शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

आजचा अग्रलेख - खोट्याच्या कपाळी गोटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 09:30 IST

आक्षेपार्ह असा जगभरात ९० लाख, भारतात साडेबावीस लाख ‘कंटेंट’ काढून टाकल्याचा दावा यू-ट्यूबने केला आहे.

‘ग्लोबल विटनेस’ नावाच्या एका लंडनस्थित संस्थेने काही महिन्यांपूर्वी भारतातील सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर यू-ट्यूबची एक परीक्षा घेतली. संसर्गजन्य रोगांचा धोका असल्याने बाहेर पडू नका, घरूनच मतदान करू शकाल किंवा निवडणूक आयोगाने विरोधी पक्ष अपात्र ठरविले आहेत, त्यांना दिलेली मते मोजली जाणार नाहीत. आयोगाने आता वयानुसार मताधिकाराचा निर्णय घेतला असून, पन्नासपेक्षा अधिक वयाच्या मतदारांनी टाकलेल्या मताची दोन मते मोजली जातील, अशा स्वरूपाच्या काही जाहिराती इंग्रजी, हिंदी व तेलुगू भाषेत तयार केल्या. यू-ट्यूबवर त्या टाकण्यासाठी परवानगी मागितली. ‘आम्ही प्रत्येक व्हिडीओ, मजकूर तपासूनच पाहतो’, असा दावा करणाऱ्या यू-ट्यूबने तीन भाषेतील त्या सर्व ४८ जाहिराती मंजूर केल्या. अर्थात, हा ‘रिॲलिटी चेक’ असल्यामुळे त्या जाहिराती प्रसारित झाल्या नाहीत. या प्रकाराची फारशी चर्चा झाली नाही. परंतु आता ‘फेक न्यूज’ किंवा ‘डीपफेक व्हिडीओ’च्या रूपातील आक्षेपार्ह असा जगभरात ९० लाख, भारतात साडेबावीस लाख ‘कंटेंट’ काढून टाकल्याचा दावा यू-ट्यूबने केला आहे.

भारत या जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्रातील अठरावी सार्वत्रिक निवडणूक निर्भेळ, निष्पक्ष वातावरणात पारदर्शीपणे पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाबरोबर प्रयत्न करण्याचा निर्णय यू-ट्यूबने घेतला आहे. मतदार नोंदणी कशी करावी, या लोकशिक्षणापासून ते चुकीची माहिती रोखण्यासाठी मोहीम उघडण्यात आली आहे. या पृष्ठभूमीवर ‘ग्लोबल विटनेस’ने घेतलेल्या परीक्षेचा निष्कर्ष लक्षात घेतला तर यू-ट्यूब, फेसबुक वगैरे सगळ्याच सोशल मीडियापुढील आव्हान किती मोठे आहे याची कल्पना यावी. आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यू-ट्यूबवर पडणाऱ्या प्रत्येक माहितीची सत्यासत्यता तत्काळ तपासण्याची व्यवस्था करण्यात आल्याचा यू-ट्यूबचा दावा आणि भारतातील तब्बल ४६ कोटींहून अधिक त्या माध्यमाच्या वापरकर्त्यांमधील सामाजिक, राजकीय विचारांची विविधता यांच्यात हा सामना आहेच. त्याशिवाय खरेतर हा सगळा मामला नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राजकीय किंवा अन्य हेतूने संघटितपणे चुकीची माहिती जाणीवपूर्वक पसरविणारे लोक यांच्यातील संघर्षाचा व स्पर्धेचा आहे.

याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नोंदविलेल्या एका निरीक्षणाचे उदाहरण ताजे आणि विचार करायला लावणारे आहे. न्यायालयाने एका प्रकरणात तमिळनाडू सरकारची बाजू मांडणारे मुकुल रोहतगी यांना एक प्रश्न विचारला, की निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांवर टीका करणाऱ्या प्रत्येकाला तुरुंगात टाकायचे म्हटले तर किती लोकांना टाकणार? प्रकरण होते तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्याविरुद्ध वक्तव्य केल्याप्रकरणी अटक झालेल्या ए. दुराईमुरूगन सत्ताई नावाच्या यू-ट्यूबरचे. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, या उक्तीचा पुरता अनुभव सत्ताईने घेतला. त्याला अटक झाली. जामिनासाठी तो धडपडत राहिला. पण त्यात त्याला फारसे यश आले नाही. खालच्या न्यायालयाने दिलेला जामीन मद्रास उच्च न्यायालयाने रद्द केला. त्यामुळे तो तब्बल अडीच वर्षे तुरुंगात राहिला. त्या निर्णयाविरुद्ध सत्ताई सर्वोच्च न्यायालयात गेला होता. यातून एक बाब स्पष्ट होते, की अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगताना काय करावे व काय करू नये, याचे भान लोकांना राहिले नाही की मग तो हक्क कमकुवत बनतो. न्यायालयांनी कितीही म्हटले, की संरक्षण करायचे, तरी ते शक्य हाेत नाही. कारण या स्वातंत्र्याचा खोलात जाऊन विचार सर्वोच्च न्यायालय किंवा फारतर काही उच्च न्यायालये करतात. खालची न्यायालये शक्यतो सरकार पक्षाच्या विरोधात जाण्याचे टाळतात. याउलट फेक न्यूज पसरविणारे बऱ्यापैकी निर्ढावलेले असतात. त्यांचे हेतू वेगळे असतात. समाजमाध्यमांपुढे आव्हान या कंटकांचे आहे. आपल्याकडे म्हणतात ना, की घराबाहेर पडण्यासाठी चप्पल वगैरे घालून सत्य तयार होईपर्यंत खोटं गावभर फिरून आलेलं असतं. त्यामुळे एखाद्या मजकुरावर, व्हिडीओवर आक्षेप दाखल होऊन त्याची दखल घेतली जाईपर्यंत, तो हटविला जाईपर्यंत जे व्हायचे ते साध्य झालेले असते. हे टाळण्यासाठी ‘सोशल मीडिया प्लॅटफॉर्म’ चालविणाऱ्या कंपन्यांनी डोळ्यात तेल घालून नजर ठेवायला हवीच. पण त्यापेक्षा मोठी जबाबदारी नागरिकांवर आहे. अभिव्यक्तीच्या हक्कासोबतच आपल्यापर्यंत पोहोचलेली माहिती खरी आहे की खोटी, याची शहानिशा केल्याशिवाय ती पुढे न पाठविणे आणि ते खोटे असेल तर संबंधितांना लागलीच ते कळविणे, हे कर्तव्य बजावणे सदृढ, निकोप लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे.

टॅग्स :YouTubeयु ट्यूबFake Newsफेक न्यूजSocialसामाजिकElectionनिवडणूक