शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

डॉ. मंगला नारळीकरबाईंना अनावृत पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 04:32 IST

बाई, नातवंडांना गणितच काय, सर्व काही गाणी आणि गोष्टींमधून शिकविले की सोपे जाते, हे आजी-आजोबांना आधी कळते.

- डॉ. अंबुजा साळगावकर (संगणकशास्त्र प्रमुख)दुसरीच्या पुस्तकात प्रस्तावित संख्यावाचनाची नवी पद्धत आम्हासारख्या अनेकांच्या पचनी पडली नसल्याने, त्यावर खूप गदारोळ सुरू आहे. बाई, तुमच्या मते तो गणिताच्या वाटेवरचे काटे, खडे बाजूला करण्याचा प्रयत्न आहे. असेल... म्हणजे तशी तुमची धारणा दिसते, पण या प्रयोगाने निर्माण झालेले नवे काटे नि धोंडे दूर केल्याशिवाय तो यशस्वी होणे कठीण आहे. हां, त्या धारणेने अभ्यास मंडळाने सुचविलेला एक कौतुकास्पद बदल म्हणजे गणित शिकविण्याचा प्रारंभ गाण्याने नि समारोप गोष्टीने. हे मस्त!

बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणालात, नातवंडांना गणित शिकणे सुलभ व्हावे, म्हणून प्रयोग केलेत. बाई, नातवंडांना गणितच काय, सर्व काही गाणी आणि गोष्टींमधून शिकविले की सोपे जाते, हे आजी-आजोबांना आधी कळते. जरूर पुरस्कार करा त्याचा. ९०० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात लीलावतीद्वारा सिद्ध झालेला प्रयोग आपण पुन्हा करू या. झेलमसारख्या प्रख्यात नृत्यांगना पुढे आल्यात व्हिज्युअल आर्टमधून गणित साकारायला, समाजमाध्यमातून पडलेला चुटक्यांचा पाऊस? आपण त्याला योग्य प्रकारे वळविले, तर अनेक डोकी पुढे येतील, मनोरंजनातून गणित शिकवायला. टेक्नॉलॉजीचा उपयोग करून क्राउड सोअर्सिंगद्वारा पालक-शिक्षक प्रत्यक्ष सहभागातून पुस्तके बनविता येतील.

बाई, अशिक्षित घरातील पाल्यांच्या म्हणजे नेमक्या कुठल्या, किती तक्रारी कधी नि काय म्हणून आल्या होत्या? अकरापासून दोन अंकी संख्या सुरू होत असता, एकवीसपासून हा नवा प्रयोग का? मग एकतीस किंवा एकावन्नपासून का नको? या प्रयोगाचे दूरगामी परिणाम तपासले का? बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत प्रारंभीच एकाहत्तर ही संख्या असेल, तर तिचे वाचन सत्तर आणि एक असे करता येईल, हा नवा प्रस्ताव आहे, असे वाहिनी प्रतिनिधी म्हणते. त्यावर सत्तर एक अशी दुरुस्ती आपण का केली नाही? सत्तर आणि एक असते, तर सवालच नव्हता, त्यात नवे काहीच नाही.

तुम्हीच उदाहरणार्थ घेतलेली ५,३५७ ही संख्या पन्नास तीन शे पन्नास सात अशी म्हटली की, पन्नास तीनशे पन्नास सात (५०३००५०७) किंवा पन्नास तीनशे पन्नास सात (५०३५०७) अशीही ऐकू येईल आणि ऐकू येईल तसे एकापुढे एक लिहिणे हा आपल्या सुलभीकरणाचा पाया असल्याने चूक होणे सहज शक्य आहे. नवी पद्धत सोपी आहे, हे विधान गृहीतक, प्रमेय की तर्क? तुम्ही सांगितलेली सुलभ संवादाची व्याख्या, सांगणाऱ्याच्या मनातला अर्थ ऐकणाºयापर्यंत सहज पोहोचला पाहिजे, ही भारतीय दर्शनातील, ती योग्यच आहे, पण इथे तुमचीच संख्या तुम्हाला मान्य असल्याप्रमाणे दुसºया प्रकारे वाचून दाखविली असता, ऐकणाऱ्यांची त्रेधा उडतेय, तर सुलभीकरणाचे उद्दिष्ट साध्य झाले म्हणायचे का?

तुमच्या मुलांना ऐंशी नि चार विटा समजतात, तर म्हणा ऐंशीचार. पाडा हा द्वंद्व समास जीभवळणी. कोणाला फक्त पन्नासपर्यंतच संख्या येत असतील, तर त्यांना तुम्ही चौºयाऐंशी समजावण्यासाठी पन्नास चौतीस किंवा चाळीस चव्वेचाळीस असे सांगू शकता किंवा जोडाक्षर नकोच असल्यास बेचाळीस बेचाळीस असेही सांगता येईल. संपला विषय!......की सुरू झाला? आता भाऊऐवजी आईमुलगा किंवा बाबामुलगा म्हणायचे, असा विनोद पाठवलाय कुणी. त्याचे आईमुलगा वा बाबामुलगा हे रूप मान्य करता येईल. मात्र, शब्द जोडून किंवा तोडून लिहिण्यात चूक झाली, तर गणित चुकणार म्हणून मुलांना गणित आवडणार नाही.

तस्मात, संज्ञांचे सुलभीकरण करणे योग्य नाही. त्या रूढ झालेल्या असतात, जोडाक्षरे तिथे आणलेली नसून म्हणता-म्हणता नाद, ताल, लय इत्यादी गुणांसाठी ती तिथे जमतात. त्याने रूक्ष संज्ञा स्मरणे सुलभ होते, हे समजून घेऊन सत्तावीसऐवजी वीस सात, अठ्ठावीसऐवजी वीस आठ, सत्त्याण्णवऐवजी नव्वद सात असे शिकवावे, ही धडधडीत चुकीची सूचना मागे घ्यावी हे योग्य. बोलीमध्ये रूढ असलेली त्रेपन्न, चौसष्ट अशी रूपे मान्य करूनही आपण म्हणता ते काटे-खडे दूर करता येतील आणि मला वाटतं, परितेवाडीचे स्मार्ट सर म्हणून गौरविले गेलेल्या डिसले गुरुजीसारखे भेटतील काही, त्यांना घ्या अभ्यास मंडळावर. परफॉर्मन्स वाढण्यासाठी स्वयंपाकघर इंटेरिअरवाल्यापेक्षा गृहिणीला लावू द्यावे. पाहा पटतोय का हा विचार...

टॅग्स :Educationशिक्षण