शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

‘पद्मश्री’चे ओझे न झालेले जोडपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 03:29 IST

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या आरोग्यासाठी निष्काम भावनेतून काम करणाऱ्या डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग या दोघांना एकाच वेळी यंदाचा भारत सरकारचा पदमश्री सन्मान जाहीर झाला.

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या आरोग्यासाठी निष्काम भावनेतून काम करणाऱ्या डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग या दोघांना एकाच वेळी यंदाचा भारत सरकारचा पदमश्री सन्मान जाहीर झाला.एखाद्या दाम्पत्याला हा पुरस्कार एकाचवेळी प्राप्त होणे ही स्वतंत्र भारताच्या इतिहासातील दुसरीच घटना. त्यांना आज दि. २० मार्च रोजी दिल्ली येथे हा नागरी सन्मान प्रदान करण्यात येत आहे. त्यानिमित्त...गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या आरोग्यासाठी निष्काम भावनेतून काम करणाºया डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग या दोघांना एकाच वेळी यंदाचा भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. एखाद्या दाम्पत्याला हा पुरस्कार एकाचवेळी प्राप्त होणे ही स्वतंत्र भारताच्या इतिहासातील दुसरीच घटना. आदिवासी भागात केवळ आरोग्यसेवाच न देता त्यांच्या आरोग्याच्या समस्या कशा कमी करता येतील यासाठी सातत्याने संशोधन करण्याचे काम डॉ. बंग दाम्पत्य ३२ वर्षांपासून करीत आहेत. भारतातील सार्वजनिक आरोग्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे. दुर्गम आणि ग्रामीण भागातील नवजात बाळांना आरोग्यसेवा, बालमृत्यू आणि स्त्री आरोग्याच्या समस्या याबाबत त्यांनी तयार केलेला उपक्र म आज भारतासह अनेक देशांत लागू करण्यात आला आहे.आरोग्याच्या सर्वाधिक समस्या या खेड्यांमध्ये आहेत याची त्यांना कल्पना होतीच. पण सगळे संशोधन सुरू होते ते शहरांमध्ये. जिथे जास्त समस्या आहेत तिथेच नवे काम सुरू करायचे असे त्यांनी ठरवले. त्यामुळे गडचिरोली जिल्हा हेच कार्यक्षेत्र निवडून १९८६ साली डॉ. बंग दाम्पत्याने गडचिरोली येथे ‘सर्च’ या संस्थेची स्थापना केली. गावांतील लोकांच्या आरोग्याचे प्रश्न कसे सोडवायचे याचा शोध घेणे हा सर्चचा उद्देश. शहरातील मोठमोठ्या इमारती आणि पांढºया कपड्यातील डॉक्टरांमुळे येथील आदिवासी रुग्णालयात जाण्यास घाबरतात हे डॉ. बंग यांच्या लक्षात आले. त्यामुळे रुग्णालय हे आदिवासींना त्यांचे घर वाटले पाहिजे या भावनेतून घोटूल पद्धतीने धानोरा मार्गावर ‘शोधग्राम’ आकारास झाले. येथे आदिवासींच्या लोकभावनेचा आदर करीत त्यांच्याच आग्रहावरून रुग्णालयाला ‘माँ दंतेश्वरी दवाखाना’ असे नामकरण करण्यात आले. जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण खूप जास्त असल्याचेही डॉ. बंग यांच्या लक्षात आले. शंभर गावांमध्ये त्यांनी बालमृत्यूचे मोजमाप सुरू केले. आज ३० वर्षानंतरही ते मोजमाप नियमितपणे सुरू आहे. नवजात बाळ व त्यांचे मृत्यू हीदेखील मोठी समस्या होती. बरेचदा आजारी बालकांना दवाखान्यात नेलेच जात नाही. तसेच संसाधनांच्या अभावी बाळ रुग्णालयात पोहोचेपर्यंत उशीर झालेला असतो. त्यामुळे गावातल्याच एका स्त्रीने बाळाचा इलाज केला तर ? ही नवीन संकल्पना त्यांच्या मनात आली आणि पुढे ‘होम बेस न्यू बॉर्न केअर’ ही पद्धत उदयास आली. गडचिरोली जिल्ह्यात ३९ गावांत हा प्रयोग सुरू केला. यामुळे नवजात मृत्यूचे प्रमाण ७० टक्के कमी झाले व अर्भक मृत्यूदर घसरून ३० वर आला आहे. भारतात केंद्र शासनाद्वारे पंचवार्षिक योजनेमध्ये या पद्धतीला स्वीकारून व या उपक्रमाचे स्वरूप व्यापक करून ‘आशा’ हा उपक्रम तयार करण्यात आला आहे. सामुदायिक आरोग्याचे प्रश्न सोडविताना गडचिरोली जिल्ह्यात दारू आणि तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात होत असल्याची बाब डॉ. बंग दाम्पत्याला लक्षात आली. त्यामुळे लोकचळवळीतून हा प्रश्न सोडविण्याचा ध्यास या दोघांनीही घेतला. यासाठी दारूमुक्ती चळवळ उभारण्यात आली. याच प्रयत्नातून जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली.हे जोडपे पुरस्कारांच्या ओझ्यामुळे संथ झालेले नाही. आजदेखील डॉ. राणी बंग या दररोज शंभरावर स्त्री रुग्णांना तपासतात. शस्त्रक्रियेची मोठमोठी शिबिरे आयोजित करतात व महाराष्ट्रभर ‘तारुण्यभान’ शिबिर घेत फिरतात. डॉ. अभय बंग यांनी परवाच भारत सरकारला देशासाठी नवा आदिवासी आरोग्य आराखडा सादर केला, आणि हे सर्व करताना सेवाग्राम आश्रमातून लहानपणी मिळालेले सफाई, श्रमदान व प्रार्थना हे संस्कार शोधग्राममध्ये करण्यात ते दोघे व्यस्तच राहणार.

टॅग्स :Abhay Bangअभय बंग