शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

Union Budget 2019: शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणावर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 01:46 IST

‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून क्रीडाक्षेत्राकडे लक्ष देण्यात आले आहे. मात्र, अर्थसंकल्पीय भाषणात शालेय शिक्षणाबाबत मोठी भरीव तरतूद किंवा योजनांचा उल्लेख करण्यात आला नाही.

- डॉ. शां. ब. मुजुमदार(संस्थापक-अध्यक्ष, सिम्बायोसिस )देशातील शिक्षण संस्था जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत याव्यात, त्यासाठी अर्थसंकल्पात शिक्षण संस्थांसाठी ४०० कोटींची तरतूद, संशोधनाला चालना देण्यासाठी नॅशनल रीसर्च फाउंडेशनची स्थापना, स्टडी इन इंडिया कार्यक्रमाच्या माध्यमातून परदेशी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार अशा नवनवीन कार्यक्रमांचा विचार अर्थसंकल्पात करण्यात आला असला, तरी शालेय शिक्षणाबाबत अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याचे दिसून येत नाही.केंद्र शासनातर्फे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर काम सुरू असून, त्यामुळे देशाच्या शिक्षणाचा ढाचा बदलून जाईल. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने नवीन शैक्षणिक आराखड्यात चांगल्या तरतुदीचा समावेश केला आहे. तसेच, एक कोटी विद्यार्थ्यांना कौशल्य अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे नॅशनल रीसर्च फाउंडेशनची स्थापना केली.नॅशनल रीसर्च फाउंडेशनमुळे एकाच ठिकाणाहून संशोधनासाठी निधी प्राप्त होईल. तसेच, आतापर्यंत ज्या देशात आपले दूतावास नव्हते, त्या देशांमध्ये दूतावास काढण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणावर भर दिल्याचे दिसून येते.‘स्डडी इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत देशात परदेशी विद्यार्थ्यांची संख्या वाढेल. स्टडी इन इंडियासारखी योजना प्रभावीपणे राबविली आणि काही शैक्षणिक संस्थांमध्ये परदेशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, तर पुढील दोन ते तीन वर्षांत भारतात दोन लाखांपेक्षा अधिक परदेशी विद्यार्थी प्रवेश घेतील. त्यातच अमेरिकेत ३.५ लाख परदेशी विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. त्यातील भारतातून सुमारे एक ते दीड लाख विद्यार्थी अमेरिकेत जातात. त्यामुळे भारतातून चार अब्ज डॉलर परकीय चलन दरवर्षी शिक्षणाच्या माध्यमातून अमेरिकेत जाते.परदेशी विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी, मनस्ताप ओळखून पुण्यात सिम्बायोसिसची स्थापना झाली. त्यामुळे पुण्यात परदेशी विद्यार्थ्यांची संख्या वाढली. पुण्यात १९६९ मध्ये ८०० परदेशी विद्यार्थी शिक्षण घेत होते. आज ही संख्या १८ हजार झाली आहे. पूर्वी विद्यापीठ, महाविद्यालयांकडून परदेशी विद्यार्थ्यांची काळजी घेतली जात नसे; किंबहुना त्यांच्याकडे कुचेष्टेने पाहण्याचा दृष्टिकोन होता. परंतु, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये ‘स्टडी इन इंडिया’ कार्यक्रमाची अधिकृत घोषणा करून परदेशी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी बजेटमध्ये तरतूद केली, ही आनंदाची बाब आहे.वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटीसाठी शैक्षणिक संस्थांना ४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या ५ वर्षांत झालेल्या प्रयत्नांमुळे जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत देशातील तीन संशोधन संस्था पहिल्या दोनशेंच्या आत आल्या आहेत. पुढील काळात शैक्षणिक गुणवत्तावाढीमुळे त्यात आणखी काही शिक्षण संस्थांची भर पडेल. तसेच, ज्या देशात आपला दूतावास नाही अशा आफ्रिका खंडातील १८ देशांमध्ये दूतावास काढले जाणार आहेत. त्यातील तीन देशांमध्ये दूतावास सुरू झाले आहेत.

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Educationशिक्षण