शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचा डगमगता डोलारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 02:08 IST

रेल्वेमंत्री अधूनमधून माध्यमांना माहिती देत असतात, पण त्यातून रेल्वेचे नेमके कसे चालले आहे, हे समजत नाही.

गेल्या २० वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेचा जो विकास झाला त्याचा डोलारा सांभाळायला रेल्वेचा जेवढा विकास व विस्तार व्हायला हवा होता तेवढा झालेला नाही. रेल्वे हा सरकारचा नफा कमावण्याचा उद्योग नाही हे मान्य केले तरी रेल्वेचा कारभार निदान वित्तीयदृष्ट्या स्वयंपूर्ण असायला हवा, हे नाकारून चालणार नाही. आता रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प बंद करून तो सर्वसाधारण केंद्रीय अंदाजपत्रकाचा एक भाग केल्यापासून रेल्वे हा सार्वजनिक विचारमंथनातून विस्मृतीत गेलेला विषय झाला आहे.

रेल्वेमंत्री अधूनमधून माध्यमांना माहिती देत असतात, पण त्यातून रेल्वेचे नेमके कसे चालले आहे, हे समजत नाही. म्हणूनच भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकांनी (कॅग) दिलेला मार्च २०१८ अखेरच्या वित्तीय वर्षाचा रेल्वेच्या वित्तीय स्थितीविषयीचा अहवाल गांभीर्याने दखल घ्यावा असा आहे. या अहवालातील आकडेवारीच्या तपशिलात जाण्याची गरज नाही. पण त्यातून दिसणारे चित्र रेल्वेचा डोलारा डगमगतो आहे व वेळीच सावरला नाही, तर तो कोसळू शकतो, हे स्पष्ट करणारे आहे. रेल्वेची अवस्था हातावरचे पोट असलेल्या मजुरासारखी आहे. त्यामुळे नूतनीकरण व विस्तारासाठी निधी कुठून आणायचा ही मोठी समस्या आहे.

रेल्वे सध्या मिळणाऱ्या महसुलातील ९४ टक्के पैसा आहे तोच गाडा चालविण्यासाठी खर्च करीत आहे. यातही ७४ टक्के पैसा कर्मचाऱ्यांचे पगार व निवृत्त कर्मचाºयांच्या पेन्शनवर खर्च होत आहे. त्यामुळे विकास आणि नूतनीकरणासाठी स्वत:च स्वत:चा निधी उभारण्याची रेल्वेची क्षमता जवळजवळ संपुष्टात आली आहे. खर्चातही महसुली खर्चाचा वाटा भांडवली खर्चाहून अधिक आहे. असा निधी उपलब्ध व्हावा यासाठी अकाउंटिंगच्या पद्धतीत घसारा निधीची सोय असते. पण कर्मचाºयांचे पगार व परिचालन खर्च केल्यानंतर फारसे काही शिल्लकच राहत नसल्याने रेल्वे या घसारा निधीत ठरलेली रक्कमही टाकू शकत नाही. ज्या भांडवली मालमत्ता जुन्या झाल्या आहेत व ज्यांचे नूतनीकरण करण्याची गरज आहे त्यासाठी लागणारा अपेक्षित निधी एक लाख कोटी रुपये आहे. पण रेल्वेच्या घसारा निधीत सध्या जेमतेम पाच हजार कोटी रुपये जमा आहेत.

गेली अनेक वर्षे रेल्वेकडे पुरेसा निधी नाही म्हणून केंद्रीय अर्थसंकल्पातून रेल्वेला निधी दिला जात आहे. याशिवाय बाजारातून कर्जरोखे काढूनही रेल्वे पैसा घेते. आयुर्विमा महामंडळही पाच वर्षांत मिळून रेल्वेला दीड लाख कोटी रुपये कर्जाऊ देणार आहे. पण बाहेरून येणारा हा निधी ठरावीक कामांसाठीच दिला जातो. त्यामुळे असलेल्या यंत्रणेचे वेळोवेळी काळानुरूप आधुनिकीकरण कसे करायचे, हा यक्षप्रश्न या बाहेरून मिळणाºया निधीने सुटत नाही. बाहेरचा जो पैसा व्याजाने घेतला जातो तोही पूर्णपणे खर्च होत नाही. रेल्वेचा प्रवासी वाहतूक हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे. मालवाहतूक काहीशी फायद्यात आहे. त्यामुळे मालवाहतुकीतून मिळणारा नफा प्रवासी वाहतुकीत वळवून खर्चाची कशीबशी तोंडमिळवणी केली जाते. पण दीर्घकालीन तंदुरुस्तीसाठी हा अक्सिर उपाय नाही. प्रवासी भाड्यात दिल्या जाणाºया नानाविध सवलती ही रेल्वेच्या महसुली हौदाला लागलेली एक मोठी गळती आहे.

या सवलतींचे तार्किक सुसूत्रीकरण करण्याची गरज ‘कॅग’ने अधोरेखित केली आहे. भारतासारख्या खंडप्राय आणि प्रचंड लोकसंख्येच्या देशात आणखी ५० वर्षे तरी रेल्वे हेच वाहतुकीचे प्रमुख साधन राहणार आहे. त्यामुळे रेल्वे व्यवस्था अत्याधुनिक असणे व ती आर्थिकदृष्ट्या किफायतशीरपणे चालविणे ही देशाची नितांत गरज आहे. रेल्वेचा कारभार भक्कमपणे रुळांवर आणायचा असेल तर सर्वप्रथम ती राजकारणापासून दूर ठेवावी लागेल. कोणत्याही सेवेचे उचित मूल्य मोजण्याची तयारी ग्राहकांनी ठेवायलाच हवी. त्यासाठी प्रवासी भाडेवाढ करणे अटळ आहे. हा निर्णय कितीही अप्रिय असला तरी जनतेला विश्वासात घेऊन सरकारला तो घ्यावा लागेल. मोदींच्या खंबीर नेतृत्वाने हे धाडस करावे, हीच अपेक्षा.

टॅग्स :railwayरेल्वे