शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

Union Budget 2019: दिशा सकारात्मक; नियोजनाचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 02:41 IST

धोरण म्हणून प्रभावी चित्र; सुस्पष्टता नाही, कौशल्य शिक्षण दिसत नाही

- डॉ. अरुण अडसूळ(शिक्षणतज्ज्ञ)

पुणे : प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणाचा दर्जा सुधारल्याशिवाय उच्च शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल होणे शक्य नाही. खालच्या स्तरापासून दर्जा सुधारायला हवा. त्यादृष्टीने नियोजन करण्याची गरज आहे. अर्थसंकल्पामध्ये सुशासनावर भर देणार असल्याचे म्हटले आहे; पण जोपर्यंत ट्रस्ट अ‍ॅक्ट आहे, तोपर्यंत गुणवत्ताधारकांना संधी मिळणार नाही. संस्थाचालकांचेच वर्चस्व राहील. नॅशनल रीसर्च फाउंडेशन ही कल्पना चांगली आहे; पण शेती, उद्योग, शिक्षणासह विविध क्षेत्रांतील गरजांनुसार संशोधनावर भर द्यायला हवा. ‘हायर एज्युकेशन कौन्सिल आॅफ इंडिया’ ही कल्पनाही चांगली आहे.अर्थसंकल्पात कौशल्यविकासाला डावलण्यात आल्याचे दिसते. शिक्षणातून प्रबोधन बाजूला गेल्याने कौशल्य शिक्षणाबरोबरच सुज्ञ नागरिक घडविण्यासाठी ‘माइंडसेट’ विकासासाठी विशेष प्रशिक्षण हवे. परदेशी विद्यार्थ्यांनी भारतात येऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी ‘स्टडी इन इंडिया’ या कार्यक्रमाची घोषणा केली आहे; पण भारतामध्ये गरजेनुसार ज्ञान, गरजेनुसार कौशल्य आणि अर्थपूर्ण जगण्याच्या दिशा जेव्हा परावर्तित होतील, तेव्हा परदेशी विद्यार्थी येतील. वर्डक्लास संस्थांसाठी ४०० कोटींची तरतूद अत्यंत तोकडी आहे. दर्जा सुधारण्यासाठी त्यावर भर देणारी स्वतंत्र यंत्रणा असायला हवी.

धोरण म्हणून प्रभावी चित्र; सुस्पष्टता नाही, कौशल्य शिक्षण दिसत नाहीकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शिक्षणाच्या बाबतीत त्यांची दिशा सकारात्मक दिसून येते. धोरणाचा एक भाग म्हणून प्रभावी चित्र निर्माण केले आहे; पण धोरणाला नियोजनाची बैठक असावी लागते. त्याबाबत अर्थसंकल्पात सुस्पष्टता दिसत नाही. उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यावर अधिक भर दिला असला, तरी प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष झालेले आहे.

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Educationशिक्षण