शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

... तरच उद्धव ठाकरे आणि शिवसेना दिल्लीवर स्वारी करू शकतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 08:53 IST

सत्तेत असणाऱ्या  शिवसेनेपेक्षा विरोधात असणारी शिवसेना कायम इतरांसाठी वरचढ ठरलेली आहे. युतीच्या काळातही भाजप सोबत सरकार मध्ये असतानाही शिवसेनेने पाच वर्ष प्रभावी विरोधकाची भूमिकाही बजावली होती.

जवळपास अडीच महिन्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी (आभासी माध्यमातून) बोलले.  स्वतःच्या मनातील खंत व्यक्त करत असतानाच त्यांनी शिवसेनेने दिल्लीवर स्वारी करण्याची तयारी केली पाहिजे, असे मनोगतही व्यक्त केले. भाजपच्या हिंदुत्वावर टीका करताना शिवसेनेचे हिंदुत्व कसे योग्य आहे हे सांगायला ते विसरले नाहीत. यावरून दुसऱ्या दिवशी राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले नसते, तर नवल. हा विषय पुढचे काही दिवस चालू राहील. उद्धव ठाकरे यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत ते जसे त्यांच्या पक्षातील उणिवांवर बोट ठेवणारे आहेत, तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षालाही बोचरी जाणीव करून देणारे आहेत. त्यांच्या बोलण्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा संदर्भ होता. शिवसेना तुलनेने चौथ्या नंबरवर गेली, मात्र आपण या निवडणुका फारशा गांभीर्याने घेतल्या नाहीत हे त्यांनी स्पष्ट केले.

सत्तेत असणाऱ्या  शिवसेनेपेक्षा विरोधात असणारी शिवसेना कायम इतरांसाठी वरचढ ठरलेली आहे. युतीच्या काळातही भाजप सोबत सरकार मध्ये असतानाही शिवसेनेने पाच वर्ष प्रभावी विरोधकाची भूमिकाही बजावली होती.  आम्ही खिशात राजीनामा घेऊन फिरत आहोत, असे शिवसेनेचे मंत्री सतत सांगायचे. त्यावेळी मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. आता स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे शिवसेनेला तो आक्रमकपणा जळीस्थळी दाखवता येत नाही. त्यामुळे काहीशी थंडावलेली शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रभावीपणे काम करू शकलेली नाही, याची खंत  बोलून दाखवताना ठाकरे यांनी टकमक टोकाचे उदाहरण दिले. पक्षात नीट न वागणाऱ्या, काम न करणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एवढा इशारा पुरेसा आहे.  नीट काम केले नाही तर, पक्षातून हकालपट्टी होऊ शकते, हे  उद्धव ठाकरे यांनी सभ्य भाषेत सांगितले आहे. त्यांच्या समोर येणाऱ्या काळात होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका असल्यामुळेच त्यांनी हा इशारा दिला आहे. इतर पक्ष ज्या पद्धतीने साध्या-साध्या निवडणुकाही गंभीरपणे घेतात ते गांभीर्य आपणही ठेवले पाहिजे.  गद्दार असतील  त्यांनी खुशाल शिवसेना सोडावी. जे उरतील त्या निष्ठावानांना सोबत घेऊन आपण लढू , हे सांगताना उद्धव ठाकरे यांनी पक्षातल्या सुंदोपसुंदीवर नेमके बोट ठेवले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी पाठ फिरवली होती. त्यांचा उल्लेख न करता त्यांना फटकारण्याचे कामही या भाषणातून झाले. मात्र शिवसेनेचे मंत्री बाहेर का फिरत नाहीत?, निवडणुका का गांभीर्याने घेत नाहीत?, जिल्ह्या-जिल्ह्यातल्या शाखाप्रमुख, पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नांमध्ये का लक्ष देत नाहीत?- हे पाहण्यासाठी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा महाराष्ट्रभर फिरावे लागेल. त्यांना शक्य नसेल तर, आदित्य ठाकरे यांना तरी महाराष्ट्र पिंजून काढावा लागेल. तसे झाले नाही तर, शिवसेनेचा कागदी वाघ होईल. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या निवडणुकीमध्ये शंभरच्या आसपास सभा घेतल्या.

काँग्रेसला ज्या ३४४ जागा मिळाल्या त्यात गडचिरोली, चंद्रपूर या दोन जिल्ह्यातल्या ८० ते ९० जागांचा समावेश आहे. याचा अर्थ राष्ट्रवादी ज्या गंभीरपणे निवडणुकांकडे पाहते तो गंभीरपणा ना, शिवसेनेकडे उरला ना, काँग्रेसकडे !  शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत जाण्याची मानसिकता का, बनत चालली आहे, यासाठी हा संदर्भही लक्षात घेतला पाहिजे.   आपण भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत जाणार नाही हे ठाकरे यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. भाजपचे हिंदुत्व कसे बेगडी आहे हे सांगण्याकरिता त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार, जम्मू काश्मीरच्या मेहबूबा मुक्ती, आंध्राचे चंद्राबाबू अशांची उदाहरणे दिली. भाजप देशात गुलामगिरीचे वातावरण तयार करत आहे आणि त्यालाच हिंदुत्वाचा मुलामा देत आहे, असे सांगताना ठाकरे यांनी दिल्ली काबीज करण्याच्या शिवसेनाप्रमुखांच्या स्वप्नाची आठवण दिली. मात्र दिल्लीकडे कूच करताना शिवसेनेला आपले घर मजबूत करावे लागेल.  मरगळ झटकावी लागेल. नेत्यांना विभागवार जबाबदाऱ्या द्याव्या लागतील. शिवसेनेचे मंत्री करतात तरी काय हे तपासावे लागेल. सत्ता मिळाल्यामुळे स्वमग्न झालेल्या काही मंत्र्यांना अंग झाडून कामाला लावावे लागेल ! तरच उद्धव ठाकरे यांना आणि शिवसेनेलाही या भाषणाचे अपेक्षित फळ मिळेल !

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाdelhiदिल्ली