शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

गडकरींचे टीकास्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 03:24 IST

येत्या पाच महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका व्हायच्या आहेत आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर गडकरींनी दिलेला हा इशारा भाजपाच्या साऱ्या पुढाºयांना व कार्यकर्त्यांना अंतर्मुख करणारा आहे.

नितीन गडकरी यांच्या रूपाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बोलत असतो. त्यामुळे ‘जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणार नसाल तर जनता तुम्हाला फटके लगावेल’ हे गडकरींचे विधान प्रत्यक्षात संघाचे आहे आणि ते मोदी आणि त्यांच्या सरकारला ऐकविले आहे, हे उघड आहे. नितीन गडकरी हे तसेही स्वतंत्र भूमिका घेण्यात आणि मोदींपासून शक्यतोवर दूर राहण्यात पटाईत आहेत. मोदीही त्यांना फारसे जवळ करताना गेल्या चार वर्षांत कधी दिसले नाहीत. पर्रीकर गोव्यात गेले, जेटली अमेरिकेला गेले, सुरेश प्रभूंचे खाते काढून घेतले अशा वेळी मोदी नितीन गडकरी यांना एखादे वरिष्ठ पद देऊन मंत्रिमंडळाच्या राजकीय समितीत आणतील, असा कयास अनेकांनी बांधला होता. प्रत्यक्षात मोदींनी त्यांना दिल्लीपासून दूर अंतरावर सडका बांधत ठेवले.वास्तव हे की भाजपाच्या राजकारणात नितीन गडकरी मोदींना ज्येष्ठ आहेत. अडवाणींच्या पश्चात संघाने त्यांनाच भाजपाचे अध्यक्षपद दिले आहे. ते अध्यक्ष असताना मोदी गुजरातचे मुख्यमंत्री आणि अमित शाह हे त्या राज्याचे गृहराज्यमंत्री होते. ही एकच बाब गडकरींचा भाजपामधील अधिकार व उंची सांगणारी आहे. मात्र मोदींनी त्यांना तसा मान कधी दिला नाही. गडकरी यांनीही ते कधी मनावर घेतले नाही आणि आपले मनोगत धाडसाने ऐकविण्याचे कामही कधी थांबविले नाही. बाकीचे सारे मंत्री मोदींसमोर माना खाली घालून कारकुनासारखे उभे असताना गडकरी मात्र स्वतंत्र दिमाखात वावरताना सदैव दिसले.येत्या पाच महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका व्हायच्या आहेत आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर गडकरींनी दिलेला हा इशारा महत्त्वाचा व भाजपाच्या साºया पुढाºयांना व कार्यकर्त्यांना अंतर्मुख करणारा आहे. त्यातून १९ आणि २० फेब्रुवारीला नागपूर या गडकरींच्या मतदारसंघात भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन व्हायचे आहे. त्यामुळे तर यजमानाचे हे खडेबोल मोदी व त्यांच्या भक्तांना घायाळ करणारे आहेत. अनेक भाजपा नेत्यांच्याही कपाळाला यामुळे आठ्या पडल्या आहेत. सत्तेवर येण्याआधी प्रत्येक नागरिकाला १५ लाख रुपये देण्याचे मोदींचे आश्वासन आता ते स्वत:च विसरले आहेत. दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे त्यांचे आश्वासन त्यांचा पक्षही विसरला आहे. महागाई कमी करणे, शेतमालाला दर्जेदार भाव देणे आणि देशाची अर्थव्यवस्था साडेसात टक्क्यांनी वाढत ठेवणे ही आश्वासनेही कधीचीच हवेत विरली आहेत.‘तेव्हा कदाचित आम्ही निवडून येणार नाही असे वाटल्याने आमच्या पक्षाने व नेत्याने ही आश्वासने दिली असतील. मात्र लोक ती अद्याप विसरले नाहीत. सबब, येत्या निवडणुकीत लोक त्यांना त्याविषयीचा जाब मागणार आहेत’ हे गडकरी यांनी मोदींसकट साºया भाजपावाल्यांना खणखणीतपणे सुनावले आहे. जी गोष्ट सोनिया गांधी किंवा राहुल गांधींनी देशाला ऐकवायची ती मोदींचे एक ज्येष्ठ सहकारी अशी ऐकवत असतील तर ती त्या पक्षातील खदखद व असंतोष दर्शविणारी बाब आहे. नितीन गडकरी बिनधास्त बोलतात म्हणून त्यांचे बोलणे सहजासहजी उडवून लावता येण्याजोगे नाही. गडकरी ही संघाची देशाच्या नेतृत्वासाठी असलेली पहिली निवड आहे. याउलट मोदी हा संघाचा नाइलाज आहे, हा इतिहास ताजा आणि न विसरता येणारा आहे. त्यामुळे गडकरींचे वक्तव्य हे त्यांचे एकट्याचे मत म्हणून पाहता येत नाही. ते संघाचे, संघाच्या जुन्या व ज्येष्ठ नेत्यांचे आणि झालेच तर पक्षातील वयस्क वरिष्ठांचे मत म्हणूनही पाहिले पाहिजे. केवळ ते बोलण्याची गडकरींची तयारी असल्याने ते बोलले इतकेच.अर्थात गडकरींच्या या टीकेमुळे मोदी त्यांची वाटचाल बदलतील किंवा अमित शाह यांचा उन्माद ओसरेल अशी भाबडी आशा कुणी बाळगण्याचे कारण नाही. त्यांचे ते उपजत स्वभाव आहेत. ते बदलू शकत नाहीत. आपल्या विरोधकांबाबत ज्या अशिष्ट पातळीवर मोदी बोलतात आणि शाह हे तर आपल्या मित्रपक्षांनाच ‘पटकण्याची’ भाषा ऐकवतात, ते पाहिले की मग त्यांची खरी ओळख त्यांच्या बैठकीसकट लक्षात येते. पाच राज्यांत जनतेने धूळ चारल्यानंतरही ज्यांचे मेंदू ठिकाणावर येत नाहीत त्यांना गडकरी वळणावर आणतील, अशी अपेक्षा त्याचमुळे बाळगण्याचे कारण नाही. मात्र मोदी सरकारने ही अपेक्षा पूर्ण केली नाही एवढ्यासाठी जनता त्यांची खोटी आश्वासने विसरून जाईल वा खपवून घेईल, असे आपणही समजण्याचे कारण नाही.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ