शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

‘पद्मश्री’चे ओझे न झालेले जोडपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 03:29 IST

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या आरोग्यासाठी निष्काम भावनेतून काम करणाऱ्या डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग या दोघांना एकाच वेळी यंदाचा भारत सरकारचा पदमश्री सन्मान जाहीर झाला.

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या आरोग्यासाठी निष्काम भावनेतून काम करणाऱ्या डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग या दोघांना एकाच वेळी यंदाचा भारत सरकारचा पदमश्री सन्मान जाहीर झाला.एखाद्या दाम्पत्याला हा पुरस्कार एकाचवेळी प्राप्त होणे ही स्वतंत्र भारताच्या इतिहासातील दुसरीच घटना. त्यांना आज दि. २० मार्च रोजी दिल्ली येथे हा नागरी सन्मान प्रदान करण्यात येत आहे. त्यानिमित्त...गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या आरोग्यासाठी निष्काम भावनेतून काम करणाºया डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग या दोघांना एकाच वेळी यंदाचा भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. एखाद्या दाम्पत्याला हा पुरस्कार एकाचवेळी प्राप्त होणे ही स्वतंत्र भारताच्या इतिहासातील दुसरीच घटना. आदिवासी भागात केवळ आरोग्यसेवाच न देता त्यांच्या आरोग्याच्या समस्या कशा कमी करता येतील यासाठी सातत्याने संशोधन करण्याचे काम डॉ. बंग दाम्पत्य ३२ वर्षांपासून करीत आहेत. भारतातील सार्वजनिक आरोग्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे. दुर्गम आणि ग्रामीण भागातील नवजात बाळांना आरोग्यसेवा, बालमृत्यू आणि स्त्री आरोग्याच्या समस्या याबाबत त्यांनी तयार केलेला उपक्र म आज भारतासह अनेक देशांत लागू करण्यात आला आहे.आरोग्याच्या सर्वाधिक समस्या या खेड्यांमध्ये आहेत याची त्यांना कल्पना होतीच. पण सगळे संशोधन सुरू होते ते शहरांमध्ये. जिथे जास्त समस्या आहेत तिथेच नवे काम सुरू करायचे असे त्यांनी ठरवले. त्यामुळे गडचिरोली जिल्हा हेच कार्यक्षेत्र निवडून १९८६ साली डॉ. बंग दाम्पत्याने गडचिरोली येथे ‘सर्च’ या संस्थेची स्थापना केली. गावांतील लोकांच्या आरोग्याचे प्रश्न कसे सोडवायचे याचा शोध घेणे हा सर्चचा उद्देश. शहरातील मोठमोठ्या इमारती आणि पांढºया कपड्यातील डॉक्टरांमुळे येथील आदिवासी रुग्णालयात जाण्यास घाबरतात हे डॉ. बंग यांच्या लक्षात आले. त्यामुळे रुग्णालय हे आदिवासींना त्यांचे घर वाटले पाहिजे या भावनेतून घोटूल पद्धतीने धानोरा मार्गावर ‘शोधग्राम’ आकारास झाले. येथे आदिवासींच्या लोकभावनेचा आदर करीत त्यांच्याच आग्रहावरून रुग्णालयाला ‘माँ दंतेश्वरी दवाखाना’ असे नामकरण करण्यात आले. जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण खूप जास्त असल्याचेही डॉ. बंग यांच्या लक्षात आले. शंभर गावांमध्ये त्यांनी बालमृत्यूचे मोजमाप सुरू केले. आज ३० वर्षानंतरही ते मोजमाप नियमितपणे सुरू आहे. नवजात बाळ व त्यांचे मृत्यू हीदेखील मोठी समस्या होती. बरेचदा आजारी बालकांना दवाखान्यात नेलेच जात नाही. तसेच संसाधनांच्या अभावी बाळ रुग्णालयात पोहोचेपर्यंत उशीर झालेला असतो. त्यामुळे गावातल्याच एका स्त्रीने बाळाचा इलाज केला तर ? ही नवीन संकल्पना त्यांच्या मनात आली आणि पुढे ‘होम बेस न्यू बॉर्न केअर’ ही पद्धत उदयास आली. गडचिरोली जिल्ह्यात ३९ गावांत हा प्रयोग सुरू केला. यामुळे नवजात मृत्यूचे प्रमाण ७० टक्के कमी झाले व अर्भक मृत्यूदर घसरून ३० वर आला आहे. भारतात केंद्र शासनाद्वारे पंचवार्षिक योजनेमध्ये या पद्धतीला स्वीकारून व या उपक्रमाचे स्वरूप व्यापक करून ‘आशा’ हा उपक्रम तयार करण्यात आला आहे. सामुदायिक आरोग्याचे प्रश्न सोडविताना गडचिरोली जिल्ह्यात दारू आणि तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात होत असल्याची बाब डॉ. बंग दाम्पत्याला लक्षात आली. त्यामुळे लोकचळवळीतून हा प्रश्न सोडविण्याचा ध्यास या दोघांनीही घेतला. यासाठी दारूमुक्ती चळवळ उभारण्यात आली. याच प्रयत्नातून जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली.हे जोडपे पुरस्कारांच्या ओझ्यामुळे संथ झालेले नाही. आजदेखील डॉ. राणी बंग या दररोज शंभरावर स्त्री रुग्णांना तपासतात. शस्त्रक्रियेची मोठमोठी शिबिरे आयोजित करतात व महाराष्ट्रभर ‘तारुण्यभान’ शिबिर घेत फिरतात. डॉ. अभय बंग यांनी परवाच भारत सरकारला देशासाठी नवा आदिवासी आरोग्य आराखडा सादर केला, आणि हे सर्व करताना सेवाग्राम आश्रमातून लहानपणी मिळालेले सफाई, श्रमदान व प्रार्थना हे संस्कार शोधग्राममध्ये करण्यात ते दोघे व्यस्तच राहणार.

टॅग्स :Abhay Bangअभय बंग