शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

गावागावांतील अस्वस्थ धर्मा पाटील !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 02:27 IST

नवीन भूसंपादन कायदा २०१४ मध्ये अस्तित्वात आला. त्यानुसार वाढीव मोबदला देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्राधिकरणाची निर्मिती करणे आवश्यक आहे.

- राजेश शेगोकारनवीन भूसंपादन कायदा २०१४ मध्ये अस्तित्वात आला. त्यानुसार वाढीव मोबदला देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्राधिकरणाची निर्मिती करणे आवश्यक आहे. त्याची पूर्तता अजूनही झालेली नाही. परिणामी, वाढीव मोबदल्याची हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत अन् शेतकºयांच्या व्यथा वाढत्याच आहेत! त्यामुळे गावागावातील अनेक धर्मा पाटील अस्वस्थ आहेत.आधी पुनर्वसन, मग धरण, ही शासनाची घोषणा असली, तरी एकाही प्रकल्पाच्या संदर्भात ही घोषणा प्रत्यक्षात आली नाही. भूसंपादन अन् त्याचा मोबदला या प्रक्रिया अतिशय किचकट असल्याने सामान्य शेतकºयांची होरपळ होते. प्रशासनाच्या झारीतील शुक्राचार्य संपादित जमिनींचा मोबदला देण्यामध्येही प्रचंड तफावत ठेवतात. त्यामुळे शेतकºयांमध्ये असंतोष निर्माण होतो अन् वाढीव मोबदल्यासाठी शासन दरबारी हेलपाटे सुरू होतात. त्या हेलपाट्यांना कंटाळून, धर्मा पाटील यांना थेट मृत्यूला कवटाळावे लागले, यावरून शेतकºयांची व्यथा लक्षात यावी! त्यांच्या मृत्यूनंतर प्रशासनाला जाग आली व योग्य मोबदला देण्यासाठी धावपळ सुरू झाली; मात्र गावागावात असे अनेक धर्मा पाटील आहेत. ते प्रचंड अस्वस्थ आहेत.उपजीविकेचे साधन असलेली शेती शासनाला मातीमोल भावाने दिल्यावर थेट शेतमजूर होण्याची वेळ अनेक शेतकºयांवर आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या अशाच ३१७ शेतकºयांनी गोसीखुर्दच्या धर्तीवर वाढीव मोबदला मिळावा, या मागणीसाठी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यापैकी ७४ शेतकºयांनी उपोषण सुरू केले आहे. अकोला जिल्ह्यात शहापूर सिंचन प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यासाठी शिवपूर येथील रामदास राऊत यांच्या नावे असलेली १० एकर ३० गुंठे जमीन २० आॅगस्ट २००८ रोजी संपादित करण्यात आली. जमिनीचा मोबदला म्हणून त्यांना अवघे ५ लाख ३० हजार रुपये देण्यात आले. विशेष म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेने त्या रकमेतून ६० हजार रुपये पीक कर्जाची कपात करून शेतकºयाच्या हाती ४ लाख ७० हजार रुपयेच ठेवले! मोबदल्याची रक्कमसुद्धा दोन टप्प्यात देण्यात आली. त्यामुळे राऊत भूमिहीन झाले असून, शेतमजुरी करतात. असे अनेक शेतकरी आहेत. पारस औष्णिक वीज प्रकल्पासाठी बागायती शेती संपादित करून कोरडवाहूचा मोबदला दिल्याची शेतकºयांची तक्रारही शासनाकडे प्रलंबितच आहे. अकोल्यातीलच नया अंदुरा प्रकल्पासाठी अंत्री, मलकापूर, उरळ, कारंजा रम येथील शेतकºयांच्या जमिनी अवघ्या एकरी दोन लाख रुपये मोबदला देऊन संपादित करण्यात आल्या. आता हे सर्व शेतकरी पेटून उठले आहेत. असेच चित्र अवघ्या महाराष्ट्रात आहे.प्रकल्पांच्या किमती चौपट, पाचपट होतात; मात्र जमिनीचा मोबदला देताना शासन शेतकºयाच्या पदरात काय टाकते? यावर मंथन होण्याची गरज आहे. जमीन ही अचल संपत्ती आहे, तर पैसा हे चलन आहे. दररोज भाव वाढणारी जमीन घेऊन अवमूल्यन होणारा पैसा मोबदला म्हणून देणे हा एक प्रकारे अन्यायच आहे. जमीन शेतकºयाच्या उपजीविकेचे साधन आहे. सार्वजनिक कामासाठी जमीन घेत असल्यास, योग्य मोबदला मिळणे, हा जमीनमालकाचा हक्कच आहे. नवीन भूसंपादन कायद्यानुसार, वाढीव मोबदला देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्राधिकरणाची निर्मिती करण्याची गरज आहे; मात्र अजूनही ते झालेले नाही. परिणामी, वाढीव मोबदल्याची हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत अन् शेतकºयांच्या व्यथा वाढत्याच आहेत. त्यामुळे गावागावातील अनेक धर्मा पाटील अस्वस्थ आहेत. त्यांची अस्वस्थता आत्महत्येपर्यंत पोहोचण्याआधीच सरकारने सावध होण्याची गरज आहे. अन्यथा ही अस्वस्थता सरकारचा बळी घेतल्याशिवाय राहणार नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी