शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अनावश्यक वाद टाळता आला असता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 04:25 IST

आठ आठवड्यांची गुप्तता अखेर संपली. कुंबळे यांचा उत्तराधिकारी म्हणून दरदिवशी कुणाचे ना कुणाचे नाव चर्चेत आले. या वादाच्या पार्श्वभूमीवर रवी शास्त्री

- अयाज मेमनआठ आठवड्यांची गुप्तता अखेर संपली. कुंबळे यांचा उत्तराधिकारी म्हणून दरदिवशी कुणाचे ना कुणाचे नाव चर्चेत आले. या वादाच्या पार्श्वभूमीवर रवी शास्त्री यांचा मुख्य कोच म्हणून राज्याभिषेक झाला. कोच या नात्याने शास्त्री यांच्या सर्वच अटी मान्य करण्यात आल्या का हे समजणे कठीण आहे. प्रत्येक गोष्टीत शास्त्री यांचाच विजय झाला हे कुणी दाव्याने सांगू शकणार नाही.पदभार सांभाळताच शास्त्री यांनी सर्वांत आधी स्वत:च्या पसंतीचा सपोर्ट स्टाफ मागितला. मागच्या संचालकपदाच्या कार्यकाळात हाच स्टाफ त्यांच्यासोबत होता. खरेतर एकट्या भरत अरुण यांची गरज असताना (कुंबळे यांनी आपल्या कार्यकाळात गोलंदाजी कोचची जबाबदारी देखील स्वत:कडेच ठेवली होती) फारसे बदल करण्याची गरजही नव्हती.तरीही वाद याच गोष्टींचा होता की रवी शास्त्री आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी दबाव तंत्रांचा वापर करीत होते. काही जाणकारांचे हेच मत आहे. क्रिकेट सल्लागार समितीने (सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश असलेली समिती) गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी दोन सल्लागार कोचेस नियुक्त केल्यानंतर नव्या मागणीची खरोखर गरज होती काय?राहुल द्रविड आणि जहीर खान ही दोन नावे असल्याने हे प्रकरण अधिक संवेदनशील, वादग्रस्त आणि गुंतागुंतीचे झाले. सीएसी, बीसीसीआय आणि प्रशासकीय समिती(सीओए) यांनी अधूनमधून वक्तव्ये केल्यानंतर सल्लागारांची केवळ शिफारस केली होती, नियुक्ती नव्हे, असे स्पष्टीकरण देखील द्यावे लागले.अशा प्रकाराच्या बेताल वक्तव्यांमुळे सर्व संबंधितांच्या (बीसीसीआय, सीओए आणि विशेषत: सीएसी) प्रतिष्ठेला तडा गेला आहे. सल्लागारांनी स्वत:ची सीमा ओलांडल्याचे वक्तव्य सीओएने करताच आणखी वाद चिघळला. तिघांमध्ये उत्कृष्ट समन्वय असता आणि ओढताण झाली नसती तर हा वाद उद्भवलाच नसता. या वादामुळे केवळ सीएसीची प्रतिष्ठा धुळीस मिळाली असे नाही तर द्रविड आणि जहीर खानसारख्या चांगल्या संघटकांच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे.द्रविड आणि जहीर हे संघासाठी योग्य आहेत की नाही, हाच मुद्दा होता. दोघांची उपयुक्तता नाही, याविषयी कुणाला शंकादेखील नव्हती. पण त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया ज्या संवेदनशीलतेने हाताळायला हवी होती, जो शिष्टाचार पाळायला हवा होता, तो पाळला गेला नाही, असे खेदाने म्हणावे लागेल.माझ्यामते एकदा क्रिकेट सल्लागार समितीने ज्यांच्या नावाला मंजुरी दिली त्यानंतर शास्त्री यांना त्यांच्या मनाप्रमाणे स्टाफ उपलब्ध करून देणे सर्वस्वी चुकीचे आहे. हा शिष्टाचार वेळोवेळी पाळला गेला पाहिजे. भारतीय क्रिकेटमध्ये याआधीही अशा शिष्टाचाराचे पालन झाले आहे. नवा पायंडा पाडणे म्हणजे नव्या वादाला जन्म देणे हा अर्थ निघतो. निर्णयाचा क्रम आणि घोषणा यातही दोष होता. राहुल द्रविड आणि जहीर यांच्या नियुक्तीस शास्त्री यांचा विरोध नव्हताच असेही सांगण्यात आले. मागच्यावर्षी शास्त्री हे कुंबळेच्या तुलनेत माघारले त्यावेळीही त्यांनी द्रविड आणि जहीर यांच्या उपयुक्ततेची वकिली केली होती. जहीर आणि द्रविड यांना कुणाचाही विरोध नव्हता तर कोचच्या नियुक्तीनंतर सपोर्ट स्टाफच्या उपलब्धतेवर निर्णय घ्यायला हवा होता. घोड्याच्या आधी गाडी का दौडविण्यात आली हे कळायला मार्ग नाही. आता या गोष्टी भूतकाळात गेल्या आहेत.भारतीय संघ देशाबाहेर खेळत असल्यास द्रविड आणि जहीर यांना सल्लागार म्हणून नेमण्यात यावे. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जात असल्याने सध्यातरी सर्व लक्ष कोहली आणि शास्त्री यांच्यावरच असेल. लंकेच्या खेळाडूंची कामगिरी ढेपाळल्यामुळे हा दौरा सोपा मानला जात आहे. पण घरच्या मैदानावर लंकेला नमविणे सोपे नाही, हेच खरे. अशावेळी संपूर्ण दडपण असेल ते उत्कृष्ट रँकिंग असलेल्या टीम इंडियावर. शास्त्री आणि कोहली या जोडीने पहिल्या कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरी बजावली. अशातच मागच्यावर्षी शास्त्री यांची उचलबांगडी झाली तेव्हा कोहली स्वत:ची निराशा लपवू शकला नव्हता. आता पुनर्मिलन झाले. पण पुनर्मिलनापूर्वी जे नाट्य घडले ते सर्वांनी पाहिले आहे. कोहली- शास्त्रींकडून अपेक्षा वाढल्या आहेत. दोघांची मैत्री जुनी असेल पण आव्हाने नवीन आहेत.

( लेखक लोकमतचे संपादकीय सल्लागार आहेत)