला क्लायमॅक्स अनेक प्रेमींचं आयुष्य उद्ध्वस्त करून केला. कैक युगुलांनी त्यावेळी आत्महत्या केली. मात्र तो काळ वेगळा होता. आता परिस्थिती पूर्णपणे वेगळी. चाळीस वर्षांपूर्वी जात, पात, धर्म, प्रांत अन् भाषा यांचा समाजावर प्रचंड पगडा. ग्लोबलायझेशनमध्ये सारेच एका पातळीवर आलेले असं म्हणतो आपण; पण प्रत्यक्षात हे भेदाभेद अधिक पक्केच झालेले असावेत की काय, असं सगळं चित्र.

सोशल मीडियाच्या काळात व्यक्त होण्यासाठी कैक साधनं तंत्रज्ञानानं आपल्या हातात दिलेली असतानाही ‘केवळ आपलं प्रेम कुटुंबाला रुचेल का?’ या भयग्रस्त जाणिवेपोटी दोन युगुलांनी स्वत:चा जीव गमावला, हे वास्तव विषण्ण करणारं खरंच! यांचे लटकणारे मृतदेह जेव्हा खाली उतरविले गेले, तेव्हा संबंधितांचा टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता. घरची मंडळी म्हणत होती, ‘आम्हाला अगोदरच विश्वासात घेतलं असतं तर आम्ही थोडंच नाही म्हणालो असतो?’

या दोन्ही घटनांची जास्त खोलात जाऊन चौकशी केली, तेव्हा एक साम्य लक्षात आलं. ‘लॉकडाऊन’मुळं शहरातले रोजगार गमावून बसलेले दोन्ही प्रियकर आपापल्या गावी आलेले. नोकरीची शाश्वती गमाविल्यानं दोन्ही तरुणांच्या डोळ्यासमोर अंध:कार ! त्यात गेल्या सहा महिन्यांपासून घरातली मंडळी अधिकाधिक वेळ घरातच. भेटीसाठी मनसोक्त वेळ मिळेना. मोबाइलवर मुक्तपणे बोलण्यासही बंधनं आली. यातूनच भविष्यातली स्वप्नं डळमळीत झाल्याचं पाहून त्यांनी वर्तमानात ‘दोरीचा आधार’ घेतला.

‘लॉकडाऊन’चा हा नवा ‘इफेक्ट’ गावोगावी प्रकर्षानं जाणवू लागला आहे. घरात कायमची वर्दळ वाढली. बाहेर फिरण्याचं स्वातंत्र्य हरपलं. बंद दाराआडच्या या घुसमटीचे अनेक चेहरे आता समोर येऊ लागले आहेत. घरातून पळून जाणाºया तरुणींच्या संख्येत वाढ झाल्याची आकडेवारीही हाती येते आहे. यातही धक्कादायक गोष्ट म्हणजे अल्पवयीन मुलींचं प्रमाण सर्वाधिक.

अहमदनगर जिल्ह्यात हा आकडा तीनशेपर्यंत पोहोचलाय, तर नाशिक जिल्ह्यात पन्नास एवढा. सध्या शाळा-कॉलेज बंद. खासगी क्लासेसही आॅनलाइन. त्यात पुन्हा बाहेर भेटण्याची ठरलेली सारीच ठिकाणं कुलूपबंद. मग यात थिएटर-गार्डन आलं. हॉटेल्स-ज्यूस बारची अवस्थाही तशीच. घरात सर्वांसमोर व्हिडिओ कॉलिंग करणंही मुश्कील. यामुळं घरच्या भिंतीचं अन् भीतीचं बंधन झुगारून मुली आपला असा वेगळा मार्ग शोधू लागल्या आहेत असं म्हणावं का? मंद्रुप गावातला किस्सा तर अधिक धक्कादायक. एका शेतगड्याची पंधरा वर्षांची पोरगी गावातल्या पोरासोबत पळून गेली. आई-वडील पोलीस ठाण्यात धावले. मुलाला अटक होणार म्हणताच ती पोरगी स्वत:हून ठाण्यात हजर झाली अन् ‘मी आजीकडं स्वखुशीनं गेले होते,’ असा खोटा जबाब देऊ लागली. या वयातला हा धाडसीपणा पाहून अधिकारीही चाट पडले; मात्र आजीनं हात वर करताच पोरासह त्याच्या कुटुंबाचीही उचलबांगडी झाली.सोशल मीडियामुळं काळ कुठल्या कुठे धावतोय. जळगावची एक विवाहिता फेसबुकवरचा फोटो पाहून उत्तर प्रदेशातल्या तरुणाच्या प्रेमात पडते. घरदार विसरून ती थेट नेपाळच्या सीमेपर्यंत पोहोचते. पतीला घटस्फोटही द्यायला तयार होते. दुसरीकडं लातूरचा एक तरुण सोशल मीडियावर ओळख झालेल्या एका तरुणीला भेटण्यासाठी थेट पाकिस्तान सीमेवर जातो. या साºया घटना अस्वस्थ करणाºया तर आहेतच; पण शोधू गेलं तर त्या सगळ्यात जे एक नातं सापडतं, ते या विचित्र काळाचा उलगडा थोड्या विचित्र पद्धतीने करू पाहातं आहे.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट