शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
5
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
6
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
7
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
8
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
9
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
10
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
11
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
12
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
13
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
14
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
15
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
16
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
17
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
18
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
19
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
20
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

स्वामींचे नमुनेदार उथळपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 07:21 IST

सगळ्याच राजकीय पक्षात व संघटनांमध्ये काही नमुन्यांचा समावेश असतो. हे नमुने क्वचितच कधी शहाण्यासारखे बोलतात. एरवीचे त्यांचे बरळणे निव्वळ करमणूक करणारे व ती करणाऱ्याच्या ज्ञानीपणाची कीव करायला लावणारे असते

सगळ्याच राजकीय पक्षात व संघटनांमध्ये काही नमुन्यांचा समावेश असतो. हे नमुने क्वचितच कधी शहाण्यासारखे बोलतात. एरवीचे त्यांचे बरळणे निव्वळ करमणूक करणारे व ती करणाऱ्याच्या ज्ञानीपणाची कीव करायला लावणारे असते. भाजपमध्ये असा एक नमुना सुब्रह्मण्यम स्वामी हा आहे. कधीकाळी हॉर्वर्डचा शिक्का लागलेला हा माणूस स्वत:च्या शहाणपणाएवढाच ऐकणाºया माणसांच्या अडाणीपणावर विश्वास ठेवणारा आहे. त्यामुळे वर्तमानातील असो वा इतिहासातील, कोणतेही वास्तव तो वेडेवाकडे करून जोरात सांगतो आणि माध्यमे त्याला कोणत्याही चौकशीवाचून प्रसिद्धी देतात. नागपुरातील कुठल्याशा सभेत बोलताना या स्वामींनी काँग्रेस हा पक्ष दाऊद इब्राहिमच्या धाकात असल्याचे सांगून टाकले. त्याला पुरावा काय, तर ते म्हणाले त्याचमुळे काँग्रेस पक्ष घटनेतील ३७० वे कलम रद्द करायला विरोध करतो. वास्तव हे की ३७० वे कलम जम्मू व काश्मीर या राज्याचा विशेष घटनात्मक दर्जा मान्य करतो. घटना तयार होत असताना व देशाचे सगळे श्रेष्ठ नेते हयात व हजर असताना ते कलम मान्य केले गेले. काश्मीरचे संस्थान भारतात विलीन करण्यासाठी त्याचे तेव्हाचे राजे हरिसिंग यांनी काही अटी पुढे केल्या. त्यात परराष्ट्र व्यवहार, दळणवळण, चलन आणि संरक्षण हे विषय केंद्राकडे असावे आणि बाकीच्या विषयांचे अधिकार काश्मीर सरकारकडे राहावे अशी त्यांची मागणी होती. पाकिस्तानचे टोळीवाले श्रीनगरपासून १३ कि.मी. अंतरावर असताना नेहरू व पटेलांशी झालेल्या चर्चेत ती मागणी पुढे आली आणि राज्याचे विलिनीकरण पूर्ण केल्याखेरीज भारतीय फौजा काश्मिरात येणार नाहीत ही नेहरू व पटेलांची ठाम भूमिका असल्याने ती बºयाच चर्चेनंतर मान्य झाली. ३७० वे कलम या मागणीवर आधारित आहे. प्रत्यक्षात केंद्र सरकारच्या अधिकारांच्या यादीतील ९२ पैकी काही मोजके विषय सोडले तर त्या राज्याचे सारे अधिकार नेहरूंच्याच कारकिर्दीत त्या राज्याला लाभले आहे. मात्र फार पुढे रेटल्याने काश्मिरातील असंतोष वाढीला लागेल म्हणून नंतरच्या सरकारांनी (त्यात लालबहादूर शास्त्रींपासून अटलबिहारी वाजपेयींपर्यंतची सगळी सरकारे आहेत) ते कलम त्याच्या उर्वरित स्वरूपात कायम ठेवले. ते लागू झाले तेव्हा व पुढे त्यातील काश्मीरचे अधिकार कमी झाले तेव्हाही दाऊद इब्राहिम नावाच्या गुंडाचा कुठे पत्ता नव्हता. सुब्रह्मण्यम स्वामीही १९७५ च्या आणीबाणीनंतर लोकांना बºयापैकी समजू लागले. त्या काळात ते वाजपेयींवर तोंडसुख घेत होते. आताचे या गृहस्थाचे म्हणणे असे की ३७० वे कलम दाऊद इब्राहिममुळे घटनेत आले व त्याच्याचमुळे कायम झाले. गंमत ही की आता केंद्रात स्वामींच्या पक्षाचे राज्य आहे. शिवाय देशातील २१ राज्यात त्या पक्षाची सरकारे आहेत. मनात आणले तर योग्य ती दुरुस्ती करून ते कलम त्यांचा पक्ष आताही घटनेतून काढू शकतो. पण त्यांच्या पक्षात त्यांच्याहून अधिक शहाणे व गंभीर माणसे आहेत. ते कलम काढल्यास आजच असंतोषाने पेटलेल्या त्या प्रदेशात केवढा डोंब उसळेल हे ती जाणतात. त्यांना जे कळते ते स्वामींना कळत नाही एवढेच यातले सत्य. त्यांचा पक्ष ते कलम काढत नाही आणि राम मंदिरही बांधत नाही. त्याविषयीच्या घोषणा निवडणुकीत मदत करतात हे आता त्याला चांगले कळले आहे. पण जे इतर बोलत नाहीत ते आपण बोललो की आपले शूरपण सिद्ध होते असे ज्यांना वाटते त्यांनी मग स्वामींसारखेच बोलायचे असते. हे स्वामी राज्यसभेत आहेत. तेथे ते हे बोलत नाहीत. नागपूरच्या संघभूमीत मात्र तसे बोलतात. यातले सूक्ष्म राजकारणही अशावेळी लक्षात घ्यायचे असते. नागपुरात त्यांचे ऐकले जाते, दिल्लीत मोदी ते ऐकून घेत नाही एवढाच याचा अर्थ. देशाचे राजकारण नेत्यांच्या कृतींहून त्यांच्या उक्तीने जास्तीचे बिघडविले आहे. अशा बिघडविणाºया उक्तींमध्ये नित्य नवी भर पडत आहे. ती घालणारे स्वामींसारखे नमुने सर्वच पक्षात आहेत आणि त्यांच्यामुळे त्या पक्षांचे नेतृत्व पीडितही आहेत. त्यांना आवर घालण्याची हिंमत ते दाखवीत नाहीत हा त्यांचाही दोष आहे.