शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

स्वामींचे नमुनेदार उथळपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 07:21 IST

सगळ्याच राजकीय पक्षात व संघटनांमध्ये काही नमुन्यांचा समावेश असतो. हे नमुने क्वचितच कधी शहाण्यासारखे बोलतात. एरवीचे त्यांचे बरळणे निव्वळ करमणूक करणारे व ती करणाऱ्याच्या ज्ञानीपणाची कीव करायला लावणारे असते

सगळ्याच राजकीय पक्षात व संघटनांमध्ये काही नमुन्यांचा समावेश असतो. हे नमुने क्वचितच कधी शहाण्यासारखे बोलतात. एरवीचे त्यांचे बरळणे निव्वळ करमणूक करणारे व ती करणाऱ्याच्या ज्ञानीपणाची कीव करायला लावणारे असते. भाजपमध्ये असा एक नमुना सुब्रह्मण्यम स्वामी हा आहे. कधीकाळी हॉर्वर्डचा शिक्का लागलेला हा माणूस स्वत:च्या शहाणपणाएवढाच ऐकणाºया माणसांच्या अडाणीपणावर विश्वास ठेवणारा आहे. त्यामुळे वर्तमानातील असो वा इतिहासातील, कोणतेही वास्तव तो वेडेवाकडे करून जोरात सांगतो आणि माध्यमे त्याला कोणत्याही चौकशीवाचून प्रसिद्धी देतात. नागपुरातील कुठल्याशा सभेत बोलताना या स्वामींनी काँग्रेस हा पक्ष दाऊद इब्राहिमच्या धाकात असल्याचे सांगून टाकले. त्याला पुरावा काय, तर ते म्हणाले त्याचमुळे काँग्रेस पक्ष घटनेतील ३७० वे कलम रद्द करायला विरोध करतो. वास्तव हे की ३७० वे कलम जम्मू व काश्मीर या राज्याचा विशेष घटनात्मक दर्जा मान्य करतो. घटना तयार होत असताना व देशाचे सगळे श्रेष्ठ नेते हयात व हजर असताना ते कलम मान्य केले गेले. काश्मीरचे संस्थान भारतात विलीन करण्यासाठी त्याचे तेव्हाचे राजे हरिसिंग यांनी काही अटी पुढे केल्या. त्यात परराष्ट्र व्यवहार, दळणवळण, चलन आणि संरक्षण हे विषय केंद्राकडे असावे आणि बाकीच्या विषयांचे अधिकार काश्मीर सरकारकडे राहावे अशी त्यांची मागणी होती. पाकिस्तानचे टोळीवाले श्रीनगरपासून १३ कि.मी. अंतरावर असताना नेहरू व पटेलांशी झालेल्या चर्चेत ती मागणी पुढे आली आणि राज्याचे विलिनीकरण पूर्ण केल्याखेरीज भारतीय फौजा काश्मिरात येणार नाहीत ही नेहरू व पटेलांची ठाम भूमिका असल्याने ती बºयाच चर्चेनंतर मान्य झाली. ३७० वे कलम या मागणीवर आधारित आहे. प्रत्यक्षात केंद्र सरकारच्या अधिकारांच्या यादीतील ९२ पैकी काही मोजके विषय सोडले तर त्या राज्याचे सारे अधिकार नेहरूंच्याच कारकिर्दीत त्या राज्याला लाभले आहे. मात्र फार पुढे रेटल्याने काश्मिरातील असंतोष वाढीला लागेल म्हणून नंतरच्या सरकारांनी (त्यात लालबहादूर शास्त्रींपासून अटलबिहारी वाजपेयींपर्यंतची सगळी सरकारे आहेत) ते कलम त्याच्या उर्वरित स्वरूपात कायम ठेवले. ते लागू झाले तेव्हा व पुढे त्यातील काश्मीरचे अधिकार कमी झाले तेव्हाही दाऊद इब्राहिम नावाच्या गुंडाचा कुठे पत्ता नव्हता. सुब्रह्मण्यम स्वामीही १९७५ च्या आणीबाणीनंतर लोकांना बºयापैकी समजू लागले. त्या काळात ते वाजपेयींवर तोंडसुख घेत होते. आताचे या गृहस्थाचे म्हणणे असे की ३७० वे कलम दाऊद इब्राहिममुळे घटनेत आले व त्याच्याचमुळे कायम झाले. गंमत ही की आता केंद्रात स्वामींच्या पक्षाचे राज्य आहे. शिवाय देशातील २१ राज्यात त्या पक्षाची सरकारे आहेत. मनात आणले तर योग्य ती दुरुस्ती करून ते कलम त्यांचा पक्ष आताही घटनेतून काढू शकतो. पण त्यांच्या पक्षात त्यांच्याहून अधिक शहाणे व गंभीर माणसे आहेत. ते कलम काढल्यास आजच असंतोषाने पेटलेल्या त्या प्रदेशात केवढा डोंब उसळेल हे ती जाणतात. त्यांना जे कळते ते स्वामींना कळत नाही एवढेच यातले सत्य. त्यांचा पक्ष ते कलम काढत नाही आणि राम मंदिरही बांधत नाही. त्याविषयीच्या घोषणा निवडणुकीत मदत करतात हे आता त्याला चांगले कळले आहे. पण जे इतर बोलत नाहीत ते आपण बोललो की आपले शूरपण सिद्ध होते असे ज्यांना वाटते त्यांनी मग स्वामींसारखेच बोलायचे असते. हे स्वामी राज्यसभेत आहेत. तेथे ते हे बोलत नाहीत. नागपूरच्या संघभूमीत मात्र तसे बोलतात. यातले सूक्ष्म राजकारणही अशावेळी लक्षात घ्यायचे असते. नागपुरात त्यांचे ऐकले जाते, दिल्लीत मोदी ते ऐकून घेत नाही एवढाच याचा अर्थ. देशाचे राजकारण नेत्यांच्या कृतींहून त्यांच्या उक्तीने जास्तीचे बिघडविले आहे. अशा बिघडविणाºया उक्तींमध्ये नित्य नवी भर पडत आहे. ती घालणारे स्वामींसारखे नमुने सर्वच पक्षात आहेत आणि त्यांच्यामुळे त्या पक्षांचे नेतृत्व पीडितही आहेत. त्यांना आवर घालण्याची हिंमत ते दाखवीत नाहीत हा त्यांचाही दोष आहे.