शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
4
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
5
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
6
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
7
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
8
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
9
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
10
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
11
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
12
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
13
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
14
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
15
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
16
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
17
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
18
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
19
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
20
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी

आजचा अग्रलेख: ‘खलनायक’ कोण? व्यवस्था की समाज, पुढे भवितव्य काय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 11:21 IST

Pune Crime: पुण्यासारख्या महानगरातील सदाशिव पेठेतल्या रस्त्यावरून एक मुलगी भरदिवसा जीव मुठीत धरून धावते आहे आणि माथेफिरू तरुण तिच्यावर कोयत्याने वार करत तिचा पाठलाग करतो आहे. एखाद्या चित्रपटात हा प्रसंग असता तर तो अतिरंजित वाटला असता. पण, तमाम पुणेकरांनी हा थरारक प्रसंग नुकताच पाहिला.

पुण्यासारख्या महानगरातील सदाशिव पेठेतल्या रस्त्यावरून एक मुलगी भरदिवसा जीव मुठीत धरून धावते आहे आणि माथेफिरू तरुण तिच्यावर कोयत्याने वार करत तिचा पाठलाग करतो आहे. एखाद्या चित्रपटात हा प्रसंग असता तर तो अतिरंजित वाटला असता. पण, तमाम पुणेकरांनी हा थरारक प्रसंग नुकताच पाहिला. महिलांची, मुलींची वाढती असुरक्षितता हा मुद्दा आपण गंभीरपणे घेणार आहोत की नाही, हा प्रश्न पडावा अशाच घटना  सातत्याने सगळीकडे घडत आहेत. दर्शना पवारच्या पाठोपाठ मंगळवारी पुण्यात भर मध्यवस्तीत, दिवसाढवळ्या एक तरुण कोयत्याने वार करायला धजावू शकतो, याला काय म्हणावे? या हल्ल्यात त्या तरुणीच्या मदतीला दोन तरुण आले. त्यांनी त्या बेभान झालेल्या तरुणाचे कोयत्याचे वार आपल्या हातांनी अडवत तरुणीचा जीव तर वाचवलाच, पण हल्लेखोराला पोलिसांच्या ताब्यातही दिले. एखाद्या सिनेमात अथवा वेबसीरिजमध्ये शोभणारे हे दृश्य. पोलिसांच्या वर्तनाने त्यात भरच पडली! ही मुलगी मदतीसाठी पोलिस चौकीत आली, तेव्हा तिथे एकही पोलिस नव्हता. याची जबाबदारी कोणी घेणार की नाही?

आधीच समाजातील गुन्हेगारी वृत्ती वाढीला लागल्याची शेकडो उदाहरणे रोज समोर येत आहेत. त्यांना वचक बसवणारी पोलिस यंत्रणा अशी संवेदनशून्य असेल तर मग पीडित तरुणी, सर्वसामान्य जनतेने पाहायचे तरी कोणाकडे? महिलांना स्वसंरक्षणासाठी हत्यारे द्या, या मागणीचे आंधळे समर्थन करता येणार नाही. पण, पोलिस यंत्रणेच्या अकार्यक्षमतेमुळे ही मागणी पुढे आली आहे, हे लक्षात घ्यायला हवे. घटना घडली त्याच दिवशी दुपारी ‘लोकमत’ने  पोलिस, वकील, प्राध्यापक, मानसशास्त्रज्ञ, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे आणि अन्य तरुण यांचे चर्चासत्र याच विषयावर पुण्यात घेतले. त्यातला सूर सरकारी यंत्रणांना, विशेषतः पोलिसांना दोष देणारा आहेच, पण आपल्या समाजव्यवस्थेकडे, कुटुंबसंस्थेच्या प्रारूपाकडे बोट दाखवणारा आहे. मुळात, याला जातपितृसत्तेचा संदर्भ आहे. पुरुषप्रधान व्यवस्थेत ज्या पद्धतीने मुलगा आणि मुलगी यांची वाढ होते, त्यातून मुलीने दिलेला नकार पचवणे मुलांना अशक्य वाटते. आपल्यापेक्षा मुलगी पुढे जाते आहे, हेही खटकते. शारीर आकर्षणाला प्रेम समजणारे असे माथेफिरू मग मुलीला भररस्त्यात जिवंत कसे जाळू शकतात, हे हिंगणघाटने आपल्याला दाखवले आहे. पुण्यातील परवाची घटना आणखी वेगळी नाही. दर्शनासारख्या अधिकारी झालेल्या मुलीचा खून करणारी मानसिकता हीच आहे. साध्या साध्या घटनांनी विफल होणाऱ्या, सगळे संपवू पाहणाऱ्या तरुणाईचे हे रूप संचित करणारे आहे.

योगायोग असा की दर्शना आणि तिचा खुनी हे दोघेही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे. या परीक्षांच्या अभ्यासासाठी पुण्यात राहणाऱ्यांची संख्या चार लाखांपेक्षा जास्त आहे. राज्यात शिक्षण सर्वदूर पोहोचले, मात्र शिक्षणातून येणारी सुसंस्कृतता अंगी आणण्यात आपण कमी पडलो. शिकायचे आणि शिकून भरपूर पैसे कमवायचे, या एकमेव ध्येयाशिवाय मुला-मुलींकडे कोणतेही प्रयोजन नसते. म्हणून तर प्रेमाच्या नावाने कोयते चालू शकतात. याचा अर्थ हेच सर्वत्र सुरू आहे, असे नाही. तरुणाई अशीच आहे, असे नाही. पण, सातत्याने घडणाऱ्या घटनांनंतर याला अपवाद मानावे, असेही चित्र उरलेले नाही. प्रेम, शारीर आकर्षण, गरज या गोष्टींवर न बोलणारा आपला समाज. त्यातून लाखो गोरगरीब तरुण एका वेगळ्याच गर्तेत दिसतात. शिक्षणाचा आधीच बाजार झालेला असताना आणि बेरोजगारीने तरुणांचे आयुष्य अंधःकारमय झालेले असताना, स्पर्धा परीक्षांच्या या ‘मार्केट’ने अनेक आयुष्ये उद्ध्वस्त होत आहेत, याचाही विचार करावा लागणार आहे. एक मुद्दा महत्त्वाचा आहे. ‘सगळेच तरुण भरकटलेले आहेत’, असे म्हणणारे बहुतेक जण पुण्यातील घटनेत लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या तरुणांनीच जीवावर उदार होत त्या मुलीचा जीव वाचवला हे विसरतात.

तरुण पिढीला नावे ठेवणे सोपे, त्या़ंच्याशी संवाद करणे अवघड! ही जबाबदारी सर्वांची आहे. कुटुंबसंस्था आणि विवाहसंस्था या प्रारुपांचा फेरविचार करण्याची गरज आहे. पुण्यातील घटनांमुळे समोर आणलेला मुद्दा कायदा आणि सुव्यवस्थेचाही आहे. पुण्यासारख्या प्रगत, प्रगल्भ आणि स्मार्ट शहरात पोलिसांची ही कार्यक्षमता असेल, तर इतरत्र काय चित्र असणार आहे? लेशपाल आणि हर्षद या नायकांनी पुण्यात तरुणीला वाचवले खरे, पण ‘व्यवस्था’च खलनायक असेल, तर समाज म्हणून आपले भवितव्य काय असणार आहे?

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSocialसामाजिकMaharashtraमहाराष्ट्र