शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाने कार्यकर्त्यांचे संभ्रमाच्या सीमेतच झाले लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 01:30 IST

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला एक इतिहास आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मुलूखमैदानी तोफ शिवाजी पार्काच्या मैदानावर धडधडताना अनेकांनी, अनेक वर्षे अनुभवली

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला एक इतिहास आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मुलूखमैदानी तोफ शिवाजी पार्काच्या मैदानावर धडधडताना अनेकांनी, अनेक वर्षे अनुभवली. शिवसेनेची भूमिका या मेळाव्यातून बाळासाहेब मांडायचे. मनात एक, ओठात एक असा त्यांचा स्वभाव नव्हता. त्या भूमिका ऐकण्याची सवय शिवसैनिकांना होती. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणाने कार्यकर्त्यांचे संभ्रमाच्या सीमेतच लंघन झाले. विचारांचे सोने लुटायला आलेल्यांच्या हाती फक्त आपट्याची वाळून गेलेली पानेच आली. ना कसला जोष, ना कोणती सलग; आक्रमक मांडणी. राज्यभरातून आलेल्या शिवसैनिकांना पक्षावर आपली मजबूत पकड असल्याचा दणकट संदेश देण्याची सुर्वणसंधी उद्धव यांनी हाताने घालवली.

आपल्या पक्षातील संभ्रमावस्था जर पक्षप्रमुख या नात्याने आपणच दूर करू शकत नसू तर कार्यकर्त्यांच्या व्यथा वेदना फार पुढचा भाग ठरतात. खा. संजय राऊत यांनी एनडीए मेल्याचे विधान केले होते. पण उद्धव यांनी त्याच्याविरुद्ध भूमिका भाषणात घेतली. आपण सत्तेत का आहोत आणि सत्तेतून बाहेर पडणार की नाही, पडणार असू तर कधी आणि कशासाठी? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शिवसैनिकांना हवी होती. मात्र महेबुबा मुफ्ती आणि नितीशकुमार सत्तेत का आहेत? हे शोधण्याचे काम उद्धवनी कार्यकर्त्यांना दिले. हे कम्युनिस्टांसारखे झाले. नळाला पाणी कधी येणार? अन्नधान्य स्वस्त कधी होणार? असे प्रश्न लोक विचारायचे तेव्हा कम्युनिस्ट नेते त्यांना रशियाची शकले कशी झाली, भारत त्याच मार्गावर कसा जातोय हे सांगायचे.

पुढे या कम्युनिस्टांचे काय झाले हे सांगायची गरज नाही. शिवसेना लढवय्या पक्ष आहे. मात्र पिंजºयात पाळलेला वाघ कुत्र्यालाही घाबरतो तशी या पक्षाची गत झाली आहे. सत्तेतून बाहेर पडलो तर आमदार पक्ष सोडून जातील अशी भीती जर पक्षप्रमुखांनाच वाटू लागली तर पक्ष कसा ताठ उभा राहणार? ज्यांना पक्ष सोडून जायचे असेल त्यांनी खुशाल जावे, आपण नवे चेहेरे घेऊन पक्ष उभा करू आणि त्यांना निवडूनही आणू असे म्हणण्याची धमक शिवसेना नेतृत्वाने कालच्या मेळाव्यात दाखवली असती तर जमलेल्या कार्यकर्त्यांमधली मरगळ काहीशी कमी झाली असती. मात्र तुम्ही आमची टक्केवारी सांभाळा, आम्ही तुमच्या खुर्च्या सांभाळतो असा संदेश जर भाषणातून मिळत असेल तर कार्यकर्त्यांनी का म्हणून टाळ्या वाजवायच्या? शरद पवार यांच्याविषयी उद्धव बोलले. पवारांच्या पक्षात नेते टिकत नसले तरीही जाणा-यांची तमा त्यांनी कधी केली नाही. उलट त्याजागी दुसºयाला निवडून आणण्याची प्रचंड क्षमता त्यांच्याकडे आहे.

प्रसंगी स्वपक्षातल्या नेत्यांना तिकीट देऊन पाडण्याची कलाही पवारांना येते. अशा अफाट ताकदीची अपेक्षा शिवसेना मेळाव्यातून उद्धव दाखवून देतील अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा होती मात्र तसे काहीच घडले नाही. उलट नको ते उद्योग केले तर जनता कानफटात मारेल, सत्तेत राहूनच विरोध करू अशी दुट्टपी भूमिका घेऊन उद्धव यांनी संभ्रमावस्था कायम ठेवली. तुमच्या डझनभर मंत्र्यांपैकी एकाही मंत्र्याने कधी सरकारला एखादा निर्णय घ्यायला भाग पाडल्याचे उदाहरण नाही. बुलेट ट्रेनबद्दल एकाही मंत्र्याने कधी मंत्रिमंडळात प्रश्न विचारला नाही. असे असताना शिवाजी पार्कात मंत्र्यांना व्यासपीठावर बसवून कानफटात मारण्याची भाषा कसली करता? भाजपाने भ्रमाचे आणि शिवसेनेने संभ्रमाचे वातावरण कायम ठेवण्याचे काम केले आहे. जनता मात्र फुकाच्या अपेक्षेने विचारांचे सोने लुटायला आली आणि हात हलवत निघून गेली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना