शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: जळगाव ट्रेन अपघात, अफवेचे दुर्दैवी बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 10:24 IST

Jalgaon Train Accident: जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वेस्थानकानजीक बुधवारी घडलेल्या भीषण रेल्वे अपघातास अपघात म्हणावे, की भारतीय मानसिकता आणि सामुदायिक बेजबाबदारीचे आणखी एक उदाहरण म्हणावे, हा प्रश्न पडला आहे.

जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वेस्थानकानजीक बुधवारी घडलेल्या भीषण रेल्वे अपघातासअपघात म्हणावे, की भारतीय मानसिकता आणि सामुदायिक बेजबाबदारीचे आणखी एक उदाहरण म्हणावे, हा प्रश्न पडला आहे. पुष्पक एक्स्प्रेसच्या एका डब्यात एक चहा विक्रेता गाडीत आग लागल्याचे सांगतो काय, त्याची शहानिशा न करता आपत्कालीन साखळी ओढली जाते काय, गाडी थांबताच काही प्रवासी दुसऱ्या बाजूच्या रेल्वेमार्गावर उड्या घेतात काय अन् तेवढ्यातच विरुद्ध दिशेने भरधाव येणारी कर्नाटक एक्स्प्रेस १३ जणांना चिरडते काय, सारेच अनाकलनीय आहे. एका डब्याखालून ठिणग्या उडाल्यामुळे आग लागल्याची अफवा पसरली, असे सांगण्यात येत आहे. रेल्वेच्या परिभाषेत ज्याला ‘हॉट ॲक्सल’ किंवा ‘ब्रेक-बाइंडिंग’ म्हणतात, त्यामुळे ठिणग्या उडाल्या असाव्यात, असा जाणकारांचा अंदाज आहे. भारतीय रेल्वेगाड्यांमध्ये ब्रेक लावत असताना घर्षणामुळे ठिणग्या उडणे किंवा जळल्याचा वास येणे, हे नेहमीचेच आहे. पुष्पक एक्स्प्रेसमध्येही तसेच घडले असावे; पण त्यानंतर चहा विक्रेत्याने आग लागल्याचे सांगितल्याने प्रवासी घाबरले असावे आणि त्यांनी आपत्कालीन साखळी ओढून गाडी थांबताच रुळांवर उड्या मारल्या असाव्या.

यानिमित्ताने भारतीय रेल्वेगाड्यांची दयनीय स्थिती, रेल्वेतील सुरक्षेचे प्रश्न आणि समुदाय म्हणून भारतीयांची बेजबाबदार वर्तणूक पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. या दुर्दैवी अपघातास यांत्रिक दोष जेवढा कारणीभूत आहे, तेवढीच अफवा पसरविण्याची, तिला बळी पडण्याची भारतीय मानसिकता आणि आपत्कालीन स्थितीत कसे वागावे यासंदर्भातील घोर अज्ञानदेखील जबाबदार आहे. भारतात अफवा पसरण्याचे आणि त्यावर विश्वास ठेवण्याचे प्रमाण जगाच्या तुलनेत बरेच मोठे असल्याचे वेळोवेळी समोर येतच असते. शिवाय आणीबाणीच्या परिस्थितीत भारतीय लोक विचार न करता घाईगडबडीत चुकीचे निर्णय घेतात, हेदेखील वारंवार सिद्ध झाले आहे. संस्कार होण्याच्या वयात आवश्यक प्रशिक्षणच आपल्या देशात दिले जात नाही, हे त्यामागचे कारण. विकसित देशांमध्ये लहानपणीच बाळकडू मिळाल्याने पुढील जीवनातही नागरिक तशाच शिस्तीचे आणि जबाबदार वर्तणुकीचे प्रदर्शन करतात. आपल्याला मात्र केवळ ‘विकसित देश’ म्हणवून घेण्याची घाई झाली आहे. त्यासाठी जी पूर्वतयारी करायला हवी, त्याची पुरती वानवा आहे. वस्तुत: नागरिकशास्त्र हा विषय शाळांमध्ये सर्वांत महत्त्वाचा विषय असायला हवा; परंतु आपल्या देशात तो सर्वांत दुर्लक्षित विषय आहे. आपत्कालीन परिस्थितीत कसे वागायचे, आपत्कालीन साधनांचा वापर कसा करायचा, याबाबत बहुतांश भारतीय अनभिज्ञ असतात.

जळगावनजीकच्या रेल्वे अपघातात त्याचे पुन्हा एकदा प्रदर्शन झाले. वस्तुतः आग लागल्याची अफवा जरी पसरली असली, तरी कोठेही आगीच्या ज्वाळा दिसत नव्हत्या. गाडीही थांबली होती. त्यामुळे प्रवाशांनी शिस्तीचे प्रदर्शन करीत, गोंधळ न माजवता, केवळ विरुद्ध बाजूने खाली उतरण्याचे ठरविले असते, तर १३ जणांना हकनाक जीव गमवावा लागला नसता आणि २५ जणांना अपंग बनून उर्वरित आयुष्य काढावे लागले नसते. आपल्या देशात अगदी अशाच प्रकारचे अपघात यापूर्वीही घडले आहेत; पण चुकांपासून धडा घेऊन पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना करणे, हे आपल्या गावीच नाही. वस्तुतः प्रवाशांना सातत्याने गाडीतील आपत्कालीन साधने, साखळी ओढण्याचे नियम, तसेच शिस्त पाळण्याचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे. प्रत्येक डब्यात आपत्कालीन सूचनांचे फलक असायला हवेत. गाड्यांमध्ये सीसीटीव्ही आणि सेन्सरचा मोठ्या प्रमाणात वापर व्हायला हवा. प्रत्येक रेल्वेगाडीत प्रवाशांना सूचना देण्यासाठी ‘पब्लिक अड्रेस सिस्टम’ असायला हवी. त्याशिवाय रेल्वे कर्मचाऱ्यांना अशा अपघातांच्या परिस्थितीत अधिक चपळतेने  काम करण्याचे प्रशिक्षण दिले जाणेही आवश्यक आहे. जळगावनजीकच्या अपघातास फक्त तांत्रिक बिघाड कारणीभूत नाही, तर प्रवाशांच्या मानसिकतेचे आणि प्रशासनाच्या ढिसाळपणाचे ते दुर्दैवी उदाहरण आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सजगपणे वापर करणे, हेच या समस्येवरील दीर्घकालीन उपाय ठरू शकतील.

टॅग्स :JalgaonजळगावIndian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघात